Nagpur News : नागपूर हादरले! बुटीबोरी एमआयडीसीत भीषण दुर्घटना, ६ कामगारांचा मृत्यू

मृतांच्या वारसांना ३५ लाखांची मदत जाहीर मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा


नागपूर : नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी औद्योगिक वसाहतीत (MIDC) एका नामांकित कंपनीत आज भीषण दुर्घटना घडली. या दुर्दैवी घटनेत ६ कामगारांचा जागीच मृत्यू झाला असून ९ कामगार गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबियांना आणि जखमींना तातडीने मोठी आर्थिक मदत जाहीर केली आहे.



नेमकी घटना काय?


मिळालेल्या माहितीनुसार, बुटीबोरी एमआयडीसीतील संबंधित कंपनीत काम सुरू असताना अचानक ही दुर्घटना घडली. यात ६ कामगारांना आपले प्राण गमवावे लागले. जखमी झालेल्या ९ कामगारांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर युद्धपातळीवर उपचार सुरू आहेत. जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी आणि रुग्णालयात परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. या घटनेनंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून शोक व्यक्त केला आहे. त्यांनी मृतांच्या वारसांना आणि जखमींना खालीलप्रमाणे आर्थिक मदत जाहीर केली आहे, मृतांच्या वारसांना ५ लाख रुपयांची आर्थिक मदत. संबंधित कंपनी मृतांच्या वारसांना प्रत्येकी ३० लाख रुपये देणार आहे. जखमींना प्रत्येकी १० लाख रुपये आणि त्यांच्या उपचारांचा संपूर्ण खर्च कंपनी उचलणार आहे.



मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, "ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. जखमी कामगार लवकर बरे व्हावेत, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. मी नागपूर जिल्हाधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात असून प्रशासन आणि यंत्रणांमध्ये योग्य समन्वय राखला जात आहे."

Comments
Add Comment

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या

मतदानानंतर बोटावर शाई का लावली जाते? हात किंवा बोट नसल्यास काय असते नियम?

मुंबई : राज्यातील अनेक महापालिकांमध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू असून नागरिक उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावत

'मशिदीवर पुन्हा भोंगे लावण्याचे उबाठाचे वचन'

मुंबई :मशिदीवरील भोंगे पुन्हा लावण्याचे वचन देत उद्धव ठाकरेंनी निवडणूक प्रचार केला, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री

मुंबईत दुपारी दीड वाजेपर्यंत २९.९६ टक्के मतदान

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान सुरू आहे.

मुंबईच्या इस्लामीकरणाचे षडयंत्र ‘टीस’च्या अहवालातून उघड

मुंबई  : २०५१ पर्यंत मुंबईतील हिंदू लोकसंख्या केवळ ५४ टक्के उरेल, अशी धक्कादायक माहिती देशातील अग्रगण्य टाटा