विश्वविजेत्या दृष्टिहीन भारतीय महिला क्रिकेटपटू मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी

मुंबई : दृष्टिहीन महिलांच्या क्रिकेटमधील पहिला टी-२० विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय महिला संघाने ऐतिहासिक विजय साजरा करताना, शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी संघातील खेळाडूंसोबत संवाद साधला आणि त्यांच्या यशाचे कौतुक केले.


कोलंबोत नुकत्याच पार पडलेल्या 'फर्स्ट वुमेन्स टी२० वर्ल्ड कप क्रिकेट फॉर द ब्लाइंड २०२५'च्या अंतिम सामन्यात भारताने नेपाळचा सात गडी राखून पराभव करत विश्वविजेतेपद पटकावले. हा दृष्टिहीन महिलांच्या क्रिकेटमधील पहिलाच टी-२० विश्वचषक होता आणि त्याचा मान भारताने मिळवला. या विश्वविजेतेपदापर्यंत पोहोचण्यासाठी संघातील सदस्यांनी अनेक आव्हानांवर मात केली आहे. संघातील अनेक खेळाडू लहान खेड्यांतील, शेतकरी कुटुंबातील किंवा छोट्या शहरांतील वसतिगृहांतील आहेत. त्यांचा हा प्रवास प्रेरणादायी आहे.


महाराष्ट्राच्या गंगा कदम यांना या संघाचे उपकर्णधारपद भूषवण्याची संधी मिळाली. नऊ भावंडांच्या शेतकरी कुटुंबातील गंगा लहानपणापासून दृष्टिहीन आहे. भविष्याचा विचार करून तिच्या वडिलांनी तिला अंधांसाठीच्या विशेष शाळेत दाखल केले. तिथे सुरुवातीला गंमत म्हणून क्रिकेट खेळायला लागली. आवाजाच्या आधारावर चेंडूचा माग काढणे, वेळेचा अंदाज घेणे अशी अनेक आव्हाने होती. मात्र २६ वर्षीय गंगाने चिकाटीनं सराव करत हे कौशल्य आत्मसात केले. मुख्यमंत्र्यांनी तिचे विशेष कौतुक केले.

Comments
Add Comment

कुर्ला पश्चिम भागातील तुंबणाऱ्या पाण्याचा आता बंदोबस्त...

मुंबई (सचिन धानजी) : कुर्ला पश्चिम येथील प्रिमियर नाल्याला जोडणाऱ्या भारतीय नगर नाला आणि विनोबा भावे नाल्याचे

आता लोकल गाड्या दादर, ठाण्यापर्यंतच धावणार; ३ महिने राहणार हे' प्लॅटफॉर्म बंद

मुंबई : मुंबईकरांसाठी एक महत्वाची बातमी आहे. दररोज प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना आता एका मोठ्या जम्बो ब्लॉक चा

भारतातील मलेरिया रुग्णसंख्येत लक्षणीय घट

मुंबई : मलेरिया हा आजार एकेकाळी भारतातील सार्वजनिक आरोग्यासमोरील मोठे आव्हान मानला जात होता. मात्र गेल्या दशकात

Rohit Shetty : बॉलिवूड हादरलं! ॲक्शन किंग अन् दिग्दर्शक रोहित शेट्टींच्या जुहूतील बंगल्यावर मध्यरात्री गोळीबार; तो आला अन्...थेट

मुंबई : बॉलीवूडचे 'ॲक्शन किंग' म्हणून ओळखले जाणारे दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या जुहू येथील बंगल्याबाहेर

वाढत्या वायुप्रदूषणाचा डोळ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम

१८ ते ४५ वयोगटांतील नागरिकांमध्ये या तक्रारींचे प्रमाण अधिक मुंबई : मुंबईतील वाढते वायुप्रदूषण आता केवळ

धारावी ते घाटकोपरमधील प्रक्रिया केलेले मलजल भांडुप संकुलात

पाणी वहन करण्यासाठी संकुलात ९७० लिटर क्षमतेचा जलबोगद्याची उभारणी मलजल प्रक्रिया केंद्रातील पाणी वहन करणाऱ्या