हत्या केली मात्र अपघाती मृत्यू झाल्याचे दाखवण्यासाठी केला चक्क सापाचा वापर; कशी केली काँग्रेस महिला पदाधिकाऱ्याची हत्या?

बदलापूर: महाराष्ट्रातील बदलापूर येथे तीन वर्षांपूर्वी मृत्युमुखी पडलेल्या काँग्रेस महिला पदाधिकारी नीरजा आंबेकर यांच्या मृत्यूबाबत धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. नीरजा यांचा कथित मृत्यू नैसर्गिक असल्याचे दाखवण्यात आले होते. पोलीस तपासात सुद्धा हेच सत्य असल्याचे सांगितले होते. मात्र नीरजाचे पती रूपेश आंबेकर यांनी हा पूर्वनियोजित खून केल्याचे उघड झाले आहे. काँग्रेस महिला नेत्या नीरजा आंबेकर यांच्या मृत्यूनंतर तीन वर्षांनी हा खळबळजनक खुलासा समोर आल्याने सर्वांना धक्का बसला आहे.


नीरजा आंबेकर यांच्या हत्येतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे त्यांच्या मृत्यूवेळी आत्महत्या किंवा नैसर्गिक मृत्यू असे भासवण्यासाठी विषारी सापाचा वापर करणे. आरोपी ऋषिकेश चाळकेने दिलेल्या जबाबानुसार, हत्या करण्याची पद्धत अत्यंत क्रूर आणि नियोजित होती. आरोपीने नीरजाच्या घरातील स्वयंपाकघरात एका पोत्यात विषारी साप आधीच लपवून ठेवला होता. यानंतर नीरजाचे पती रूपेशने पायांना मालिश करण्याच्या बहाण्याने तिला हॉलमध्ये झोपवले. सर्पप्रेमी असलेला आरोपी चेतन दुधानेने पोत्यातून साप बाहेर काढला आणि ऋषिकेश चाळकेला दिला. त्यानंतर, नीरजाला डाव्या घोट्याजवळ सापाने तीन वेळा चावा घेतल्याने तिचा मृत्यू झाला.


हा खून झाल्यानंतर, संपूर्ण प्रकरण नैसर्गिक मृत्यू असल्याचे घोषित करण्यात आले आणि पोलिसांनी फक्त एडीआर (अपघाती मृत्यू अहवाल) दाखल केला. तीन वर्षांनंतर, जेव्हा सत्य समोर आले, तेव्हा पोलिसांनी नीरजा यांचा पती रूपेश आंबेकर, चेतन दुधाणे, कुणाल चौधरी आणि ऋषिकेश चाळके या आरोपींना अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, खोटे मृत्युपत्र देणाऱ्या डॉक्टरांचीही चौकशी केली जाईल असे पोलिसांनी सांगितले आहे.





प्रकरण कसे आले समोर?


काही दिवसांपूर्वी बदलापूरमध्ये एका तरुणावरती जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. यातील मुख्य आरोपी ऋषिकेश चाळके याला पोलिसांनी अटक केली होती. पोलीस उपनिरीक्षक राजेश गज्जल हे या प्रकरणाचा तपास करत असताना, चौकशीदरम्यान ऋषिकेशला 'तू आणखी काय-काय केलं आहेस?' असा प्रश्न विचारला. तेव्हा ऋषिकेशने बोलता बोलता तीन वर्षांपूर्वीच्या एका हत्येचा खुलासा केल्यावर हा धक्कादायक प्रकार समोर आला.

Comments
Add Comment

Kalyan : लोकलच्या छतावर जीवघेणा स्टंट; कल्याण रेल्वे स्थानकावर गोंधळ

कल्याण : ऐन गर्दीच्या वेळी कामावर जाण्याची वेळ आणि कल्याण ते विठ्ठलवाडी दरम्यानची रेल्वे वाहतूक खोळंबली, कारण

First Electric Double-Decker Bus : ठाणेकरांच्या सेवेत पहिली इलेक्ट्रिक डबल डेकर बस दाखल; 'तीन हात नाका ते गायमुख' मार्गावर धावणार!

ठाणे : ठाणेकरांसाठी आजचा दिवस अतिशय आनंदाचा आणि वाहतूक व्यवस्थेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरणारा आहे. ठाणे

Maharashtra Din 2026 : ठाण्यात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण

ठाणे : महाराष्ट्र दिनानिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाचे

Shivsena Latur : लातूरचे माजी मंत्री आणि आमदार विनायकराव पाटील यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश

मोठ्या नेत्यांसह कार्यकर्त्यांचीही शिवसेनेमध्ये प्रवेशासाठी गर्दी, राज्यभरातून शिवसेनेचा वाढतोय

Eknath Shinde : पंतप्रधान मोदींवर हल्ल्याचे आडाखे बांधून काँग्रेसची देशद्रोही मानसिकता उघडी पडली!

देशातील १४० कोटी जनता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठीशी काँग्रेसवर शिंदेंची सडकून टीका ठाणे : अमेरिकेचे

“इंटिग्रेटेड ग्राम विकास मॉडेल”ची मांडणी; उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगाम आढावा बैठक संपन्न

जिल्ह्यातील १०० तलाव गाळमुक्त करण्याचे उद्दिष्ट्य गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेसाठी सामाजिक संस्था आणि