Game Changer Decision.... वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे मार्गाला हिरवा कंदील, कोकणच्या विकासाची दारं उघडणार!'

आंबा, काजू, मत्स्य व्यवसायाला चालना मिळणार; तरुणांना गावातच रोजगार उपलब्ध होईल – मंत्री नितेश राणे


नागपूर: वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे मार्गाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला अखेर हिरवा कंदील मिळाल्याबद्दल मंत्री नितेश राणे यांनी सत्ताधारी पक्षाच्या निर्णयाचे जोरदार स्वागत केले आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्र आणि विशेषतः कोकण विभागाच्या विकासाची गती वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राणे यांनी या प्रकल्पाला 'महाराष्ट्रासाठी घेतलेला गेम चेंजर निर्णय' असे संबोधले.


मंत्री नितेश राणे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, "वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे मार्ग हा केवळ एक रेल्वे मार्ग नसून, तो कोकणच्या विकासाची दारं उघडणार आहे. या निर्णयामुळे कोकणचा आणि महाराष्ट्राचा वेगवान विकास साधता येणार आहे."



कोकणातील अर्थव्यवस्थेला मिळणार बळ


राणे यांनी यावेळी या प्रकल्पाचे कोकणातील अर्थव्यवस्थेवर होणारे सकारात्मक परिणाम स्पष्ट केले. ते म्हणाले, "या रेल्वे मार्गामुळे आंबा व्यवसाय, काजू व्यवसाय आणि मत्स्य व्यवसायाला मोठी चालना मिळणार आहे. दळणवळण सोपे आणि स्वस्त झाल्याने कोकणातील उत्पादने थेट मोठी बाजारपेठ गाठू शकतील."



सिंधुदुर्गच्या तरुणांसाठी विशेष संधी


या प्रकल्पामुळे कोकणातील तसेच नाशिकमधील युवकांसाठी रोजगाराच्या विशेष संधी निर्माण होतील, असेही नितेश राणे यांनी नमूद केले. ते म्हणाले, "आता गावातच राहून रोजगार निर्माण करण्याची संधी मिळेल. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुण कुठल्याही आव्हानाला सामोरे जाऊन या विकासात पुढे जाईल, यात शंका नाही."



उद्धव ठाकरे यांना आज माझ्याकडून सुट्टी


नितेश राणे यांनी या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त करताना उपरोधिकपणे उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. ते म्हणाले, "कोकणच्या विकासाचा हा निर्णय पाहता, मी माझ्याकडून आज उद्धव ठाकरे यांना सुट्टी देतो!" वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे मार्गाला हिरवा कंदील मिळाल्याने सिंधुदुर्गसह संपूर्ण कोकणात आनंद व्यक्त होत असून, या निर्णयामुळे अनेक दशकांची मागणी पूर्ण झाली आहे.

Comments
Add Comment

कोकणासाठी सोनेरी दिवस; महाराष्ट्र सरकार उभारणार वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्ग

मंत्री नितेश राणेंनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार; सिंधुदुर्ग जिल्ह्यात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण

Breaking News ! पालिका निवडणुकीसाठी युतीचा फॉर्म्युला ठरणार? भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात आज रात्री ९ वाजता महत्त्वपूर्ण बैठक

नागपूर : राज्यात आगामी महानगरपालिका निवडणुकांचे वारे वाहू लागले असतानाच, शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्या

मुख्यमंत्र्यांसह सर्व लोकप्रतिनिधी आता लोकायुक्तांच्या चौकशीकक्षेत

महाराष्ट्र लोकायुक्त सुधारणा विधेयक २०२५ विधानसभेत मंजूर नागपूर : महाराष्ट्रातील भ्रष्टाचार विरोधी यंत्रणेला

पुणे आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थिनींना वारंवार करावी लागते 'प्रेग्नन्सी टेस्ट'; आमदारांनी उपस्थित केला गंभीर प्रश्न

नागपूर : पुणे जिल्ह्यातील आदिवासी शासकीय वसतिगृहांमध्ये विद्यार्थिनींना सुट्टीवरून परतल्यानंतर वारंवार

मुंबईकरांसाठी मोठी भेट, ओसी नसलेल्या २० हजार इमारतींना मिळणार दिलासा

दहा लाखांपेक्षा जास्त मुंबईकरांना फायदा सुधारीत भोगवटा अभय योजनेची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून

महसूली सुनावण्याचे अधिकारी राज्यमंत्री, सचिवांनाही!

विभागातील १३ हजार अपीलांच्या निपटाऱ्यासाठी मार्ग मोकळा मामलतदार न्यायालय अधिनियमन सुधारणा विधेयक विधानसभेत