फक्त ९५ चेंडूत १७१ धावा करणारा वैभव आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकणार नाही

मुंबई : भारताच्या वैभव सूर्यवंशीने १९ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेत यूएई विरुद्ध ९५ चेंडूत १७१ धावा केल्या. ही ऐतिहासिक खेळी करुनही वैभवला आणखी काही महिने आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळता येणार नाही.


भारताने १९ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेत ५० षटकांत सहा बाद ४३३ धावा केल्या होत्या. धावांचा पाठलाग करणाऱ्या यूएईने ५० षटकांत सात बाद १९९ धावा केल्या होत्या. भारताने हा सामना २३४ धावांनी जिंकला. या सामन्यात वैभवच्या वादळी खेळीमुळे भारताचा विजयाचा मार्ग सोपा झाला. पण एवढा वादळी खेळ करुनही वैभवला आणखी काही महिने आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळता येणार नाही.


आयसीसीच्या नियमानुसार आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी खेळाडूने १५ वर्षे वयाची अट पूर्ण करणे आवश्यक आहे. वैभव सूर्यवंशीचा जन्म २७ मार्च २०११ रोजी झाला आहे. वैभवला वयाची अट पूर्ण करण्यासाठी आणखी किमान १०१ दिवस थांबावे लागणार आहे. या एका नियमामुळे वैभव सूर्यवंशी सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकत नाही.


वैभव हा एक उदयोन्मुख क्रिकेटपटू आहे. वय त्याच्या बाजूने आहे. थोडा संयम बाळगला आणि खेळात सातत्य ठेवले, आत्मविश्वासाने क्रिकेट खेळत राहिला तर वैभव लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकेल, असे मत क्रिकेट तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

Comments
Add Comment

WPL 2026 Final: स्मृती मनधानाच्या आरसीबीची विजयी घोडदौड सुरूच; दुसऱ्यांदा पटकावलं WPL चं जेतेपद

वडोदरा: चार आठवड्यांच्या लढतीनंतर, महिला प्रीमियर लीग २०२६ चा गुरुवार ५ फेब्रुवारी रोजी वडोदरा येथील बीसीए

राष्ट्रीय खोखोपटू सुनिल लाड यांची मुंबई महानगरपालिकेत प्रमुख अधिकारी (प्र) म्हणून नियुक्ती

मुंबई : राष्ट्रीय खोखोपटू तथा क्रीडा प्रसारक श्री. सुनिल लाड यांची मुंबई महानगरपालिकेच्या दुकाने व आस्थापना

WPL 2026 Final: बंगळूरची विजयी घोडदौड दिल्ली थांबवू शकणार का?

वडोदरा: चार आठवड्यांच्या लढतीनंतर, महिला प्रीमियर लीग २०२६ आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे. रॉयल चॅलेंजर्स

IND vs PAK : "आयसीसीचे मुख्यालय भारतात असते तर बॉम्बने उडवले असते..."; पाकिस्तानी अभिनेत्याचे वादग्रस्त विधान

रविवारी (१ फेब्रुवारी) पाकिस्तान सरकारने जाहीर केले की त्यांचा संघ २०२६ च्या टी२० विश्वचषकासाठी मैदानात उतरेल,

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन निवडणुकीची स्थगिती कायम, रोहित पवारांच्या अडचणीत वाढ

नवी दिल्ली  : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि आमदार रोहित पवार यांना सर्वोच्च न्यायालयाने जोरदार

IND vs PAK : पाकिस्तान नेहमीप्रमाणे "यू-टर्न" घेईल; सुनील गावस्कर यांची पाकिस्तानवर टीका

मुंबई: टी-२० विश्वचषकापूर्वी पाकिस्तान सरकारने भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे.