मुंबईतून दररोज ४ ते ५ मुली बेपत्ता ;  मुलींच्या अपहरणाचे ११८७ गुन्हे दाखल


मुंबई : मुंबईत मुलींच्या अपहरणांचं प्रमाण दिवसागणिक वाढत असल्याचं दिसून येत आहे. गेल्या दहा महिन्यात अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचे ११८७ गुन्हे मुंबईत दाखल झाले आहेत. यापैकी १११८ गुन्ह्यांची उकल झाली आहे. या घटनांमुळे मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न उभा आहे.


ऑक्टोबर महिन्यात सर्वाधिक मुली बेपत्ता झाल्या आहेत. मुंबई पोलिसांच्या आकडेवारीनुसार, जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत मुंबईत महिलांसंबंधित ५८८६ गुन्हे दाखल झाले आगेत. त्यापैकी ५५६१ गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे. याशिवाय अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचे ११८७ गुन्हे दाखल झाले असून यासंदर्भात तपास केला जात आहे.


मुली बेपत्ता होण्यामागील कारणं काय?


मिळालेल्या माहितीनुसार, प्रेम प्रकरणातून पळून जाणाऱ्य़ा मुलींची संख्या सर्वाधिक आहे. अनेक ठिकाणी घरातील किरकोळ वाद, पालकांविषयीचा रागही कारणीभूत ठरत असल्याचं दिसून येत आहे. तर सेक्स रॅकेटच्या घटनांचाही खुलासा झाला. राजस्थान आणि गुजरातसाख्या ठिकाणी अल्पवयीन मुलींची लग्नासाठी तस्करी केली जाते. पोलिसांच्या कारवाईदरम्यान अनेकदा अशा घटना समोर आल्या आहेत.


कुठल्या महिन्यात किती मुली बेपत्ता


जानेवारी - १२६
फेब्रुवारी - १००
मार्च - १३१
एप्रिल - १००
मे - १२१
जून - १२२
जुलै - १०७
ऑगस्ट - १३२
सप्टेंबर १२७
ऑक्टोबर - १३६

Comments
Add Comment

Nitesh Rane : वसई-विरारमध्ये नितेश राणेंची तोफ! वसई-विरारचा विकास फक्त भाजपच करू शकते मंत्री नितेश राणेंचं आश्वासन

नालासोपारा : आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वसई-विरारमध्ये आज नालासोपारा (पूर्व) येथील अचोळे

Highcourt Navi Mumbai Prabhag 17 Election : नवी मुंबईतील प्रभाग १७ (अ) ची निवडणुकीला हायकोर्टाकडून हंगामी स्थगिती; हायकोर्टाचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा धुरळा उडाला असून, राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. येत्या

Donald Trump : ट्रम्पचा रशियाविरोधी कृत्यांमुळे तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला!

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी सत्तेत येताना युक्रेन युद्ध थांबवण्याचे आणि

Mumbai Local Train Fire : ब्रेकिंग : विद्याविहार ते कुर्ल्या दरम्यान लोकलच्या डब्याने घेतला पेट; विद्याविहारहून CSMT कडे जाणारी 'स्लो' लोकल सेवा विस्कळीत

मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या मध्य रेल्वेवर आज ऐन गर्दीच्या वेळी एक थरारक घटना घडली. कुर्ला आणि

देशातील पहिल्या ‘डिजिटल जनगणने’ला एक एप्रिलपासून सुरुवात

नवी दिल्ली : भारत सरकार २०२७ मध्ये जनगणना करणार आहे. या जनगणनेचा पहिला टप्पा, म्हणजेच घरांची यादी बनवण्याचे काम, १

तामिळनाडूतील निवडणुकीसाठी भाजपची ५६ जागा आणि ३ मंत्रिपदांची मागणी

चेन्नई  : भाजपने मागील वर्षी तामिळनाडूत जयललिता यांचा पक्ष एआयडिएमके यांच्या नेतृत्वात विधानसभा निवडणूक