मुंबईतून दररोज ४ ते ५ मुली बेपत्ता ;  मुलींच्या अपहरणाचे ११८७ गुन्हे दाखल


मुंबई : मुंबईत मुलींच्या अपहरणांचं प्रमाण दिवसागणिक वाढत असल्याचं दिसून येत आहे. गेल्या दहा महिन्यात अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचे ११८७ गुन्हे मुंबईत दाखल झाले आहेत. यापैकी १११८ गुन्ह्यांची उकल झाली आहे. या घटनांमुळे मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न उभा आहे.


ऑक्टोबर महिन्यात सर्वाधिक मुली बेपत्ता झाल्या आहेत. मुंबई पोलिसांच्या आकडेवारीनुसार, जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत मुंबईत महिलांसंबंधित ५८८६ गुन्हे दाखल झाले आगेत. त्यापैकी ५५६१ गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे. याशिवाय अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचे ११८७ गुन्हे दाखल झाले असून यासंदर्भात तपास केला जात आहे.


मुली बेपत्ता होण्यामागील कारणं काय?


मिळालेल्या माहितीनुसार, प्रेम प्रकरणातून पळून जाणाऱ्य़ा मुलींची संख्या सर्वाधिक आहे. अनेक ठिकाणी घरातील किरकोळ वाद, पालकांविषयीचा रागही कारणीभूत ठरत असल्याचं दिसून येत आहे. तर सेक्स रॅकेटच्या घटनांचाही खुलासा झाला. राजस्थान आणि गुजरातसाख्या ठिकाणी अल्पवयीन मुलींची लग्नासाठी तस्करी केली जाते. पोलिसांच्या कारवाईदरम्यान अनेकदा अशा घटना समोर आल्या आहेत.


कुठल्या महिन्यात किती मुली बेपत्ता


जानेवारी - १२६
फेब्रुवारी - १००
मार्च - १३१
एप्रिल - १००
मे - १२१
जून - १२२
जुलै - १०७
ऑगस्ट - १३२
सप्टेंबर १२७
ऑक्टोबर - १३६

Comments
Add Comment

श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात न्यूझीलंडचा विजय

कोलंबो : आर. प्रेमदासा स्टेडियम येथे आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमधील सुपर ८ फेरीतल्या श्रीलंका विरुद्ध

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; तिघे जखमी, दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान

रायगड : माणगाव पोलीस ठाणे हद्दीत मुंबई-गोवा महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात तिघे जखमी झाले असून दोन्ही

ई-गव्हर्नन्स मूल्यमापनात वसई–विरार पालिकेचा ‘नववा क्रमांक’ कायम

पालघर :  राज्यातील महानगरपालिकांच्या ई-गव्हर्नन्स कामकाजाच्या मूल्यमापनात वसई–विरार महानगरपालिकाने यंदाही

अनिल अंबानींचे मुंबईतील करोडो रुपयांचे निवासस्थान ईडीकडून जप्त

मुंबई : रिलायन्स अनिल धीरूभाई अंबानी ग्रुपचे (रिलायन्स एडीए ग्रुप) चेअरमन अनिल अंबानी यांचे "अ‍ॅबोड" निवासस्थान

...तरच भारत सेमी फायनल खेळू शकेल

मुंबई : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये सुपर ८ फेरीचे सामने सुरू आहेत. ग्रुप एक मध्ये वेस्ट इंडिज (धावगती

सिंधुदुर्ग किनारपट्टी सुरक्षेसाठी सीसीटीव्ही प्रकल्पाची तातडीने अंमलबजावणी करा - मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग, आचरा, निवती, वेंगुर्ला, मालवण आणि देवगड पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील