बिबट्यांच्या समस्येवर ९० दिवसांत उपाय करा

नागपूर : बिबट्याची दहशत संपवा, राज्यात दोन बिबट्या रेस्क्यू सेंटर सुरू करा... बिबट्यांच्या समस्येवर ९० दिवसांत उपाय करा अशी मागणी शिवसेना आमदार शरद सोनावणे यांनी केली आहे.


बिबट्यांचे राज्यातल्या नागरी वस्तीवरचे हल्ले वाढत आहेत. मागील तीन महिन्यांत बिबट्यांमुळे ५० पेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत. बिबट्या हा मांजर प्रकारातील (मार्जार वर्गातील) वन्य प्राणी आहे. याआधी २०१४ - १५ मध्ये बिबट्याचा धोका सांगितला होता. पण त्यावेळी या धोक्याकडे दुर्लक्ष केले गेले. आता संकटाची तीव्रता वाढली आहे. बिबटे वेळीअवेळी कुठेही हल्ले करत आहेत. यामुळे मुलांनी शाळेत जाणे थांबवले. शेतावर किंवा अन्यत्र कामासाठी जाणाऱ्यांना भीती वाटू लागली आहे. एरवी सकाळी घराबाहेर पडणारे सकाळी १० किंवा ११ वाजता घराबाहेर पडून अवघ्या काही तासांत कामं उरकून परतत आहेत. बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे नागरिक दहशतीच्या वातावरणात जगत आहेत. या संकटातून मार्ग काढणे आवश्यक आहे.


राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच वनमंत्री गणेश नाईक यांनी बिबट्याच्या समस्येकडे गांभिर्याने बघावे. बिबट्यांची समस्या सोडवण्यासाठी दोन रेस्क्यू सेंटर अर्थात बिबट्या बचाव केंद्र सुरू करावी. यातील एक पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात आणि एक अहिल्यानगर जिल्ह्यात सुरू करावे. उभारलेल्या दोन पैकी एका रेस्क्यू सेंटरमध्ये नर बिबटे आणि दुसऱ्या सेंटरमध्ये मादी बिबट्यांची व्यवस्था करावी. वर्ल्ड वाईज नावाची संस्था बिबट्याची देखभाल करण्यास तयार आहे. रेस्क्यू सेंटरसाठी शासनाने निधीची व्यवस्था करावी. प्रत्येक सेटंरमध्ये किमान एक हजार बिबट्यांची कायमस्वरुपी राहण्याची व्यवस्था करावी; अशी मागणी शिवसेना आमदार शरद सोनावणे यांनी केली आहे.


बिबट्याच्या हल्ल्यात माणूस मेल्यानंतर २५ लाख रुपये देतात. पण २५ लाखांत आमचा माणूस परत येत नाही ना .. आम्हाला पैसा नको आतापर्यंत साडे १७ कोटी दिलेत . साडे १७ कोटी रुपयांची माती झाली, असे सांगत शरद सोनावणे यांनी बिबट्यांचा प्रश्न सोडवम्यासाठी तातडीने उपाय करण्याची मागणी केली.

Comments
Add Comment

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला

मुंबई: राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या घामाने आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या सुमारे ८६ हजार