'ठाकरे गटाकडे व्हिजनच नव्हतं, म्हणून त्यांचा सुपडा साफ'; विजयानंतर निलेश राणेंचा घणाघात


सिंधुदुर्ग : नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीच्या निकालानंतर सिंधुदुर्गातील राजकीय वातावरण तापले आहे. मालवणमधील विजयाचा आनंद साजरा करत असतानाच, आमदार निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. "ठाकरे गटाकडे कोणताही अजेंडा किंवा व्हिजन नव्हते, त्यामुळे त्यांचा पराभव निश्चितच होता," अशा शब्दांत राणेंनी विरोधकांचा समाचार घेतला. नेतृत्वाचा अभाव आणि अंतर्गत गटबाजीमुळे ठाकरे गटाला अपयश आलेलं आहे. जनतेच्या आशीर्वादामुळे हा विजय मिळाला आहे. पाच वर्षे केवळ जल्लोष न करता शहराच्या विकासासाठी काम करणार; असे शिवसेना आमदार निलेश राणे म्हणाले.


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशानंतर आमदार निलेश राणे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ठाकरे गटाच्या अपयशाचे विश्लेषण करताना सांगितले की, त्यांच्याकडे निवडणूक जिंकण्यासाठी कोणताही प्लॅन नव्हता. कार्यकर्ते सोडून जात आहेत आणि एकसंघपणे लढण्याची क्षमता त्यांच्यात उरली नाही, म्हणूनच त्यांना या निवडणुकीत हार पत्करावी लागली.



"एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू"


मालवणमधील विजयाबद्दल बोलताना राणे भावूक झाले. ते म्हणाले, "आज विचित्र भावना आहेत. मालवणमध्ये जनतेने दिलेला कौल सुखावह आहे, पण कणकवलीमध्ये आमच्या जवळच्या लोकांचा पराभव झाला आहे, त्याचे दुःखही आहे. राजकारणात निवडणूक एका बाजूला आणि नाती एका बाजूला असतात. कणकवलीत आमचे कुटुंबच आमनेसामने होते." विजय मिळवलेल्या संदेश पारकर यांचे त्यांनी अभिनंदनही केले.



पैसे वाटपाच्या आरोपांना उत्तर


निवडणुकीत झालेल्या पैसे वाटपाच्या आरोपांवर बोलणे निलेश राणे यांनी टाळले. "आज विजयाचा दिवस आहे, तो आम्हाला आनंदाने साजरा करू द्या. आरोप-प्रत्यारोप गेल्या २५ दिवसांपासून सुरू आहेत, आजचा दिवस आमच्या कार्यकर्त्यांच्या जल्लोषाचा आहे," असे म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगावला.



जबाबदारीची जाणीव


विजयाचा उन्माद न करता राणे यांनी भविष्यातील कामाची दिशा स्पष्ट केली. "जनतेने आमच्यावर विश्वास दाखवला आहे, आता आमची जबाबदारी वाढली आहे. पुढची पाच वर्षे लोकांना अपेक्षित असलेला शहराचा विकास करून दाखवण्यासाठी आम्ही मेहनत घेऊ," असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.


Comments
Add Comment

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे मुंबई विमानतळावर आगमन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले स्वागत

मुंबई : केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांचे आज छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथे

Mumbai Local News : लोकलमध्ये महिलेला मारहाण करणाऱ्या पुरुषाला १२ तासांत अटक

मुंबई : लोकलमध्ये महिलेला मारहाण करत असलेल्या पुरुषाचा व्हिडीओ व्हायरल झाला. हा व्हिडीओ व्हायरल होताच अवघ्या १२

Jalna : कॉलेजचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू आणि चौघे जखमी

जालना : जालना जिल्ह्यातील भोकरदनमध्ये एका कॉलेजच्या नव्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. हे बांधकाम सुरू असताना

Weather changes in Maharashtra : महाराष्ट्रात पुन्हा बदलले हवामान; शनिवारी अनेक भागांत पावसाचा अंदाज, ७ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी!

मुंबई : महाराष्ट्रामध्ये मान्सूनचे वारे पुन्हा एकदा सक्रिय झाले असून, राज्याच्या विविध भागांत पावसाचा जोर

Boss Scam : अधिकारी बनून पैशांची मागणी; 'बॉस स्कॅम'पासून सावधान राहण्याचे केंद्राचे आवाहन

नवी दिल्ली : व्हॉट्सॲप, ई-मेल किंवा इतर संदेशवहन माध्यमांचा वापर करून आर्थिक फसवणूक करणाऱ्या सायबर

New IT Rules : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्ससाठी नवीन आयटी नियम कठोर, आक्षेपार्ह मजकूर हटवण्याची मुदत २४ तासांवरून थेट २ तासांवर

नवी दिल्ली : केंद्र सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्ससाठी आक्षेपार्ह आणि संवेदनशील मजकूर हटवण्याच्या मुदतीत