नितीश कुमारांनी हिजाब ओढल्याचा व्हिडीओ व्हायरल; महिलेने २४ तासातच घेतला टोकाचा निर्णय

पटना : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या एका कृतीमुळे सुरू झालेला वाद आता गंभीर वळणावर पोहोचला आहे. सरकारी डॉक्टरांना नियुक्तीपत्र देण्याच्या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्र्यांनी महिला डॉक्टर आयुष नुसरत परवीन यांचा हिजाब ओढल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला होता. या घटनेनंतर अवघ्या २४ तासांत संबंधित डॉक्टर महिलेने बिहार सरकारची नोकरी न करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.


या घटनेमुळे आपण मानसिक तणावात असल्याचे आयुष नुसरत परवीन यांनी सांगितले. त्यांनी बिहार कायमचे सोडल्याचेही स्पष्ट केले आहे. या प्रकारामुळे त्यांच्या सन्मानाला धक्का बसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.



नेमकं प्रकरण काय?


बिहारमध्ये नुकताच सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मुख्यमंत्री नितीश कुमार नियुक्तीपत्र देत असताना आयुष नुसरत परवीन यांचा हिजाब ओढल्याचा प्रकार घडला. आणि तो सोशल मीडियावर व्हायरल झाला.


व्हिडीओ व्हायरल होताच या प्रकारावर मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली. अनेकांनी हा प्रकार असंवेदनशील असल्याचे म्हटले असून, महिला डॉक्टरच्या वैयक्तिक आणि धार्मिक सन्मानाचा प्रश्न उपस्थित केला आहे. या प्रकरणामुळे बिहारच्या राजकारणातही खळबळ उडाली आहे. दरम्यान, या संपूर्ण घटनेनंतर आयुष नुसरत परवीन यांनी बिहार सरकारची नोकरी स्वीकारणार नसल्याचा निर्णय घेतला असून, पुढील वाटचाल काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

Operation White Hammer : आंध्र प्रदेशात ४७ कोटींचे अंमली पदार्थ जप्त; दोघांना अटक

सिंथेटिक ड्रग्जच्या बेकायदेशीर उत्पादनाविरोधात महत्त्वपूर्ण कारवाई करत, महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय)

फास्टॅग वार्षिक पास १ एप्रिलपासून महाग होणार

नवी दिल्ली : पुढील महिन्यापासून म्हणजेच १ एप्रिलपासून राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना थोडा

युद्धामुळे महागणार विमान प्रवास?

नवी दिल्ली : मध्य पूर्वेतील तणावाचे चटके आता विमान प्रवासालाही बसणार आहेत. इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यात

Dharmantar Bandi Kayda : सावधान! बळजबरीने किंवा आमिषाने धर्मांतर केल्यास...राज्य सरकारचा धर्मांतर बंदी कायद्याचा नवा प्रस्ताव सादर

मुंबई : महाराष्ट्र सरकारने राज्यातील सक्तीच्या आणि फसव्या धर्मांतरांना लगाम घालण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे.

भारताच्या जहाजांना धोका नाही

इराणकडून मैत्रीचा हात पुढे नवी दिल्ली : पश्चिम आशियात इराण-इस्रायल तणावामुळे जागतिक सागरी व्यापार धोक्यात आला

इराण युद्धामुळे भरपूर नफा ?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा नवी दिल्ली  : ज्या देशांमध्ये युद्ध होते, त्यांचे अतोनात