गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्पाच्या चौथा टप्पा सुरू

मुंबई : गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्पाचा पहिला टप्पा २०२६मध्ये खुला होण्याची शक्यता असतानाच या प्रकल्पाच्या चौथ्या टप्प्याची तयारी सुरू करण्यात आली. या टप्प्यात गोरेगाव पूर्वेकडील आरे कॉलनी परिसरातून पश्चिम द्रुतगती मार्गाकडून येणारा रस्ता आणि मुलुंड पूर्वेकडील जंक्शन सुधारणा यांचा समावेश आहे.गोरेगाव-मुलुंड लिंक रोडचे बांधकाम गेल्या काही महिन्यांपासून वेगाने सुरू असून आता पुर्णत्वाकडे जात आहे. पहिल्या टप्प्यात १२.२ किमी लांबीचा प्रकल्प असून अंतिम टप्पा २०२६ पर्यंत नागरिकांच्या सेवेत येण्याची शक्यता आहे. या रस्त्यामुळे शहरातील पूर्व-पश्चिम प्रवास सोपा होणार. या टप्प्यातील कामासाठी तब्बल १ हजार २३२ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, प्रकल्प पूर्ण होण्यासाठी आणखी पाच वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.


गोरेगाव-मुलुंड लिंक रोड हा मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा चौथा महत्त्वाचा जोडरस्ता ठरणार आहे. सध्याच्या जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड आणि अंधेरी-घाटकोपर मार्गावर वाहतूक ताण कमी करण्यासाठी हा प्रकल्प आवश्यक आहे. यातील चौथा टप्पा हा संपूर्ण प्रकल्पातील सर्वात महत्त्वाचा आणि गुंतागुंतीचा टप्पा मानला जात आहे. कारण याच टप्प्यात गोरेगाव पूर्व, मुलुंड पूर्व आणि ईस्टर्न एक्स्प्रेस महामार्ग यांची थेट वाहतूक जोडणी तयार होणार आहे.

Comments
Add Comment

मुंबईचा पश्चिम आणि पूर्व द्रुतगती महामार्ग पावसाळ्यापूर्वी समतल करा; उपमहापौरांची आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी

मुंबई: मुंबई महानगरातील रस्त्यांची स्थिती अधिक सुधारण्यासाठी पश्चिम व पूर्व द्रुतगती महामार्ग तसेच प्रमुख

महापालिकेच्यावतीने मुंबई क्लीन लीग स्पर्धा; स्वच्छता विषयक स्पर्धेच्या नोंदणीचा अक्षय कुमार यांच्या उपस्थितीत शुभारंभ

मुंबई: मुंबई अधिक स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याच्या अनुषंगाने, महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने

मुंबई वॉटर मेट्रो जलवाहतूक प्रकल्पाला गती देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

मुंबई : "मुंबई महानगर प्रदेशात जलप्रवासी वाहतुकीसाठी वॉटर मेट्रो प्रकल्प तीन टप्प्यात कार्यान्वित करण्यात

जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्येही आता 'स्वीकृत सदस्य'

मुंबई : महापालिका, नगरपालिकांप्रमाणे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्येही 'स्वीकृत सदस्यां'च्या नियुक्तीचा

आमदार हेमंत पाटील यांनी मांडली 'लव्ह जिहाद' आणि 'लोकसंख्या नियंत्रणाची' आग्रही भूमिका

विधान परिषदेत धर्मांतर विरोधी विधेयकावर चर्चा मुंबई : विधान परिषदेत आज धर्मांतर विरोधी विधेयकावर अत्यंत

कोकणातील आंबा-काजू उत्पादक शेतकऱ्यांना अधिवेशन संपण्यापूर्वीच मुख्यमंत्री नुकसानभरपाई जाहीर करणार

मुंबई : कोकणातील आंबा व काजू पिकांच्या विविध प्रश्नांसंदर्भात आज विधान भवन, मुंबई येथे आदरणीय मुख्यमंत्री