महाराष्ट्रात बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांचा गंभीर प्रश्न; नागपूर अधिवेशनात आमदार सोनवणे यांनी वेधले लक्ष, 'राज्य आपत्ती' घोषित करण्याची मागणी

नागपूर : महाराष्ट्रात बिबट्यांच्या वाढत्या संख्येमुळे आणि त्यांच्या मानवी वस्तीत घुसून होणाऱ्या जीवघेण्या हल्ल्यांमुळे निर्माण झालेल्या गंभीर आणि चिंताजनक परिस्थितीवर विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात लक्ष वेधण्यात आले आहे. आमदार शरद सोनावणे यांनी विधानसभा परिसरातच ‘बिबट्याच्या वेशात’ दाखल होऊन या समस्येकडे सर्वांचे लक्ष वेधले. ही घटना अधिवेशनातील प्रमुख आकर्षण ठरली आणि राजकीय व सामाजिक चर्चेचा विषय बनली. आमदार शरद सोनवणे यांनी या प्रश्नाची तीव्रता सभागृहासमोर मांडून सरकारला तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.



बिबट्यांच्या हल्ल्यांची भयावह आकडेवारी आणि भीतीचे वातावरण:


आमदार सोनवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या संपूर्ण महाराष्ट्रात बिबट्यांची संख्या तब्बल नऊ ते दहा हजारांपर्यंत पोहोचली आहे. या वाढत्या संख्येमुळे मनुष्य-प्राणी संघर्ष वाढला आहे. एकट्या जुन्नर तालुक्यात गेल्या तीन महिन्यांत बिबट्यांच्या हल्ल्यांमध्ये ५५ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. बिबट्याच्या दहशतीमुळे ग्रामीण भागात मोठे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लहान मुले अंगणात खेळायलाही धजावत नाहीत. शेतकरी शेतीत काम करण्यासाठी कचरत आहेत, ज्यामुळे शेतीच्या कामांवर परिणाम होत आहे.



'राज्य आपत्ती' घोषित करण्याची आणि तातडीने रेस्क्यू सेंटर्स उभारण्याची मागणी


परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार सोनवणे यांनी सरकारकडे अत्यंत महत्त्वपूर्ण आणि तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. बिबट्याच्या हल्ल्यांना 'राज्य आपत्ती' घोषित करून, मुख्यमंत्र्यांनी यावर 'सु-मोटो' निर्णय घ्यावा. सध्याचे उपाय निरुपयोगी ठरत असल्याने, बिबट्यांना पकडून सुरक्षित स्थळी ठेवण्यासाठी तातडीने केंद्रे उभारण्याची गरज आहे. जुन्नर आणि अहिल्यानगर (अहमदनगर) येथे प्रत्येकी एक हजार बिबटे ठेवता येतील, अशा क्षमतेची दोन रेस्क्यू सेंटर्स तीन महिन्यांच्या आत उभारण्याची मागणी त्यांनी केली आहे.



विधानपरिषदेतही गंभीर चर्चा


याचदरम्यान, नागपुरात जिथे हिवाळी अधिवेशन सुरू आहे, तिथेही बिबट्या आढळल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी विधानपरिषदेत या विषयावर माहिती दिली, आज नागपूरात बिबट्या आढळला आहे, त्याबद्दल माहिती घेतली आहे. कालदेखील खालच्या सभागृहात सविस्तर चर्चा झाली आहे. आज विदर्भातील आमदारांची बैठक लावण्यात आली आहे.... यामध्ये आणखी सविस्तर चर्चा केली जाईल."

Comments
Add Comment

Crime News : आधी कार आता दुचाकी जळून खाक, अहिल्यानगरात काय घडतंय ? CCTV तील 'ते' दृश्य पाहून संशय बळावला

Crime News :  अहिल्यानगर शहरात वाहनांना लक्ष्य करून आग लावण्याच्या घटना सुरूच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Jalgaon : भीषण अपघातामुळे वाटेतच काळाची झडप, १ वर्षाच्या चिमुकलीसह चौघांचा हृदयद्रावक अंत

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील वरणगावजवळ मुंबई-नागपूर महामार्गावरील (Mumbai-Nagpur Highway) बायपासवर थरारक अशी भीषण रस्ते अपघाताची

Crime News : शिट्टी वाजवली, उसाच्या शेतातून 10 ते 12 जण बाहेर आले, अन.... स्वस्तात सोने मिळण्याचे आमिष महागात पडले

अहिल्यानगर : स्वस्तात सोने मिळणार असल्याचं आमिष दाखवत रायगडच्या जिल्हा परिषद सदस्यालाच सापळ्यात ओढून तब्बल 52

Kolhapur News : कोल्हापूरात कोल्ह्याची दहशत! साडेतीन वर्षांच्या चिमुकल्यासह ११ जण जखमी; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांच्या (Attack) घटना सातत्याने समोर येत असताना आता

Yavatmal Murder Case : ‘गिफ्ट लवकरच पाठवतो’... स्टेटस ठेवला अन् घरात घुसून सपासप वार; तरुणाची निर्घृण हत्या

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारांचे प्रमाण वाढत चालले आहे. अशातच आणखी एका हत्येची घटना समोर आली

Navi Mumbai Airport Shivaji Maharaj Statue : नवी मुंबई विमानतळावर शिवरायांचा भव्य पुतळा! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते १२ फूट उंच कांस्य अर्धपुतळ्याचे अनावरण

नवी मुंबई : महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य १२ फूट उंच कांस्य