थेट शर्यतीत पळणाऱ्या बैलांवर भानामती! कोल्हापूरातील स्मशानात आढळून आला अंधश्रद्धेचा प्रकार

कोल्हापूर: अंधश्रद्धेचा धक्कादायक प्रकार कोल्हापूरातून समोर आला आहे. कोल्हापूरातील हातकणंगले तालुक्यातील भादोले गावात हा प्रकार उघडकीस आल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेतील ट्विस्ट म्हणजे हा अंधश्रद्धेचा प्रकार कोणत्याही माणसावर नाही तर बैलांवर करण्यात आला आहे. आपले बैल शर्यतीतील वर्चस्व कायम राखण्यासाठी तसेच प्रतिस्पर्ध्यांचे नुकसान करण्याच्या उद्देशाने हा भानामती प्रकार केल्याचे समोर आले आहे. भादोले गावातील स्मशानभूमीत ग्रामस्थांना एक संशयास्पद लोटकं आढळून आल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे.


एका कापडामध्ये बाहुली, अस्थी, लिंबू, टाचण्या, हळद-कुंकू, गुलाल तसेच काळे उडीद बांधून ठेवण्यात आले होते. या साहित्याशिवाय कापडामध्ये एक विशेष गोष्ट आढळून आली, ती म्हणजे एका चिठ्ठीत परिसरातील टॉप बैलांची नावे आणि त्यांच्या मालकांची नावे स्पष्टपणे लिहिलेली आढळून आली. चिठ्ठीतील हा मजकूर पाहून ग्रामस्थांमध्ये भीतीचे आणि आश्चर्याचे वातावरण निर्माण झाले. ही माहिती गावात वाऱ्यासारखी पसरताच नागरिकांनी मोठ्या संख्येने स्मशानभूमीकडे धाव घेतली.


बैल शर्यतींमध्ये भादोले गावाची ओळख असून येथे अनेक नामांकित आणि विजेते बैल आहेत. त्यामुळे अशा प्रकारे थेट स्मशानभूमीत भानामतीचा प्रकार घडल्याने गावकऱ्यांमध्ये संतापासह चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच चिठ्ठीतील नावे उघड झाल्यानंतर संबंधित बैलमालकांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण आहे. आपल्या बैलांना काही होईल का? शर्यतींवर याचा परिणाम होईल का? अशा अनेक प्रश्नांनी बैलमालक धास्तावले आहेत. काही नागरिकांनी हा प्रकार अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याच्या विरोधात असल्याचे सांगत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.



दरम्यान, या प्रकारामागे नेमके कोण आहे? हा केवळ भीती निर्माण करण्याचा प्रयत्न आहे? की प्रत्यक्षात कोणाच्या तरी जाणीवपूर्वक केलेली कृती आहे? याबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. गावातील ज्येष्ठ नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. या घटनेमुळे भादोले गावात अंधश्रद्धा, स्पर्धात्मक द्वेष हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून प्रशासनाने तातडीने दखल घेऊन चौकशी करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.

Comments
Add Comment

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला

मुंबई: राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या घामाने आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या सुमारे ८६ हजार

Rajya Sabha Election 2026: राज्यसभा निवडणुकीचा अर्ज भरायला फक्त सहा दिवस उरले, शरद पवार राज्यसभा लढवणार की नाही?

मुंबई: येत्या १६ मार्चला राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या ३७ जागांसाठी निवडणूक होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील

Maharashtra Village: राज्य सरकारकडून सहा ग्रामपंचायतींचा सन्मान केला जाणार; कोकणातील 'हे' गाव पहिल्या क्रमांकावर

मुंबई: गावाचा विकास हाच देशाचा विकास असं म्हटलं जातं. सध्या आपल्या देश लोकल ते ग्लोबल अशा मार्गाने काम करीत आहे.

Thane: ठाण्यात खळबळ, वेब सिरिज अभिनेत्रीच्या देहविक्रीचा व्यवसाय; पोलिसांकडून रॅकेटचा भांडाफोड

ठाणे: सिने इंडस्ट्रीत काम मिळत नसल्याकारणाने एका हिंदी वेब सिरीजमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रीने पैसे

Vidarbha Railway: गोंदिया ते जबलपूर रेल्वे प्रकल्पाला केंद्र सरकारची मंजुरी

मुंबई: गोंदिया ते जबलपूर रेल्वे प्रवासाचा चेहरामोहरा बदलणार असून या मार्गाच्या दुहेरीकरणाला अखेर केंद्र