लोणार सरोवराबाबत चिंतेची बाब; सरोवरात वाढतेय पाण्याची पातळी

बुलढाणा: पर्यटक आणि शास्त्रज्ञांचे आकर्षण केंद्र असलेल्या महाराष्ट्रातील जगप्रसिद्ध लोणार सरोवरातील पाण्याच्या पातळीत दिवसेंदिवस प्रचंड वाढ होत आहे. गेल्या सहा महिन्यांपासून सरोवरातील पाण्याची पातळी वाढत असल्याने चिंतेची बाब निर्माण झाली आहे. दरम्यान सुमारे पन्नास हजार वर्षांपूर्वी उल्कापाताने निर्माण झालेल्या या खाऱ्या पाण्याच्या सरोवरात कमळजा देवीचे मंदिर आता १५ फूट पाण्यात बुडाले आहे. महत्त्वाचे म्हणजे सरोवरातील कमळजा देवीचे मंदिर, जे कधीच पाण्याखाली गेले नव्हते, आता पूर्णपणे बुडाले आहे.



गेल्या सहा महिन्यांपासून खाऱ्या पाण्याच्या लोणार सरोवरातील पाण्याच्या पातळीत प्रचंड वाढ होताना दिसत असल्याने चिंतेची बाब निर्माण झाली आहे. यावर संशोधन होणे गरजेचे आहे, असे सरोवर अभ्यासक सचिन कापूरे यांनी सांगितले. तसेच जिल्ह्यातील पर्यावरणप्रेमींनी पुरातत्व विभागाकडे पुढाकार घेण्याची मागणी केली आहे. या निर्माण झालेल्या कुतूहलाबाबत पुरातत्व विभागाने पुढाकार घेऊन निष्कर्ष काढावा अशी मागणी निसर्ग प्रेमी श्रीकांत भुसारी यांनी केली आहे. जिल्ह्यातील सामान्य नागरिक आणि ज्येष्ठ नागरिकही या बदलामुळे आश्चर्यचकीत झाले आहेत.




सरोवराच्या पाण्याची पातळी का वाढत आहे, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. विश्वप्रसिद्ध असलेल्या या सरोवराच्या अभ्यासासाठी परदेशातून असंख्य पर्यटक आणि वैज्ञानिक येतात. पण खऱ्या पाण्याच्या या सरोवरात मासे का मिळत आहेत, पाण्याची पातळी का आणि कुठून वाढत आहे, हे रहस्य अजूनही गुलदस्त्यात आहे. या संवेदनशील विषयावर सखोल संशोधन करण्याची तीव्र गरज आहे. मात्र, संबंधित पुरातत्व विभागाकडून याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे, ही खेदाची बाब आहे.

Comments
Add Comment

वारकरी संप्रदायाचा सर्वोच्च बहुमान; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 'संत एकनाथ महाराज वारकरी सेवा गौरव पुरस्कार' जाहीर

पैठण : वारकरी संप्रदायामध्ये अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा आणि पैठण येथील श्री संत एकनाथ महाराज संस्थानकडून

नागपूर महापालिका निवडणूक: १५१ जागांसाठी प्रशासन सज्ज, दुबार मतदारांवर विशेष नजर

नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. मनपा आयुक्त अभिजित चौधरी

विद्यार्थ्यांचा अनादर केल्यास शिक्षकांवर होणार कठोर कारवाई

शिक्षण विभागाकडून कठोर नियमावली; सुरक्षेत कसूर झाल्यास शाळा व्यवस्थापन आणि मुख्याध्यापक जबाबदार मुंबई :

धक्कादायक! कर्ज फिटवण्यासाठी केला मृत्यूचा बनाव; एक मेसेज आणि सत्याचा उलगडा

लातूर: फायनान्स कंपनीत काम करणाऱ्या गणेश चव्हाण नावाच्या तरुणाने आपल्याच मृत्यूचा बनाव केल्याची धक्कादायक

अंबेजोगाई-लातूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात! तिघांचा जागीच मृत्यू

बीड: अंबेजोगाई-लातूर राष्ट्रीय महामार्गावर स्कॉर्पिओ आणि कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ३ जणांचा जागीच

आचरसंहिता लागू होताच रोकड जप्त! पुण्यातील कुप्रसिद्ध आंदेकरच्या घरावर पोलिसांचा छापा

पुणे: महाराष्ट्राच्या गुन्हेगारी क्षेत्रात कुप्रसिद्ध असलेला बंडू आंदेकर याच्या घरावर पुणे पोलिसांनी