भारताला मोठ्या लढाईत गुंतवून ठेवण्याचा डाव ?

कोलकाता : बांगलादेशमध्ये एकीकडे जमिनीवर भारतविरोधी आंदोलनांना धार येत असतानाच, दुसरीकडे समुद्रातही तणाव वाढताना दिसत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून भारताने एक असामान्य आणि चिंताजनक पॅटर्न नोंदवला आहे. बंगालच्या उपसागरात सातत्याने मोठ्या संख्येने बांगलादेशच्या मासेमारी नौका भारतीय जलसीमेत प्रवेश करत असल्याचे निदर्शनास आले आहे.


१५ डिसेंबर रोजी हा तणाव अधिक तीव्र झाला, जेव्हा बांगलादेश नौसेनेच्या एका गस्ती जहाजाने १६ भारतीय मच्छिमारांना घेऊन जाणाऱ्या ट्रॉलरला धडक दिली. या धडकेमुळे ट्रॉलर उलटला आणि मच्छिमारांचे प्राण धोक्यात आले. सुदैवाने सर्व मच्छिमारांना वाचवण्यात यश आले. ही घटना फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशमध्ये भारतविरोधी वातावरण तापले असताना घडल्याने तिचे गांभीर्य अधिक वाढले आहे.


शेख हसीना सरकारच्या सत्तांतरानंतर मोहम्मद यूनुस यांच्या नेतृत्वाखालील बांगलादेश सरकारने विशेषतः बंगालच्या उपसागरात आपला प्रभाव वाढवण्याचे प्रयत्न सुरू केल्याचे चित्र आहे. यूनुस यांनी यापूर्वी संपूर्ण क्षेत्रातील महासागराचा संरक्षक बांगलादेश असल्याचा दावा केला होता. या वक्तव्यामुळे भारताच्या धोरणात्मक व सागरी सुरक्षेच्या दृष्टीने चिंता व्यक्त केली जात आहे.


या घडामोडींमुळे आंतरराष्ट्रीय सागरी सीमेच्या जवळ मासेमारी करणाऱ्या भारतीय मच्छिमारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सोमवारी ही चिंता आणखी वाढली, जेव्हा पश्चिम बंगालमधील १६ मच्छिमारांना घेऊन जाणाऱ्या भारतीय ट्रॉलरला सीमेजवळ बांगलादेश नौसेनेच्या जहाजाने धडक दिल्याचा आरोप करण्यात आला.


संबंधित बांगलादेशी जहाजाने रात्रीच्या वेळी आपली दिवे बंद ठेवले होते. त्यामुळे भारतीय ट्रॉलरला ते जहाज वेळेत दिसले नाही आणि अपघात घडला, असा दावा केला जात आहे. या घटनेनंतर भारतीय सुरक्षा यंत्रणांनी सागरी हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यास सुरुवात केली असून, मच्छिमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.


दरम्यान, भारत सरकारकडून या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेतला जात असून सागरी सीमांवरील सुरक्षेच्या उपाययोजना अधिक कडक करण्याचा विचार सुरू आहे. या घडामोडींमुळे भारत-बांगलादेश संबंधांमध्ये नव्या तणावाची शक्यता निर्माण झाली आहे.

Comments
Add Comment

Madhya Pradesh: अनुपपूरमध्ये मोठा अपघात; तीन मजली इमारत कोसळून एकाचा मृत्यू, अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

मध्य प्रदेश: मध्य प्रदेशातील अनुपपूर येथे एक मोठी दुर्घटना घडली आहे. तीन मजली इमारत अचानक कोसळली. या घटनेत एका

Uttar Pradesh: मेड असल्याचे सांगत महिलेने केले घर साफ; स्त्रीला बेशुद्ध करून...

उत्तर प्रदेश: ग्रेटर नोएडातील एका सोसायटीत वृद्ध महिलेला गुंगीचे औषध देऊन तिच्या घरात चोरी करण्यात आली.

Iranian crude oil : इराणी कच्च्या तेलाचा कार्गो चीनकडे वळवला गेल्याच्या बातम्या तथ्यात्मकदृष्ट्या चुकीच्या, सरकारचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली : केंद्र सरकारने इराणी कच्च्या तेलाचा एक कार्गो पेमेंटशी संबंधित अडचणींमुळे गुजरातमधील वाडीनार

Green Sanvi Vessel: ग्रीन सान्वी जहाज होर्मुझच्या सामुद्रधुनीतून आणत असलेला एलपीजी गॅस किती दिवस पुरेल?

नवी दिल्ली: मध्य पूर्वेतील पुरवठ्याच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे.

बाजारात बनावट आंब्यांचा सुळसुळाट; तब्बल २०० किलो बनावट आंबे जप्त

हैद्राबाद : उन्हाळा सुरु झाला की स्वागत केलं जात ते फळांचा राजा आंब्याचं, कारण वर्षभरातून फक्त उन्हळ्यातच

Air India Airlines : एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसची पश्चिम आशियातून ४२ विमानसेवा सुरु होणार

पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर, टाटाच्या नेतृत्वाखालील एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेस या पश्चिम