नाशिक - पुणे रेल्वे मार्गात बदल, अहिल्यानगरचे नागरिक नाराज

नागपूर : कित्येक वर्षांपासून बहुचर्चित नाशिक - पुणे लोहमार्ग होण्याच्या दिशेने गंभीरपणे हालचाली सुरू झाल्या आहेत. पण अचानक रेल्वे प्रशासनाने प्रस्तावीत मार्गात बदल केला आहे. यामुळे नाशिककर संतापले आहेत.


पुणे नाशिक रेल्वेचा मार्ग आता अहिल्यानगर - शिर्डीमार्गे जाणार आहे. या बदलामुळे संगमनेरसह संपूर्ण दक्षिण अहिल्यानगर जिल्हा रेल्वेसेवेपासून दूर जाणार आहे. स्थानिकांच्या विकासाच्या संधी हिरावून घेणारा हा निर्णय असल्याचे संगमनेरमधील संघटनांचे मत आहे. नाशिक - पुणे रेल्वेमार्गाचे तीन वेळा सर्वेक्षण झाले असताना अचानक मार्ग बदलण्यात आल्याने नाराजी पसरली आहे.


नाशिक- पुणे रेल्वे मार्ग संगमनेर मार्गे व्हावा हे आपले अनेक वर्षांचे स्वप्न आहे, या मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल २०२० मध्ये मंजूर झाला होता. महारेलने भूसंपादनाची प्रक्रियाही सुरु केली होती, नाशिक, अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यात भूसंपादनही झाले होते. मात्र २०२५ मध्ये अचानक शिर्डी मार्गे नव्या सविस्तर प्रकल्प अहवालास मंजुरी देण्यात आली. अहिल्यानगर , संगमनेर मार्गे होणाऱ्या रेल्वे मार्गामुळे शेतकऱ्यांना आपला माल पुणे शहरात पोहोचवण्यास मदत होईल इतकंच नाही तर पर्यटन क्षेत्रालाही चालना मिळेल. हा मुद्दा अहिल्यानगर जिल्ह्यातील आमदारांनी हिवाळी अधिवेशनात मांडला आहे. तर जिल्ह्यातील राजकारण दूर ठेवून या निर्णयासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी एकत्र यावे, असे आवाहन सत्यजित तांबे यांनी केले आहे.

Comments
Add Comment

राज्यात थंडी वाढणार! काही ठिकाणी तुरळक पावसाचाही अंदाज

मुंबई: नववर्षाच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा मोठे बदल जाणवत आहेत. १ जानेवारीला कोकणात

महाराष्ट्रात फक्त आणि फक्त मराठीचीच सक्ती!

स्वराज्यविस्तारक छत्रपती शाहू महाराज साहित्यनगरी (सातारा) : ‘महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त मराठीच सक्ती आहे’,

बस पेटल्याने समृद्धी महामार्गावर चालकाचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) : समृद्धी महामार्गावर वैजापूरहून, मुंबईहून येणाऱ्या दिशेच्या मार्गावर ट्रॅकची

बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या तीन मुलांच्या कुटुंबियांना मदतीचा हात

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तीन कुटुंबांना प्रत्येकी पाच लाखांची मदत आमदार शरद सोनावणे आणि

९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे साताऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्घाटन

राज्यात शालेय शिक्षणात मराठी हीच अनिवार्य भाषा– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डॉ. नरेंद्र जाधव यांच्या

महायुती सरकारचा ऐतिहासिक निर्णय, छत्रपती संभाजी महाराज समाधीसाठी अडीच एकर जमीन देणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुढाकार मुंबई :