डिजिटल प्लॅटफॉर्मवर सरकारचा चाप

अश्लीलता आणि सायबर गुन्ह्यांविरुद्ध कारवाई होणार


मुंबई : सोशल मीडिया आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर वाढणारी अश्लीलता, अफवा आणि ऑनलाइन सायबर गुन्ह्यांना लगाम घालण्यासाठी केंद्र सरकारने आता कंबर कसली आहे. 'माहिती तंत्रज्ञान कायदा' (आयटी अॅक्ट) आणि 'आयटी नियम २०२१' च्या माध्यमातून डिजिटल विश्वात बेकायदेशीर सामग्री पसरवणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर चौकट तयार करण्यात आली आहे.


नवीन नियमांनुसार, ज्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे ५ लाखांपेक्षा जास्त वापरकर्ते आहेत, त्यांना आता भारतात स्थानिक तक्रार निवारण अधिकारी, मुख्य अनुपालन अधिकारी आणि नोडल संपर्क व्यक्तींची नियुक्ती करणे अनिवार्य आहे. तसेच, दरमहा 'अनुपालन अहवाल' प्रसिद्ध करून किती तक्रारी आल्या आणि त्यावर काय कारवाई झाली, याची माहिती देणेही बंधनकारक करण्यात आले आहे. फेसबुक, एक्स (ट्विटर), इन्स्टाग्राम यांसारख्या मध्यस्थांवर आता 'योग्य ती काळजी' घेण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. जर एखाद्या प्लॅटफॉर्मवर बेकायदेशीर किंवा हानिकारक मजकूर आढळला, तर तो त्वरित हटवणे ही त्या कंपनीची कायदेशीर जबाबदारी असेल. नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित कंपन्यांना त्यांचे 'सेफ हार्बर' संरक्षण (कायदेशीर संरक्षण) गमवावे लागू शकते. या निर्णयामुळे इंटरनेटचा वापर करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांची सुरक्षा वाढणार असून, सायबर गुन्हेगारांवर वचक बसण्यास मदत होणार आहे.


गुन्हेगारांवर होणार थेट कारवाई


आयटी कायद्यातील विविध कलमांनुसार आता सायबर गुन्ह्यांसाठी कडक शिक्षेची तरतूद आहे. कलम ६६ ई: खाजगी गोपनीयतेचे उल्लंघन केल्यास दंड आणि शिक्षा, कलम ६७, ६७ अ, ६७ ब: अश्लील किंवा लैंगिकदृष्ट्या स्पष्ट मजकूर प्रसारित केल्यास कठोर कारवाई, कलम ८०: पोलिसांना संशयिताचा शोध घेण्याचे आणि विना वॉरंट अटक करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.

Comments
Add Comment

अवैध प्रवासी वाहतूक रोखण्यासाठी १ मार्चपासून राज्यभर धडक मोहीम - परिवहन मंत्र्यांचे आदेश

- नियमोल्लंघन करणाऱ्या वाहनांवर होणार जप्तीची कारवाई मुंबई : राज्यभरात फोफावलेल्या अवैध प्रवासी वाहतुकीमुळे

Artificial Flowers : कृत्रिम फुलांचा वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

- शासन निर्णय काढून कारवाईबाबत स्पष्टता आणणार मुंबई : राज्यातील लग्नसोहळे आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये वाढणारा

अजित पवार विमान अपघात प्रकरणी 'तो' अहवाल आज येणार! तांत्रिक बिघाड की मोठा घातपात ?

मुंबई : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघाताला आज एक महिना पूर्ण होत आहे. या अत्यंत

कृत्रिम फुले आणि खेळण्यांच्या रंगांमुळे कर्करोगाचा धोका; विक्रम पाचपुते यांचा इशारा

मुंबई: विधीमंडळाच्या अधिवेशनादरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी एक गंभीर

Holi Special ST Buses : होळीसाठी धावणार एसटीच्या १९३ बस; महामंडळातर्फे विशेष सेवा जारी

मुंबई : राज्यभरात होळीच्या सणाची तयारी सुरु झालीये. देवांच्या पालख्या घरोघरी येऊ लागल्या आहेत, त्यामुळे

शनिवारपासून सलग पाच दिवस बँका राहणार बंद

मुंबई: तुम्ही जर बँकेत जाऊन काही काम करायचा विचार करत असाल किंवा लोन किंवा इतर काही कामं तुमची राहिली असतील तर