फक्त ९५ चेंडूत १७१ धावा करणारा वैभव आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकणार नाही

मुंबई : भारताच्या वैभव सूर्यवंशीने १९ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेत यूएई विरुद्ध ९५ चेंडूत १७१ धावा केल्या. ही ऐतिहासिक खेळी करुनही वैभवला आणखी काही महिने आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळता येणार नाही.


भारताने १९ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेत ५० षटकांत सहा बाद ४३३ धावा केल्या होत्या. धावांचा पाठलाग करणाऱ्या यूएईने ५० षटकांत सात बाद १९९ धावा केल्या होत्या. भारताने हा सामना २३४ धावांनी जिंकला. या सामन्यात वैभवच्या वादळी खेळीमुळे भारताचा विजयाचा मार्ग सोपा झाला. पण एवढा वादळी खेळ करुनही वैभवला आणखी काही महिने आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळता येणार नाही.


आयसीसीच्या नियमानुसार आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी खेळाडूने १५ वर्षे वयाची अट पूर्ण करणे आवश्यक आहे. वैभव सूर्यवंशीचा जन्म २७ मार्च २०११ रोजी झाला आहे. वैभवला वयाची अट पूर्ण करण्यासाठी आणखी किमान १०१ दिवस थांबावे लागणार आहे. या एका नियमामुळे वैभव सूर्यवंशी सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकत नाही.


वैभव हा एक उदयोन्मुख क्रिकेटपटू आहे. वय त्याच्या बाजूने आहे. थोडा संयम बाळगला आणि खेळात सातत्य ठेवले, आत्मविश्वासाने क्रिकेट खेळत राहिला तर वैभव लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकेल, असे मत क्रिकेट तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

Comments
Add Comment

भारताचा विजय, पुढील फेरीची आशा कायम; दक्षिण आफ्रिका सेमी फायनलमध्ये आणि झिम्बाब्वेचे आव्हान संपले

चेन्नई : आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ मध्ये सुपर एट फेरीचे आजचे दोन्ही सामने सुपरहिट झाले. दक्षिण

भारताने झिम्बाब्वे विरूद्धच्या सामन्यात उभारला धावांचा डोंगर

चेन्नई : आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ मध्ये झिम्बाब्वे विरूद्धच्या सुपर एट फेरीतील सामन्यात भारताने

दक्षिण आफ्रिकेचा वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय

अहमदाबाद : वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ अंतर्गत सुपर ८ फेरीचा

श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात न्यूझीलंडचा विजय

कोलंबो : आर. प्रेमदासा स्टेडियम येथे आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमधील सुपर ८ फेरीतल्या श्रीलंका विरुद्ध

न्यूझीलंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेची निराशाजनक सुरुवात

कोलंबो : आर. प्रेमदासा स्टेडियम येथे आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमधील सुपर ८ फेरीतला श्रीलंका विरुद्ध

...तरच भारत सेमी फायनल खेळू शकेल

मुंबई : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये सुपर ८ फेरीचे सामने सुरू आहेत. ग्रुप एक मध्ये वेस्ट इंडिज (धावगती