ब्रेक फेल झाल्यामुळे एक्सप्रेस वेवर अपघात, ट्रकचा झाला चेंदामेदा

रायगड : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर बुधवारी मोठा अपघात झाला. सिमेंट ब्लॉक घेऊन जात असलेला ट्रक थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या कॉलमला धडकला. ब्रेक फेल झाल्यामुळे ट्रक अनियंत्रित झाला आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या कॉलमला धडकला. हा अपघात एवढा जोरदार होता की, ट्रक चालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेमुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.


अपघात बुधवारी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास झाला. पुणे बाजूकडून मुंबईकडे सिमेंटचे ब्लॉक घेऊन जाणारा ट्रक एक्सप्रेस वेवरील किलोमीटर ४५/५०० जवळ, अमृतांजन पुलाजवळ पोहोचला. त्यावेळी ब्रेक निकामी झाल्यामुळे ट्रक अनियंत्रित झाला आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या कॉलमला धडकला. वेगाने जात असलेला ट्रक कॉलमला धडकल्यामुळे मोठा अपघात झाला.


अपघातात सिमेंट ब्लॉक घेऊन जात असलेल्या ट्रकचा पुरता चेंदामेंदा झाला. या अपघातात ट्रक चालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला.अपघातामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. वाहतूक पोलिसांनी आय.आर.बी.ची आपत्कालीन टीम, अपघातग्रस्तांसाठीचे मदत पथक, सामाजिक कार्यकर्ते यांच्या सहकार्याने ट्रक हटवला आणि रस्त्याच्या कडेला नेला. अपघातग्रस्त वाहन हटवल्यानंतर वाहतूक हळूहळू पूर्ववत झाली.

Comments
Add Comment

अभिनेत्री ममता कुलकर्णीची किन्नर आखाड्यातून हकालपट्टी

नवी दिल्ली : प्रयागराज महाकुंभमधील सर्वात मोठा धार्मिक वाद अखेर टोकाला पोहोचला आहे. ज्योतिषपीठाचे शंकराचार्य

लांजात जि.प.च्या ४ तर पं.स.च्या पाच उमेदवारांनी अर्ज मागे, जि.प. साठी ९ तर पंचायत समितीसाठी २६ उमेदवार रिंगणात

लांजा (संतोष कोत्रे) : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या २७ जानेवारी रोजी

सावंतवाडी तालुक्यात एक जिल्हा परिषद तर एक पंचायत समिती सदस्य बिनविरोध

शेर्ले पंचायत समिती गणातून भाजपचे महेश धुरी बिनविरोध, तालुक्यात तब्बल ४८ जणांनी अर्ज घेतले मागे सावंतवाडी :

पक्षशिस्तीचे उदाहरण : खासदार नारायण राणेंच्या आदेशानुसार जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवींची निवडणुकीतून माघार

वेंगुर्ले : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी खासदार नारायण राणे यांच्या आदेशानुसार आडेली

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदमध्ये पालकमंत्री नितेश राणे यांची निवडणूक रणनिती यशस्वी

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदमध्ये ४२ जागांसाठी निवडणूक; ११६ जणांची माघार, ११५ उमेदवार रिंगणात जिल्ह्यातील ८ पंचायत

राजापुरात जि.प. गटातून चार जणांची तर पंचायत समिती गणातुन १६ जणांची माघार

राजापूर : :राजापूर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीकरीता मंगळवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या