पुढील ५ वर्षात केवळ उर्जा प्रकल्पात अदानी समुह ७५ अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार - गौतम अदानी

धनबाद: अदानी समुह पुढील ५ वर्षात ७५ अब्ज डॉलर रूपये झारखंडमध्ये गुंतवणूक करणार आहे असे दस्तुरखुद्द उद्योगपती व समुहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी म्हणाले आहेत. एका कार्यक्रमात बोलताना लोकांना कोळशातील गुंतवणूक पारंपरिक अर्थव्यवस्थेतील वाटू शकते पण या उर्जेशिवाय नवी अर्थव्यवस्था चालणे शक्य नाही ' असे विधान त्यांनी केले आहे. अदानी समुह झारखंडमध्ये खासकरून धनबादमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणार असल्याचेही अदानी यांनी स्पष्ट केले आहे. झारखंडमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूकीच्या संधी आहेत. येणाऱ्या नजीकच्या काळात राज्यात मोठ्या प्रमाणात अर्थव्यवस्थेत प्रगती दिसले. लोकांना ही पारंपरिक अर्थव्यवस्था वाटू शकते पण हिच्याशिवाय नवी अर्थव्यवस्था चालणार नाही' असे विधान गौतम अदानी यांनी केले आहे.


या ७५ अब्ज डॉलर व्यतिरिक्त समुह मोठ्या प्रमाणात देशातील इतर भागातही गुंतवणूक वाढवत आहे. यापूर्वी अदानी समुहाने गुजरात खावडा येथे जगातील सर्वात मोठे ५२० किलोमीटर परिसरात पसरलेले अक्षय उर्जा (Renewable Energy) प्रकल्पाची घोषणा केली होती. आर्थिक वर्ष २०३० पर्यंत पार्क ३० गिगावॉट क्षमतेचा प्रकल्प उभारेल असे कंपनीने नमूद केले होते. याशिवाय बोलताना अदानी म्हणाले आहेत की,'सहयोगी जागतिक व्यापार आणि पुरवठा साखळ्यांचे युग कोसळत आहे. दुर्मिळ खनिजांवरील संघर्ष, शुल्क आणि मोडलेले करार नित्याचे होत आहेत आणि प्रमुख संस्थांना त्यांच्या दीर्घकाळापासूनच्या नियमांवर पुनर्विचार करण्यास भाग पाडत आहेत.'धनबाद येथील प्रकल्पाबाबत बोलताना गौतम अदानी यांनी स्पष्ट केले आहे की,'१० गिगावॉट क्षमतेचे प्रकल्प आधीच कार्यान्वित झाल्यामुळे कंपनी जगातील सर्वात कमी खर्चाची हरित ऊर्जा प्रदान करण्याच्या मार्गावर आहे'

Comments
Add Comment

समृद्धी महामार्गावरील स्वच्छतागृहांची दुरवस्था दूर करून ‘गूगल लोकेशन’ एका महिन्यात उपलब्ध करा; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे शासनाला निर्देश

नागपूर : विधान परिषदेत आ.मिलिंद नार्वेकर यांनी समृद्धी महामार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातात नागरिकांच्या

शेत रस्त्याच्या वादात मिळणार 'मोफत' पोलीस संरक्षण

उपविभागीय अधिकाऱ्यांनाही अधिकार सोपविण्याची तरतूद विलंब टाळण्यासाठी इमेल द्वारे पाठविण्यात येणार नोटीस •

मुद्रांक शुल्क वादाबाबत उच्च न्यायालयाऐवजी थेट राज्य शासनाकडे अपील

विधानसभेत सुधारणा विधेयक एकमताने मंजूर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत मांडले

 भोगवटादार वर्ग-२ जमिनींवरील 'गहाण शुल्क' वसुलीला कायदेशीर संरक्षण २००९ पासूनची आकारणी वैध ठरणार

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत मांडलेले विधेयक संमत 'महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (दुसरी

"उद्धव ठाकरे अधिवेशनासाठी नाही, तर सहलीला आलेत"; परिणय फुकेंचा घणाघात

नागपूर : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनानिमित्त नागपुरात राजकीय वातावरण तापले आहे. उद्धव ठाकरे यांनी विधानसभा

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानातून गावांच्या समृद्धीची दिशा मिळेल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान शीर्षक गीत लोकार्पण कार्यक्रम नागपूर : राज्यात मागील काही दिवसात झालेल्या