भाजप आमदार राम कदमांनी पाच वर्षांनी कापले केस, कारण जाणून घ्याल तर चक्रावून जाल


मुंबई : भारतीय जनता पक्षाचे घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार राम कदम यांनी तब्बल पाच वर्षांनंतर सार्वजनिक ठिकाणी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत केस कापले. केस कपाताना माईक हातात घेऊन राम कदम यांनी केस पाच वर्ष वाढवण्याचे कारण स्वतःच जाहीर केले.





जोपर्यंत घाटकोपरची पाण्याची समस्या सुटत नाही तोपर्यंत केस कापणार नाही, असा संकल्प राम कदम यांनी केला होता. हा संकल्प पूर्ण झाला म्हणून तब्बल पाच वर्षांनंतर घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार राम कदम यांनी केस कापत असल्याचे जाहीर केले.


मुंबईच्या पूर्व उपनगरांमध्ये घाटकोपरचा समावेश होतो. या घाटकोपरमध्ये लोकसंख्या झपाट्याने वाढत असताना एकच चौदा लाख लिटरची पाण्याची मोठी टाकी होती. यामुळे स्थानिकांना पाणी टंचाईच्या समस्येचा वारंवार सामना करावा लागत होता. घाटकोपरमध्ये पाण्याची गंभीर समस्या होती. ही समस्या सुटेपर्यंत केस कापणार नाही, असा संकल्प राम कदम यांनी केला. यानंतर पाठपुरावा करुन प्रशासकीय यंत्रणेच्या संपर्कात राहून राम कदम यांनी घाटकोपरसाठी २२ लाख लिटर क्षमतेची पाण्याची महाकाय टाकी उभारण्याचा निर्णय घेतला. भांडुप पासून घाटकोपरपर्यंत चार किमी. लांबीची जलवाहिनी टाकून नागरिकांना पाणी उपलब्ध होईल अशी व्यवस्था केली. आता ही व्यवस्था मार्गी लागत असल्याचे पाहून राम कदम यांनी केस कापण्याचा निर्णय घेतला.


महाकाय टाकीमुळे घाटकोपर पश्चिमची पाण्याची समस्या सुटणार असल्याचे राम कदम म्हणाले. जनतेच्या प्रश्नांना सदैव प्राधान्य देतो आणि देणार असेही त्यांनी सांगितले. राम कदमांच्या कार्याचे नागरिक कौतुक करत आहेत.


Comments
Add Comment

महावितरणचा 'आयपीओ' येणार - उत्पन्न वाढीसाठी मुख्यमंत्र्यांनी केली सूचना; 'कॉर्पोरेट गव्हर्नन्स' चा अंमल करणार

मुंबई : ऊर्जा क्षेत्रात कार्यरत असलेल्या बाजारपेठेचा लाभ उठवित महावितरणने आयपीओ (इनिशियल पब्लिक ऑफरिंग) आणत

Kokan Railway: कोकणकरांसाठी आनंदाची बातमी! शिमग्यासाठी धावणार खास विनाआरक्षित 'ही' ट्रेन

मुंबई : कोकणकरांसाठी महत्वाचा सण म्हणजे शिमगा, राज्याच्या कानाकोपऱ्यातून चाकरमानी आपल्या गावी शिमग्यासाठी

दहिसर नदी प्रदूषण रोखण्यासाठीच्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार

मुंबई : दहिसर नदीतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार आहे,

घर खरेदीत फसवणूक करणाऱ्या बिल्डरांची मालमत्ता जप्त होणार

मुंबई : राज्यात आपले गृहस्वप्न साकार करू पाहणाऱ्या हजारो सर्वसामान्यांची बिल्डरांकडून होणारी फसवणूक आता राज्य

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ द्या! - भाजप आमदार प्रसाद लाड यांची विधान परिषदेत मागणी

सकारात्मक निर्णय घेण्याचे संसदीय कार्यमंत्र्यांचे आश्वासन मुंबई : भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील

मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाचे नामकरण; आता होणार 'पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर' पूल

- मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाच्या पुनर्बांधणी कामाचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण मुंबई :