ब्रेक फेल झाल्यामुळे एक्सप्रेस वेवर अपघात, ट्रकचा झाला चेंदामेदा

रायगड : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर बुधवारी मोठा अपघात झाला. सिमेंट ब्लॉक घेऊन जात असलेला ट्रक थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या कॉलमला धडकला. ब्रेक फेल झाल्यामुळे ट्रक अनियंत्रित झाला आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या कॉलमला धडकला. हा अपघात एवढा जोरदार होता की, ट्रक चालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेमुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.


अपघात बुधवारी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास झाला. पुणे बाजूकडून मुंबईकडे सिमेंटचे ब्लॉक घेऊन जाणारा ट्रक एक्सप्रेस वेवरील किलोमीटर ४५/५०० जवळ, अमृतांजन पुलाजवळ पोहोचला. त्यावेळी ब्रेक निकामी झाल्यामुळे ट्रक अनियंत्रित झाला आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या कॉलमला धडकला. वेगाने जात असलेला ट्रक कॉलमला धडकल्यामुळे मोठा अपघात झाला.


अपघातात सिमेंट ब्लॉक घेऊन जात असलेल्या ट्रकचा पुरता चेंदामेंदा झाला. या अपघातात ट्रक चालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला.अपघातामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. वाहतूक पोलिसांनी आय.आर.बी.ची आपत्कालीन टीम, अपघातग्रस्तांसाठीचे मदत पथक, सामाजिक कार्यकर्ते यांच्या सहकार्याने ट्रक हटवला आणि रस्त्याच्या कडेला नेला. अपघातग्रस्त वाहन हटवल्यानंतर वाहतूक हळूहळू पूर्ववत झाली.

Comments
Add Comment

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पुन्हा घुमली 'वनराणी'ची शिट्टी

- बॅटरीवर चालणाऱ्या इंजिनासह आधुनिक सेवा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते उद्घाटन मुंबई :

Meta आपल्या जागतिक कर्मचाऱ्यांपैकी २० टक्के कर्मचाऱ्यांची कपात करणार ?

- एआय तंत्रज्ञानातील वाढत्या स्पर्धेमुळे कर्मचारी संरचनेत बदल मेटा प्लॅटफॉर्म ही फेसबुक आणि इंस्टाग्राम या

"काँग्रेसकडे निराशेत स्वतःचे कपडे फाडण्याव्यतिरिक्त काहीही शिल्लक नाही"; पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर जोरदार टीका

- सततच्या पराभवातून आलेल्या नैराश्यातूनच काँग्रेसचा देशाविरोधात मोर्चा आसाम सोबतच देशातील बहुतेक

भव्य राष्ट्रध्वज नागपूरच्या राष्ट्राभिमानाचे प्रतीक ठरेल - मुख्यमंत्री फडणवीस

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी असंख्य स्वातंत्र्य सैनिकांनी प्राणांची आहुती दिली याचा प्रत्येक

Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यासाठी २२,१८१ कोटी रुपयांच्या कामांना मान्यता

- त्र्यंबक-नाशिकचा कुंभमेळा जगाला आकर्षण वाटणारा असावा - मुख्यमंत्री फडणवीस त्र्यंबक - नाशिक मध्ये सिंहस्थ

संजय राऊत देशात अराजकता निर्माण करत आहेत; भाजपाचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा घणाघात

- आदित्य ठाकरेंना संपवण्याची सुपारी संजय राऊतांनी घेतली मुंबई : उबाठा खासदार संजय राऊत हे पत्रकार परिषदांमधून