जुन्नर वनविभागात बिबट्याचा हैदोस! २५ वर्षांत ५५ बळी, २८ हजार पशुधन फस्त; नसबंदी आणि AI कॅमेऱ्यांचा वापर करण्याची शासनाची माहिती

नागपूर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर वनविभागात वन्यप्राणी बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांमुळे निर्माण झालेल्या गंभीर संकटावर आज विधिमंडळात चर्चा झाली. सरकारने लेखी उत्तरात दिलेल्या माहितीनुसार, सन २००१ पासून नोव्हेंबर २०२५ पर्यंत बिबट्याच्या हल्ल्यात एकूण ५५ व्यक्तींचा मृत्यू झाला असून १५० व्यक्ती गंभीर जखमी झाल्या आहेत. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये मोठी भीती पसरली आहे. याच कालावधीत, बिबट्याने पाळीव पशुधनाचेही मोठे नुकसान केले आहे. २००१ पासून नोव्हेंबर २०२५ पर्यंत २७ हजार ९५२ पशुधनाचा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यात झाल्याची धक्कादायक आकडेवारी शासनाने सादर केली आहे.



बिबट्यांच्या नियंत्रणासाठी महत्त्वपूर्ण उपाययोजना


या वाढत्या हल्ल्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी शासनाने महत्त्वाच्या उपाययोजना करण्याची माहिती दिली आहे, केंद्र सरकारने प्रायोगिक तत्त्वावर बिबट्यांची नसबंदी करण्यास परवानगी दिली आहे. या अनुषंगाने पुढील कार्यवाही सुरू करण्यात येत आहे. बिबट्यांना बंदिस्त करण्यासाठी वनविभागाकडून पिंजऱ्यांची संख्या वाढवण्यात येणार आहे. जे बिबटे बंदिस्त केले जातील, त्यांचे राज्यातील इतर प्राणी संग्रहालये किंवा संरक्षित क्षेत्रांमध्ये सुरक्षितपणे स्थानांतरण केले जाईल. माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्र तसेच राज्यातील इतर केंद्रांचे विस्तारीकरण करून त्यांची क्षमता वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. बिबट्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आणि हल्ल्यांची पूर्वसूचना देण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आधारित कॅमेरे आणि अनोइडर्स मशिन बसवण्याची उपाययोजनाही करण्यात येणार आहे.


जुन्नर वनविभाग आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांचे जीव व पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी या उपाययोजनांची अंमलबजावणी किती प्रभावी ठरते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Comments
Add Comment

Dhule News : शिरपूर-चोपडा मार्गावर भीषण अपघात; दोन जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू

Dhule News : धुळे जिल्ह्यातुन एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील शिरपूर-चोपडा मार्गावर झालेल्या भीषण अपघातात

Tiranga Rally : भाजप प्रत्येक जिल्ह्यात काढणार 'तिरंगा रॅली'

- ९ ते १७ ऑगस्टदरम्यान आयोजन; १० ऑगस्टला मुंबईत २५ हजार तरुणांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी होणार मुंबई :

Rickshaw-Taxi Driver : 15 ऑगस्टनंतर 'या' रिक्षा-टॅक्सी चालकांवर कारवाईची शक्यता; मुदतवाढ मिळणार नाही

मुंबई : राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेचे मूलभूत ज्ञान अनिवार्य करण्याच्या निर्णयाची

Ahilyanagar : शेततळ्यात बुडून दोन शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू; परिसरात हळहळ

Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात एक मन हेलावणारी घटना घडली आहे. कोपरगाव तालुक्यातील बाहदराबाद

Pune News : हिंजवडी आयटी पार्कमध्ये अचानक 100 हून अधिक NSG कमांडो, नेमकं काय आहे प्रकरण?

पुणे : पुण्यातील हिंजवडी आयटी (IT Park) पार्कमध्ये बुधवारी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त आणि नॅशनल सिक्युरिटी

Agriculture Department : कृषी निविष्ठा घोटाळ्याप्रकरणी १५ अधिकाऱ्यांचे निलंबन

- कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचा दणका; विभागीय चौकशीचे आदेश मुंबई : धाराशिव जिल्ह्यातील कृषी विभागात राष्ट्रीय