भारतात अणुऊर्जा क्षेत्रात खासगी गुंतवणुकीला परवानगी देणाऱ्या विधेयकाला संसदेची मंजुरी


नवी दिल्ली : भारतात अणुऊर्जा क्षेत्रात खासगी गुंतवणुकीला परवानगी देणाऱ्या विधेयकाला राज्यसभेची मंजुरी मिळाली आहे. यामुळे देशातील कडक नियमन असलेल्या नागरी अणुऊर्जा क्षेत्रात खासगी गुंतवणुकीला परवानगी मिळाली आहे. हे विधेयक बुधवारी लोकसभेत मंजूर झाले आहे. आता राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर या विधेयकाचे कायद्यात रुपांतर होणार आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स पोस्ट करुन विधेयकाला संसदेच्या दोन्ही सभागृहांची मंजुरी मिळाल्याबाबत आनंद व्यक्त केला. हा भारताच्या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात 'परिवर्तनाचा क्षण' असे पंतप्रधान मोदी यांनी एक्स पोस्टमध्ये नमूद केले आहे. "संसदेच्या दोन्ही सभागृहांनी शांती विधेयक मंजूर करणे हा आपल्या तंत्रज्ञान परिसंस्थेसाठी एक परिवर्तनाचा क्षण आहे. ते मंजूर करण्यासाठी मदत करणाऱ्या खासदारांचा मी आभारी आहे. एआयला सुरक्षितपणे सक्षम करण्यापासून ते हरित उत्पादन सक्षम करण्यापर्यंत, हा देश आणि जगासाठी स्वच्छ-ऊर्जेच्या स्वरुपात भविष्याला मोठी चालना देणार आहे. यामुळे खासगी क्षेत्र आणि आपल्या तरुणांसाठी असंख्य संधी देखील खुल्या होणार आहेत. गुंतवणूक, नवोन्मेष आणि मेक इन इंडियासाठी ही सर्वोत्तम वेळ आहे"; असेही पंतप्रधान मोदींनी एक्स पोस्टमध्ये नमूद केले आहे.


याआधी राज्यसभेत चर्चेला उत्तर देताना, अणुऊर्जा विभागाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह म्हणाले की, हे विधेयक भारताला अणुऊर्जेमध्ये स्वावलंबी बनवण्याच्या आणि इतर ऊर्जा स्रोतांवरील अवलंबित्व कमी करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. ते म्हणाले की, अणुऊर्जा २४x७ विश्वसनीय वीज प्रदान करते, तर इतर अक्षय ऊर्जा स्रोतांमध्ये ही सातत्यता नसते. भारतात सध्या ८.९ गीगावॉट अणुऊर्जा निर्मिती होते. आता २०४७ पर्यंत देश १०० गीगावॉट अणुऊर्जा निर्मिती करण्याचे लक्ष्य ठेवून काम करणार आहे.


Comments
Add Comment

Actor Satendra Soni : 'लापता लेडीज' फेम सत्येंद्र सोनीचा धक्कादायक आरोप! मानधन मागितल्यावर मारहाण, हॉटेलमधून...

मुंबई : 'लापता लेडीज' चित्रपटातील 'छोटू' या भूमिकेमुळे चर्चेत आलेला अभिनेता सत्येंद्र सोनी (Actor Satendra Soni) सध्या एका

1 July New Rules : १ जुलैपासून बदलणार अनेक आर्थिक नियम; जाणून घ्या तुमच्या खिश्यावर परिणाम होणार की नाही?

१ जुलै २०२६ पासून देशभरात काही महत्त्वाचे आर्थिक आणि बँकिंग नियम बदलणार आहेत. या बदलांचा परिणाम आधार कार्डधारक,

Golden Triangle : परदेशात २५ मराठी तरुणांचे हाल; बीडच्या तरुणाने केला रॅकेटचा पर्दाफाश

बीड: परदेशात मोठ्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून महाराष्ट्रातील २५ तरुणांची मानवी तस्करी केल्याचा धक्कादायक

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात ; ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू

अमरावती : समृद्धी महामार्गावरील अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली  आहे. महामार्ग जेवढा सोईस्कर आणि सुखकर

Raigad Ropeway: रायगडावर जाणे होणार स्वस्त! रोपवेचे तिकीट ३५० रुपयांवरून ५०-१०० रुपयांपर्यंत कमी होणार

रायगड : किल्ले रायगडावर जाणाऱ्या शिवभक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र सरकारने रायगडावर नवीन रोपवे

अनंत अंबानींच्या भक्तीची भाविकांमध्ये चर्चा; रिलायन्स इंडस्ट्रीकडून तिरूपतीच्या बालाजी मंदिराला २७ कोटींची भेट !

तिरुपती : आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक असलेल्या मुकेश अंबानी यांचे सुपुत्र आणि रिलायन्स