भारताला मोठ्या लढाईत गुंतवून ठेवण्याचा डाव ?

कोलकाता : बांगलादेशमध्ये एकीकडे जमिनीवर भारतविरोधी आंदोलनांना धार येत असतानाच, दुसरीकडे समुद्रातही तणाव वाढताना दिसत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून भारताने एक असामान्य आणि चिंताजनक पॅटर्न नोंदवला आहे. बंगालच्या उपसागरात सातत्याने मोठ्या संख्येने बांगलादेशच्या मासेमारी नौका भारतीय जलसीमेत प्रवेश करत असल्याचे निदर्शनास आले आहे.


१५ डिसेंबर रोजी हा तणाव अधिक तीव्र झाला, जेव्हा बांगलादेश नौसेनेच्या एका गस्ती जहाजाने १६ भारतीय मच्छिमारांना घेऊन जाणाऱ्या ट्रॉलरला धडक दिली. या धडकेमुळे ट्रॉलर उलटला आणि मच्छिमारांचे प्राण धोक्यात आले. सुदैवाने सर्व मच्छिमारांना वाचवण्यात यश आले. ही घटना फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशमध्ये भारतविरोधी वातावरण तापले असताना घडल्याने तिचे गांभीर्य अधिक वाढले आहे.


शेख हसीना सरकारच्या सत्तांतरानंतर मोहम्मद यूनुस यांच्या नेतृत्वाखालील बांगलादेश सरकारने विशेषतः बंगालच्या उपसागरात आपला प्रभाव वाढवण्याचे प्रयत्न सुरू केल्याचे चित्र आहे. यूनुस यांनी यापूर्वी संपूर्ण क्षेत्रातील महासागराचा संरक्षक बांगलादेश असल्याचा दावा केला होता. या वक्तव्यामुळे भारताच्या धोरणात्मक व सागरी सुरक्षेच्या दृष्टीने चिंता व्यक्त केली जात आहे.


या घडामोडींमुळे आंतरराष्ट्रीय सागरी सीमेच्या जवळ मासेमारी करणाऱ्या भारतीय मच्छिमारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सोमवारी ही चिंता आणखी वाढली, जेव्हा पश्चिम बंगालमधील १६ मच्छिमारांना घेऊन जाणाऱ्या भारतीय ट्रॉलरला सीमेजवळ बांगलादेश नौसेनेच्या जहाजाने धडक दिल्याचा आरोप करण्यात आला.


संबंधित बांगलादेशी जहाजाने रात्रीच्या वेळी आपली दिवे बंद ठेवले होते. त्यामुळे भारतीय ट्रॉलरला ते जहाज वेळेत दिसले नाही आणि अपघात घडला, असा दावा केला जात आहे. या घटनेनंतर भारतीय सुरक्षा यंत्रणांनी सागरी हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यास सुरुवात केली असून, मच्छिमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.


दरम्यान, भारत सरकारकडून या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेतला जात असून सागरी सीमांवरील सुरक्षेच्या उपाययोजना अधिक कडक करण्याचा विचार सुरू आहे. या घडामोडींमुळे भारत-बांगलादेश संबंधांमध्ये नव्या तणावाची शक्यता निर्माण झाली आहे.

Comments
Add Comment

Pritesh Walia : भारतीय वंशाचे जॅझ संगीतकार प्रितेश वालिया अमेरिकेत ICEच्या ताब्यातून जामिनावर मुक्त

नवी दिल्ली :  भारतीय वंशाचे जॅझ संगीतकार प्रितेश वालिया यांची अमेरिकेत ICEच्या ताब्यात तब्बल 14 दिवस राहिल्यानंतर

Jharkhand Students Protest : 24 दिवसांच्या आंदोलनानंतर झारखंड सरकारचा मोठा निर्णय; JSSC-CGL परीक्षा रद्द

झारखंड : झारखंडमध्ये तब्बल 24 दिवसांपासून सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे. मुख्यमंत्री

Plastic Waste : भारतापुढे दररोज १९ हजार टन प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे आव्हान

नवी दिल्ली : दुधाची पाकिटे, चिप्सची वेष्टणे आणि ऑनलाइन खरेदीचे पॅकेजिंग यामुळे देशात दररोज सुमारे १९ हजार टन

UP Crime News : प्रेयसीच्या वाढदिवसाचा केक कापला अन् प्रियकराने मित्रांसोबत मिळून रचला भयानक खेळ; उत्तर प्रदेश हादरले!

उत्तर प्रदेश : विश्वासाला काळिमा फासणारी आणि मन सुन्न करणारी एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपूर

Robot Waiter Murthal : मुरथलच्या धाब्यावर रोबोट वेटरची एन्ट्री! हरियाणातील 'रेशम धाब्या'चा भन्नाट प्रयोग, व्हिडिओ व्हायरल

मुरथल : हरियाणातील मुरथल हे ठिकाण आपल्या चविष्ट आणि गरमागरम पराठ्यांसाठी तसेच पारंपरिक चवीसाठी देशभरात

Shahzad Bhatti Network : केंद्र सरकारची मोठी कारवाई : ISI समर्थित ‘शहजाद भट्टी नेटवर्क’चा पर्दाफाश; १४ राज्यांतून २५३ जण ताब्यात

नवी दिल्ली : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात मोठ्या दहशतवादी कटाचा पर्दाफाश केल्याचा दावा केंद्र