Ashish Shelar : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा बरी, विचारांवर नेहमीच खरी!' आशिष शेलारांची कवितेतून संजय राऊतांवर जहरी टीका

राऊतांच्या पुनरागमनावर मंत्री शेलारांची उपरोधिक टोलेबाजी


मुंबई : महाराष्ट्र राज्याचे राजकारण सध्या आरोप-प्रत्यारोपांनी तापलेले असतानाच, भाजपचे दिग्गज नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्यावर 'काव्यप्रहार' केला आहे. संजय राऊत यांनी प्रकृतीच्या कारणास्तव काही काळ विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या सकाळच्या पत्रकार परिषदा सुरू केल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर शेलारांनी ट्विटरच्या (X) माध्यमातून एक उपरोधिक कविता शेअर करत राऊतांच्या कार्यशैलीवर आणि त्यांच्या भाषेवर जोरदार टीका केली आहे.



"सकाळचा भोंगा पुन्हा सुरू झाला" आशिष शेलार यांनी आपल्या कवितेत संजय राऊत यांच्या सकाळच्या पत्रकार परिषदांचा उल्लेख 'सकाळचा भोंगा' असा केला आहे. राऊत यांनी "मी तीन महिन्यांनी परत येईन" असे म्हटले होते, मात्र ते एका महिन्याच्या आतच परतल्याचा टोला शेलारांनी लगावला. "विश्वविख्यात प्रवक्त्यांना ठणठणीत पाहून बरे वाटले, पण आता महाराष्ट्राचा सकाळी सकाळी चॅनेल बदलण्याचा हंगाम परत आला आहे," असे म्हणत त्यांनी राऊतांच्या भाषणांतील कंटाळवाणेपणावर बोट ठेवले.

हास्यजत्रेची तुलना आणि 'उखाड दिया'चा उल्लेख शेलार यांनी आपल्या कवितेत लोकप्रिय विनोदी कार्यक्रम 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' याचा संदर्भ दिला आहे. ते म्हणतात, "यांना ऐकण्यापेक्षा महाराष्ट्राची हास्यजत्रा बरी, विनोदी असली तरी ती विचारांवर नेहमीच खरी!" संजय राऊत यांच्या आक्रमक भाषेवर टीका करताना शेलार पुढे म्हणतात की, हे प्रवक्ते खूप बोलतात, कोणाचेही नाव घेतात आणि 'उखाड दिया'ची गर्जना करतात. मात्र, अशा गर्जना करून ते स्वतःच्याच पक्षाला उखडून टाकत असल्याचा दावा शेलारांनी केला आहे.

२९ महापालिकांतील पराभवाचे भाकीत कवितेच्या शेवटी शेलारांनी राजकीय इशाराही दिला आहे. संजय राऊत हे त्यांच्या पक्षाचे 'हुकमाचे एक्के' असल्याचे म्हटले जाते, पण हे 'विश्वविख्यात' प्रवक्ते जितके जास्त बोलतील, तितका त्यांच्या पक्षाचा आगामी २९ महापालिकांमध्ये पराभव पक्का आहे, असा घणाघात शेलारांनी केला आहे. राजकीय वर्तुळात चर्चा आशिष शेलार यांची ही कविता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून भाजप समर्थकांकडून तिला दाद मिळत आहे. तर दुसरीकडे, ठाकरे गटाकडून या टीकेला काय उत्तर मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शेलार आणि राऊत यांच्यातील हा 'ट्विटर वॉर' आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
Comments
Add Comment

मुंबई वॉटर मेट्रो जलवाहतूक प्रकल्पाला गती देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

मुंबई : "मुंबई महानगर प्रदेशात जलप्रवासी वाहतुकीसाठी वॉटर मेट्रो प्रकल्प तीन टप्प्यात कार्यान्वित करण्यात

आमदार हेमंत पाटील यांनी मांडली 'लव्ह जिहाद' आणि 'लोकसंख्या नियंत्रणाची' आग्रही भूमिका

विधान परिषदेत धर्मांतर विरोधी विधेयकावर चर्चा मुंबई : विधान परिषदेत आज धर्मांतर विरोधी विधेयकावर अत्यंत

धर्मांतर हा श्रद्धेचा विषय, व्यवहाराचा नाही!"; विधान परिषदेत आमदार प्रवीण दरेकरांची ठाम भूमिका

मुंबई: "धर्म हा केवळ मानवी श्रद्धेचा भाग असून त्याचा व्यवहारासाठी किंवा स्वार्थासाठी वापर करणे चुकीचे आहे.

राज्यातील कालबाह्य ८० कायदे रद्द

विधेयक मंजूर; मुंबई फटक्यांची शिक्षा रद्द करण्याचा अधिनियम रद्द मुंबई : महाराष्ट्रातील कालबाह्य झालेले ८०

नायजेरियन नागरिकांविरोधात लवकरच धडक मोहीम - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

वैध कागदपत्रे नसलेल्यांना हद्दपार करणार मुंबई : राज्यात विशेषतः मुंबईनजीकच्या उपनगरांमध्ये बेकायदेशीरपणे

ड्रग्ज तस्करी रोखण्यासाठी कारवाईची वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षे करणार

मुंबई : अमली पदार्थांच्या तस्करीसाठी मोठ्या प्रमाणात अल्पवयीन मुलांचा उपयोग केला जात आहे. त्यामुळे याला पायबंद