भाजप आमदार राम कदमांनी पाच वर्षांनी कापले केस, कारण जाणून घ्याल तर चक्रावून जाल


मुंबई : भारतीय जनता पक्षाचे घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार राम कदम यांनी तब्बल पाच वर्षांनंतर सार्वजनिक ठिकाणी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत केस कापले. केस कपाताना माईक हातात घेऊन राम कदम यांनी केस पाच वर्ष वाढवण्याचे कारण स्वतःच जाहीर केले.





जोपर्यंत घाटकोपरची पाण्याची समस्या सुटत नाही तोपर्यंत केस कापणार नाही, असा संकल्प राम कदम यांनी केला होता. हा संकल्प पूर्ण झाला म्हणून तब्बल पाच वर्षांनंतर घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार राम कदम यांनी केस कापत असल्याचे जाहीर केले.


मुंबईच्या पूर्व उपनगरांमध्ये घाटकोपरचा समावेश होतो. या घाटकोपरमध्ये लोकसंख्या झपाट्याने वाढत असताना एकच चौदा लाख लिटरची पाण्याची मोठी टाकी होती. यामुळे स्थानिकांना पाणी टंचाईच्या समस्येचा वारंवार सामना करावा लागत होता. घाटकोपरमध्ये पाण्याची गंभीर समस्या होती. ही समस्या सुटेपर्यंत केस कापणार नाही, असा संकल्प राम कदम यांनी केला. यानंतर पाठपुरावा करुन प्रशासकीय यंत्रणेच्या संपर्कात राहून राम कदम यांनी घाटकोपरसाठी २२ लाख लिटर क्षमतेची पाण्याची महाकाय टाकी उभारण्याचा निर्णय घेतला. भांडुप पासून घाटकोपरपर्यंत चार किमी. लांबीची जलवाहिनी टाकून नागरिकांना पाणी उपलब्ध होईल अशी व्यवस्था केली. आता ही व्यवस्था मार्गी लागत असल्याचे पाहून राम कदम यांनी केस कापण्याचा निर्णय घेतला.


महाकाय टाकीमुळे घाटकोपर पश्चिमची पाण्याची समस्या सुटणार असल्याचे राम कदम म्हणाले. जनतेच्या प्रश्नांना सदैव प्राधान्य देतो आणि देणार असेही त्यांनी सांगितले. राम कदमांच्या कार्याचे नागरिक कौतुक करत आहेत.


Comments
Add Comment

लाडक्या बहिणींना धक्का; केवायसी न केलेल्या आणि नियमांचे उल्लंघन केलेल्या महिला योजनेतून बाद

मुंबई : महाराष्ट्रातील महिलांना आर्थिक सहाय्य मिळावं यासाठी महायुती सरकारने 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना'

Santosh Nalawade : वापरा आणि फेकून द्या...मनसेच्या शिवडी अध्यक्षांनी का दिला राजीनामा? ५ मोठी कारणं आली समोर

मनसेच्या वटवृक्षाला नेत्यांनीच टोचलं विषारी इंजेक्शन? मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले जात

खुशखबर! लोकल आणि मेल एक्सप्रेससाठी मिळणार स्वतंत्र मार्ग; मध्य रेल्वेच्या बांधकाम विभागाकडून आदेश जारी...

मुंबई : मुंबईतील रेल्वेचे जाळे हे वेगानं वाढत चाललं आहेत. त्यामुळे अनेक शहरे मुंबईला जोडली जात आहे. मुंबई

Devendra Fadnavis On Raj Thackeray : राज ठाकरे इतिहासातील सर्वात मोठ्या पराभवाचे धनी ठरतील; फडणवीसांनी मांडलं पराभवाचं गणित, ठाकरेंच्या 'वारशा'वरही ओढले ताशेरे

मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याबद्दल बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी चक्क त्यांच्या राजकीय

निवडणूक प्रक्रियेत गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई

मुंबई : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ अनुषंगाने गुरुवार, l १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान

मुंबई विद्यापीठात अत्याधुनिक सीओआरएस स्टेशन उभारणार

भारतीय सर्वेक्षण विभागासोबत सामंजस्य करार मुंबई : देशातील भू-स्थानिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण