भाजप-बविआसाठी निवडणूक बेरीज-वजाबाकीची!

गणेश पाटील


विरार : वसई - विरारमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष सज्ज झाले असले तरी या ठिकाणी मुख्य आणि थेट लढती भाजप आणि बहुजन विकास आघाडीच्या उमेदवारांमध्येच होणार असल्याचे संकेत आहेत.


यापूर्वी पालिकेच्या सभागृहात असलेला १०८ नगरसेवकांचा आकडा कायम ठेवणे बहुजन विकास आघाडीसाठी कठीण बाब आहे, तर केवळ खाते उघडलेल्या भाजपला सुद्धा एका नगरसेवकावरून बहुमतापर्यंत सदस्य संख्या नेणे सोपे नाही. दोन्ही राजकीय पक्ष सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करणार आहेत. त्यामुळे निवडणुकीचा निकाल काहीही असला तरी, ही निवडणूक भाजपसाठी बेरजेची आणि बहुजन विकास आघाडीसाठी नगरसेवकांचा आकडा वजा करणारी ठरणार आहे.


वसई - विरार महानगरपालिकेवर सलग दोन टर्म बहुजन विकास आघाडीची सत्ता राहिली आहे. २०१५ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत ११५ पैकी तब्बल १०८ नगरसेवक बहुजन विकास आघाडीचे निवडून आले होते. तर एका नगरसेवकाच्या माध्यमातून भाजपला केवळ खाते उघडता आले होते. दरम्यान, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर सत्तापरिवर्तन होत भाजपसह महायुतीची सत्ता जिल्ह्यात आल्यामुळे एकूणच राजकीय चित्र बदलले आहे.


वसई, नालासोपारा आणि बोईसर हे बहुजन विकास आघाडीचे विधानसभेचे तीनही गड त्यांच्या हातून गेले आहेत. त्यामुळे साहजिकच भाजपची ताकद या ठिकाणी वाढलेली आहे. अशातच बहुजन विकास आघाडीतून काही माजी नगरसेवक, नेते आणि कार्यकर्ते यांनी याआधीच भाजपचा रस्ता गाठला आहे. महापालिकेची निवडणूक भाजप आणि शिवसेना शिंदे गट हे महायुती एकत्र लढणार असल्याचे चिन्ह दिसून येत आहेत. तर बहुजन विकास आघाडी आणि उबाठा गटातर्फे युतीच्या चर्चा सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रदेश काँग्रेसचे नेते पालिका निवडणूक स्वतंत्र लढणार असल्याचे सांगत आहेत. मात्र काँग्रेसचे स्थानिक नेते व पदाधिकारी बहुजन विकास आघाडी सोबत आघाडी करून ही निवडणूक लढण्याची मागणी पक्षश्रेष्ठींकडे करीत आहेत.


एकंदरीत आगामी निवडणुकीत सत्ता गाजविण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष सक्रिय झाले असले तरी वसई-विरारच्या निवडणुकीत भाजप आणि बहुजन विकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये थेट आणि चुरशीच्या लढती पाहावयास मिळणार आहेत. या लढतीमध्येच भाजपच्या बेरजेचे आणि बहुजन विकास आघाडीच्या वजाबाकीचे 'गणित' दडलेले आहे.


Comments
Add Comment

तारापूर औद्योगिक वसाहतीत वायू गळती

बोईसर : पालघर जिल्ह्यातील बोईसरमधील तारापूर औद्योगिक वसाहतीतल्या भघेरिया केमिकल्समध्ये (जुने नाव : झेनित

पालघरमध्ये बंद दगड खाणीत दुर्घटना; दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू

पालघर : पाण्याचा अंदाज न ओळखता आल्याने दोन मुलांचा जीव गेल्याची दुर्दैवी घटना पालघरमध्ये घडली आहे. मनोरजवळील

औद्योगिक क्षेत्रातील समस्यांवर आमदारांनी वेधले लक्ष

विजेच्या अडचणींसह जमिनीचा लीज प्रश्न सोडवा वसई  : वसई-विरार औद्योगिक क्षेत्रातील छोटे मोठे उद्योजक विविध

वसई-विरारचा अर्थसंकल्प ‘वेटिंग’वर!

स्थायी समिती सभापतींची निवड लांबल्याने मार्चचा मुहूर्त विरार : महापौर, उपमहापौर निवडणूक उशिरा होऊनही मुंबई

ई-गव्हर्नन्स मूल्यमापनात वसई–विरार पालिकेचा ‘नववा क्रमांक’ कायम

पालघर :  राज्यातील महानगरपालिकांच्या ई-गव्हर्नन्स कामकाजाच्या मूल्यमापनात वसई–विरार महानगरपालिकाने यंदाही

Virar: दारूच्या नशेत सापासोबत मस्ती बेतली जीवावर; विरारमध्ये तरुणाचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू

विरार: दारूच्या नशेत विषारी जातीच्या सापाला पकडणे आणि अति उत्साहाच्या भरात सापसोबतच मस्ती करणे विरार येथील एका