नाशिक - पुणे रेल्वे मार्गात बदल, अहिल्यानगरचे नागरिक नाराज

नागपूर : कित्येक वर्षांपासून बहुचर्चित नाशिक - पुणे लोहमार्ग होण्याच्या दिशेने गंभीरपणे हालचाली सुरू झाल्या आहेत. पण अचानक रेल्वे प्रशासनाने प्रस्तावीत मार्गात बदल केला आहे. यामुळे नाशिककर संतापले आहेत.


पुणे नाशिक रेल्वेचा मार्ग आता अहिल्यानगर - शिर्डीमार्गे जाणार आहे. या बदलामुळे संगमनेरसह संपूर्ण दक्षिण अहिल्यानगर जिल्हा रेल्वेसेवेपासून दूर जाणार आहे. स्थानिकांच्या विकासाच्या संधी हिरावून घेणारा हा निर्णय असल्याचे संगमनेरमधील संघटनांचे मत आहे. नाशिक - पुणे रेल्वेमार्गाचे तीन वेळा सर्वेक्षण झाले असताना अचानक मार्ग बदलण्यात आल्याने नाराजी पसरली आहे.


नाशिक- पुणे रेल्वे मार्ग संगमनेर मार्गे व्हावा हे आपले अनेक वर्षांचे स्वप्न आहे, या मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल २०२० मध्ये मंजूर झाला होता. महारेलने भूसंपादनाची प्रक्रियाही सुरु केली होती, नाशिक, अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यात भूसंपादनही झाले होते. मात्र २०२५ मध्ये अचानक शिर्डी मार्गे नव्या सविस्तर प्रकल्प अहवालास मंजुरी देण्यात आली. अहिल्यानगर , संगमनेर मार्गे होणाऱ्या रेल्वे मार्गामुळे शेतकऱ्यांना आपला माल पुणे शहरात पोहोचवण्यास मदत होईल इतकंच नाही तर पर्यटन क्षेत्रालाही चालना मिळेल. हा मुद्दा अहिल्यानगर जिल्ह्यातील आमदारांनी हिवाळी अधिवेशनात मांडला आहे. तर जिल्ह्यातील राजकारण दूर ठेवून या निर्णयासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी एकत्र यावे, असे आवाहन सत्यजित तांबे यांनी केले आहे.

Comments
Add Comment

संगमनेर येथील 'पोकळी हिस्से' नोंदीचा प्रश्न मार्गी

नागपूर : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथील इंदिरा नगर भागात सर्वे

पुण्यात पोर्शे कार अपघात प्रकरणी पोलिसांविरोधात मोठी कारवाई

पुणे : पुण्याच्या कल्याणीनगर भागात १९ मे २०२४ रोजी पोर्शे कारचा अपघात झाला होता. पोर्शे कारने अश्विनी कोस्टा आणि

दीपावलीला युनेस्कोचा दर्जा; सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी सभागृहात केले निवेदन

नागपूर : युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत दीपावलीचा समावेश करण्यात आल्याने भारतीय संस्कृतीचा जगभर

महाराष्ट्रात बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांचा गंभीर प्रश्न; नागपूर अधिवेशनात आमदार सोनवणे यांनी वेधले लक्ष, 'राज्य आपत्ती' घोषित करण्याची मागणी

नागपूर : महाराष्ट्रात बिबट्यांच्या वाढत्या संख्येमुळे आणि त्यांच्या मानवी वस्तीत घुसून होणाऱ्या जीवघेण्या

बिबट्यांच्या समस्येवर ९० दिवसांत उपाय करा

नागपूर : बिबट्याची दहशत संपवा, राज्यात दोन बिबट्या रेस्क्यू सेंटर सुरू करा... बिबट्यांच्या समस्येवर ९० दिवसांत

थकीत ₹५००० कोटी दंड वसुलीसाठी फडणवीसांची 'कठोर' घोषणा; लवकरच नवी पॉलिसी

नागपूर : विधान परिषदेत आज टू-व्हीलर पार्किंग आणि वाहनधारकांकडून थकीत चालान वसूल करण्याच्या प्रश्नावर