मराठीच्या मुद्द्यावर सरकार 'ॲक्शन मोड'मध्ये! नियम मोडणाऱ्या शाळांची गय नाही; सरकारचे कडक कारवाईचे आदेश

नागपूर: महाराष्ट्रात मराठी भाषेचा सन्मान राखण्यासाठी आणि ती प्रत्येकापर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. राज्यातील शाळांमध्ये मराठी सक्तीचा ऐतिहासिक निर्णय घेतल्यानंतर, आता या निर्णयाला बगल देणाऱ्या शाळांच्या मनमानी कारभाराला चाप लावण्यासाठी सरकारने आक्रमक पवित्रा घेतला आहे. केंद्रीय मंडळाच्या शाळांनी मराठी विषय 'ऐच्छिक' ठेवल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याची गंभीर दखल घेत, अशा शाळांवर कडक कारवाई करण्याचे स्पष्ट संकेत सरकारने आज विधान परिषदेत दिले.



मराठीची सक्ती, नाहीतर कारवाई!


फेब्रुवारी २०२४ मध्ये सरकारने राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि मंडळांच्या शाळांना मराठी भाषा शिकवणे अनिवार्य केले होते. हा निर्णय म्हणजे मराठी अस्मितेच्या जपणुकीसाठी टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल होते. मात्र, काही केंद्रीय शाळांनी या आदेशांचे पालन न करता मराठी विषय 'ऐच्छिक' ठेवल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे ८५,४९७ विद्यार्थ्यांना मराठीचे शिक्षण मिळाले नसल्याची बाब समोर येताच, सरकारने यावर तातडीने कठोर भूमिका घेतली आहे.



शाळांच्या मनमानीला बसणार चाप


आज विधान परिषदेत एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना सरकारने स्पष्ट केले की, "राज्यात शाळा कोणत्याही मंडळाची असो, मराठी शिकावीच लागेल." सरकारी आदेश धाब्यावर बसवणाऱ्या शाळांची आता गय केली जाणार नाही. ज्या शाळांनी मराठी विषय सक्तीचा केलेला नाही आणि सरकारी निर्णयाची अंमलबजावणी केलेली नाही, अशा शाळांवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Comments
Add Comment

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात

संक्रांतीच्या उत्सवाला गालबोट; अहिल्यानगर जिल्ह्यात पतंग उडवताना चिमुकल्याचा....

अहिल्यानगर : मकर संक्रांतीच्या दिवशी आनंद आणि उत्साहाचं वातावरण असतानाच अहिल्यानगर जिल्ह्यात एक हृदयद्रावक