मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, तत्काळ तिकीट बुकिंगसाठी नवे नियम

पुणे : तत्काळ तिकीट बुकिंगमधील गैरप्रकार रोखण्यासाठी मध्य रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांसाठी तिकीट बुकिंग अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्यासाठी ओटीपीद्वारे पडताळणीची नवी प्रणाली टप्प्याटप्प्याने लागू केली जात आहे. या निर्णयानुसार १९ डिसेंबरपासून पुण्याशी संबंधित मध्य रेल्वेच्या आणखी पाच गाड्यांवर ही व्यवस्था अंमलात येणार आहे.


नव्या पद्धतीनुसार पुणे–अमरावती एक्सप्रेस, पुणे–सोलापूर हुतात्मा एक्सप्रेस, सीएसएमटी–कोल्हापूर कोयना एक्सप्रेस, एलटीटी–गोंडा गोदान एक्सप्रेस आणि एलटीटी–जयनगर एक्सप्रेस या गाड्यांवर तत्काळ तिकीट बुकिंगसाठी ओटीपी पडताळणी बंधनकारक राहणार आहे.


या बदलानंतर आरक्षण काउंटर, अधिकृत एजंट तसेच IRCTCच्या वेबसाइट किंवा मोबाइल ॲपवरून केलेल्या तत्काळ तिकीट बुकिंगसाठी प्रवाशांना ओटीपी देणे आवश्यक असेल. बुकिंगवेळी नोंदवलेल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी पाठवला जाईल आणि तो टाकल्यानंतरच तिकीट निश्चित होणार आहे.


ओटीपी पडताळणीदरम्यान कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी प्रवाशांनी तिकीट बुकिंग करताना स्वतःचा चालू आणि अचूक मोबाईल क्रमांक नोंदवावा, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या नव्या व्यवस्थेमुळे तत्काळ तिकीट बुकिंगमध्ये पारदर्शकता वाढेल आणि गैरवापराला आळा बसण्यास मदत होईल.

Comments
Add Comment

लक्ष द्या ! लग्नपत्रिकेवर वधू-वराची जन्मतारीख टाकणे अनिवार्य होणार ? नेमकी शिफारस काय ?

लग्न म्हणजे दोन व्यक्तींचे , दोन कुटुंबाचे मिलन. पण वयोमर्यादा अपूर्ण असली तरी अनेक लग्न होतात, अर्थात बालविवाह

Crime : पत्नीचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल, मित्रावर संशय गेला; पारा चढला अन मित्रानंच मित्राचा काटा काढला

Beed Crime : बीड जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांनी पुन्हा एकदा डोके वर काढल्याचं चित्र आहे. बीडमध्ये मैत्रीला काळिमा

Pratap Sarnaik : रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी बंधनकारकच; परिवहन मंत्र्यांची ठाम भूमिका; आजच्या बैठकीत काय घडलं ?

(Marathi Language Compulsory Taxi-Auto ) : आगामी 1 मे महाराष्ट्र दिनापासून परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणे अनिवार्य

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना ₹१५०० येणार की ₹३००० येणार? अपडेट काय ?

Ladki Bahin Yojana: राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना म्हणून ओळखली जाणारी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अनेक गरजू

Maharashtra Heat Wave : राज्यभर उष्णतेचा कहर; अकोल्यात ४५.६ अंशांची नोंद, पुढील दोन दिवसांत आणखी वाढीचा अंदाज

महाराष्ट्रात सध्या उन्हाचा प्रचंड तडाखा जाणवत असून राज्यभर तापमानाने अक्षरशः उच्चांक गाठला आहे. मराठवाडा,

Heat Wave: पुढील तीन दिवस जरा जपूनच ! राज्यातील 'हे' शहर जगातील सर्वाधिक उष्ण शहरांच्या यादीत; नाशिकची स्थिती काय ?

Maharashtra Weather Update : राज्यभरात तपमानानं कहर केल्याचे चित्र आहे. अशातच प्रादेशिक हवामान विभागाने वर्तविलेल्या