मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

रायगड : मुंबई-पुणे महामार्गावर बुधवारी सकाळी भीषण अपघात घडून तिघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत एकूण पाच वाहने एकमेकांना धडकली असून अपघाताची तीव्रता मोठी होती.


पुण्यावरून मुंबईला जाताना नव्या सुरू झालेल्या बोगद्याच्या खोपोलीकडील एक्झिटवर हा अपघात झाला. यावेळी पाच वाहनांच्या धडकेत कंटेनर एका चारचाकीवर पलटल्यामुळे गाडीतील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. सकाळी पुण्याहून मुंबईच्या दिशेने येताना ९.४०  च्या सुमारास हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव वेगात असलेल्या वाहनांमध्ये अचानक ब्रेक लागल्याने मागून येणाऱ्या वाहनांनी एकमेकांना जोरदार धडक दिली. या साखळी अपघातात एक कंटेनर अनियंत्रित होऊन समोरच्या चारचाकी वाहनावर उलटला. त्यामुळे चारचाकीतील तिघांचा जागीच मृत्यू झाला.


अपघातानंतर महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तत्काळ मदतकार्य सुरू करत जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. या घटनेची नोंद संबंधित पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.

Comments
Add Comment

NEET Paper Leak Case : पुण्यात ‘मोटेगावकर’ RCC क्लासवर महापालिकेची मोठी कारवाई; ३.२० कोटींचा कर थकीत, क्लास सील

पुणे : नीट पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरात चर्चेत आलेले प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांच्या पुण्यातील प्रसिद्ध

Online Fraud : शेअर मार्केटमध्ये ‘डबल रिटर्न’चं आमिष; अलिबागमधील व्यक्तीची तब्बल ६६ लाखांची ऑनलाइन फसवणूक

रायगड जिल्ह्यातील अलिबागमध्ये सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शेअर बाजारात गुंतवणुकीवर मोठा

अनुदानित खतांसोबत विना अनुदानित खतांची सक्तीची विक्री बंद

कृषी विभागाचा निर्णय; नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार मुंबई : "राज्यात काही खत उत्पादक आणि पुरवठादार

भूमी अभिलेख विभागाचा; राज्यात ५० नवी कार्यालये सुरु होणार; १० हजार पदांच्या आकृतीबंधालाही मूर्तरूप

मुंबई : प्रशासकीय कामकाज लोकाभिमुख आणि वेगवान करण्यासाठी, भूमी अभिलेख विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार

Maharashtra Heat Wave : महाराष्ट्रात उष्णतेचा कहर! IMD चा हाय अलर्ट; ‘गरज असेल तरच घराबाहेर पडा’, नागरिकांना इशारा

महाराष्ट्रात पुन्हा एकदा उष्णतेची तीव्र लाट उसळली असून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाने अक्षरशः

Devendra Fadnavis : पेट्रोल-डिझेल तुटवड्याच्या अफवा; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “घाबरून खरेदी करू नका, राज्यात...

मुंबई : राज्यात पेट्रोल-डिझेल तुटवड्याच्या अफवा पसरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी