वर्ध्याचे धरण फुटता-फुटता वाचले, तीच परिस्थिती आम्रडची होणार का? निलेश राणेंचा विधानसभेत सवाल

नागपूर : कुडाळ-मालवण मतदारसंघातील रखडलेले सिंचन प्रकल्प, अधिकाऱ्यांकडून दिली जाणारी खोटी माहिती आणि कामाच्या निकृष्ट दर्जावरून आमदार निलेश राणे यांनी आज विधान सभेत प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केला. "१९९६ साली सुरू झालेला आम्रड धरण प्रकल्प आज २०२५ उजाडले तरी अपूर्णच आहे. या विलंबासाठी जबाबदार कोण?" असा संतप्त सवाल करत राणे यांनी पाटबंधारे विभागाच्या कारभाराचे वाभाडे काढले.



४ कोटींचा प्रकल्प ३४ कोटींवर


आमदार निलेश राणे यांनी विधान सभेत माहिती देताना सांगितले की, १९९६ साली आम्रड धरण प्रकल्पाची मूळ किंमत ४ कोटी ५ लाख रुपये होती. आज २०२५ मध्ये या प्रकल्पाची किंमत तब्बल ३४ कोटींच्या घरात गेली आहे. ३० वर्षे उलटूनही प्रकल्पाचे काम केवळ ८० टक्के पूर्ण झाल्याचा दावा प्रशासन करत आहे, जो पूर्णपणे दिशाभूल करणारा असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले.



अधिकारी दिशाभूल करत आहेत


प्रशासनाकडून मिळालेल्या उत्तरावर आक्षेप घेताना निलेश राणे म्हणाले, "उत्तरामध्ये भूसंपादन आणि जीएसटीची कारणे दिली आहेत. मुळात भूसंपादन २००५ मध्ये झाले आणि त्याचे ७१ लाख रुपये दिले गेले. मग आता विलंबाचे कारण भूसंपादन कसे असू शकते? तसेच, ३० वर्षांपूर्वी सुरू झालेल्या प्रकल्पाच्या विलंबाला जीएसटीचे कारण देणे हास्यास्पद आहे." मंत्र्यांना अधिकारी खोटी माहिती पुरवत असून, 'चौकशीचा प्रश्नच उद्भवत नाही' हे अधिकाऱ्यांचे उत्तर संतापजनक असल्याचे त्यांनी नमूद केले.



वर्ध्याचे धरण फुटता-फुटता वाचले!


कुडाळ तालुक्यातील वर्धा धरणाचे उदाहरण देताना राणे यांनी गंभीर इशारा दिला. "कुडाळमध्ये ४ पैकी १ काम झाल्याचे सांगितले जाते, पण जे एक काम पूर्ण झाले आहे, ते वर्धा धरण मागच्या वर्षी फुटता-फुटता वाचले आहे. अधिकाऱ्यांनी किंवा ठेकेदाराने वेळीच सावरल्याने चिपळूणसारखी दुर्घटना टळली. मात्र, निकृष्ट कामामुळे लोकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे," असे त्यांनी निदर्शनास आणून दिले.



मालवणमध्येही तीच स्थिती


मालवणमध्ये दोन धरणे पूर्ण झाल्याची माहिती प्रशासनाने दिली होती, ती खोडून काढताना राणे म्हणाले की, "माझ्या मतदारसंघात ३ पैकी एकही धरण पूर्ण झालेले नाही. अधिकारी मंत्र्यांना आणि सभागृहाला अशी खोटी उत्तरे देत असतील, तर आम्ही प्रश्न विचारायचे कोणाला?" सॉईल टेस्टिंगच्या नावाखाली केवळ वेळकाढूपणा सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.



चौकशीची मागणी


रखडलेले प्रकल्प आणि वाढलेला खर्च याला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. तसेच, मंत्र्यांना खोटी माहिती देऊन सभागृहाची दिशाभूल करणाऱ्या अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करावी, अशी आग्रही मागणी आमदार निलेश राणे यांनी केली.

Comments
Add Comment

Ahilyanagar : जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान ; निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह, राजकीय वातावरण तापले

अहिल्यानगर (राहुरी प्रतिनिधी) : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Ahilyanagar District Central Cooperative Bank) होवू घातलेल्या

Ahilyanagar : श्रीरामपूरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई; एमडी तस्कर जेरबंद, अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर (श्रीरामपूर) : श्रीरामपूर शहरात अंमली पदार्थांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने सलग दुसऱ्या दिवशी मोठी

Ketan Agrawal Murder Case : 'मला त्याला स्लो पॉयझन देऊन मारायचं होतं..';केतन हत्याकांड प्रकरणातील 'त्या' गुप्त कटामागचा मास्टरमाइंड कोण?

केतन अग्रवाल हत्याकांडात धक्कादायक दावा; 'स्लो पॉयझन' देण्याचाही कट असल्याची तपासात चर्चा पुणे : केतन

Minister Radhakrishna Vikhe Patil : मतदार यादीत घुसखोरांना जागा नाही ; पुनरिक्षण मोहिमेत कार्यकर्त्यांनी पुढे या : ना. राधाकृष्ण विखे पाटील

Ahilyanagar (Shevgaon) : मतदार यादीची सखोल पुनरिक्षण मोहीम भविष्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे.सरकारी स्तरावर काम सुरू असले

Wardha Murder : वर्ध्यात काळजाचा थरकाप उडवणारी घटना! 12 वर्षांच्या मुलीची दगडाने ठेचून निर्घृण हत्या; नराधमांनी ओलांडल्या क्रूरतेच्या सर्व सीमा

वर्धा : वर्धा  (wardha) जिल्ह्यातील रोठा गावातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली

Pune Metro : पुणेकरांसाठी गुड न्यूज! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोला नवा मुहूर्त; वाहतूक कोंडीतून लवकरच सुटका!

पुणे : पुण्यातील ट्रॅफिक जॅम, विशेषतः हिंजवडी आयटी पार्क परिसरात होणाऱ्या रोजच्या वाहतूक कोंडीने त्रस्त