भारताला मोठ्या लढाईत गुंतवून ठेवण्याचा डाव ?

कोलकाता : बांगलादेशमध्ये एकीकडे जमिनीवर भारतविरोधी आंदोलनांना धार येत असतानाच, दुसरीकडे समुद्रातही तणाव वाढताना दिसत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून भारताने एक असामान्य आणि चिंताजनक पॅटर्न नोंदवला आहे. बंगालच्या उपसागरात सातत्याने मोठ्या संख्येने बांगलादेशच्या मासेमारी नौका भारतीय जलसीमेत प्रवेश करत असल्याचे निदर्शनास आले आहे.


१५ डिसेंबर रोजी हा तणाव अधिक तीव्र झाला, जेव्हा बांगलादेश नौसेनेच्या एका गस्ती जहाजाने १६ भारतीय मच्छिमारांना घेऊन जाणाऱ्या ट्रॉलरला धडक दिली. या धडकेमुळे ट्रॉलर उलटला आणि मच्छिमारांचे प्राण धोक्यात आले. सुदैवाने सर्व मच्छिमारांना वाचवण्यात यश आले. ही घटना फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशमध्ये भारतविरोधी वातावरण तापले असताना घडल्याने तिचे गांभीर्य अधिक वाढले आहे.


शेख हसीना सरकारच्या सत्तांतरानंतर मोहम्मद यूनुस यांच्या नेतृत्वाखालील बांगलादेश सरकारने विशेषतः बंगालच्या उपसागरात आपला प्रभाव वाढवण्याचे प्रयत्न सुरू केल्याचे चित्र आहे. यूनुस यांनी यापूर्वी संपूर्ण क्षेत्रातील महासागराचा संरक्षक बांगलादेश असल्याचा दावा केला होता. या वक्तव्यामुळे भारताच्या धोरणात्मक व सागरी सुरक्षेच्या दृष्टीने चिंता व्यक्त केली जात आहे.


या घडामोडींमुळे आंतरराष्ट्रीय सागरी सीमेच्या जवळ मासेमारी करणाऱ्या भारतीय मच्छिमारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सोमवारी ही चिंता आणखी वाढली, जेव्हा पश्चिम बंगालमधील १६ मच्छिमारांना घेऊन जाणाऱ्या भारतीय ट्रॉलरला सीमेजवळ बांगलादेश नौसेनेच्या जहाजाने धडक दिल्याचा आरोप करण्यात आला.


संबंधित बांगलादेशी जहाजाने रात्रीच्या वेळी आपली दिवे बंद ठेवले होते. त्यामुळे भारतीय ट्रॉलरला ते जहाज वेळेत दिसले नाही आणि अपघात घडला, असा दावा केला जात आहे. या घटनेनंतर भारतीय सुरक्षा यंत्रणांनी सागरी हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यास सुरुवात केली असून, मच्छिमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.


दरम्यान, भारत सरकारकडून या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेतला जात असून सागरी सीमांवरील सुरक्षेच्या उपाययोजना अधिक कडक करण्याचा विचार सुरू आहे. या घडामोडींमुळे भारत-बांगलादेश संबंधांमध्ये नव्या तणावाची शक्यता निर्माण झाली आहे.

Comments
Add Comment

Karnataka : पादचारी पूल कोसळला, आठ जखमी

मंगळुरू : कर्नाटकमध्ये दक्षिण कन्नड जिल्ह्यातील मूडबिद्री तालुक्यात एक अरुंद पादचारी पूल कोसळला. या

West Bengal : पश्चिम बंगालमध्ये ठिकठिकाणी ईडीच्या धाडी

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वीच अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) राजधानी कोलकात्यात

Indian History : सापडले दोन हजार वर्षे जुने तीन किलो वजनाचे प्राचीन ताम्रपत्र

बिलासपूर : छत्तीसगडच्या बिलासपूर येथील मल्हार परिसरातील रहिवासी संजीव पांडेय यांच्या ताब्यातून सुमारे २०००

Delhi Airport : दिल्ली विमानतळावर स्विस एअर विमानाच्या इंजिनाला आग, ६ प्रवासी जखमी

दिल्लीतील आयजीआय विमानतळावर स्विस एअरच्या एलएक्स १४७ या विमानाच्या टेकऑफदरम्यान विमानाच्या इंजिनमध्ये अचानक

Monsoon 2026 : आनंद वार्ता! यंदा मान्सून लवकर येणार; १८ ते २५ मे दरम्यान पावसाचे आगमन होणार

- युरोपीयन मध्यम श्रेणी हवामान अंदाज केंद्राचा अंदाज एप्रिलमध्ये उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांनी बेजार

Blast : अखिलेश यादव, राहुल गांधींचा पुतळा जाळताना स्फोट, भाजप महिला आमदार जखमी

बहराइच : उत्तर प्रदेशच्या बहराइचमध्ये भाजपाच्या 'महिला जनआक्रोश मोर्चा' दरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे.