Indigo Flight Cancellations : इंडिगोच्या गोंधळामुळे अडचणीत सापडलेल्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, असे करा प्रवासाचे नियोजन किंवा मिळवा रिफंड

मुंबई : देशातील सर्वात स्वस्त विमानसेवा म्हणून मिरवणाऱ्या इंडिगो कंपनीची आठवड्याभरात काही हजार उड्डाणं रद्द झाली आहेत. कोणी कौटुंबिक कारणामुळे तर कोणी मुलाखत देण्यासाठी अथवा परीक्षेसाठी वा कामाच्या ठिकाणावर जाण्यासाठी म्हणून विमान प्रवास करत होते. कोणी लग्न, साखरपुडा आदी शुभकार्यांसाठी प्रवास करत होते. काही जण वैद्यकीय उपचारांसाठी विमानाने जात होते. पण सर्वांचे प्रवासाचे नियोजन कोलमडले कारण इंडिगोनं प्रचंड गोंधळ घातला. या गोंधळाची गंभीर दखल केंद्र सरकारने तसेच डीजीसीएने घेतली आहे. डीजीसीएने नोटीस बजावताच इंडिगोने अनेक वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देऊन प्रवाशांची जाहीर माफी मगितली आहे.


आता प्रवाशांनी काळजी करण्याची गरज नाही. फ्लाईट उशिरा येणार असेल किंवा रद्द झाली असेल, तर इंडिगो प्रवाशांना संपूर्ण रिफंड किंवा फ्लाईट री-शेड्युल करण्याची सुविधा सोप्या पद्धतीने उपलब्ध करून देत आहे.


रिफंड आणि री-शेड्युलिंग करण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. प्रवाशांनी सर्वप्रथम इंडिगोच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ‘सपोर्ट’ या पर्यायावर क्लिक करायचे. त्यानंतर ‘प्लॅन बी’ हा पर्याय निवडल्यावर फ्लाईट बदलणे, तिकीट रद्द करणे किंवा रिफंड मिळवणे हे तीनही पर्याय उपलब्ध होतात. प्रवासी त्यांचा PNR/बुकिंग नंबर आणि ईमेल आयडी किंवा अंतिम नाव टाकल्यानंतर त्यांना दोन पर्याय मिळतात फ्लाईट री-शेड्युल करणे किंवा फ्लाईट रद्द करून पैसे परत घेणे. आवश्यक असल्यास प्रवासी नवीन तारीख किंवा वेळ निवडून त्यांचे प्रवास नियोजन बदलू शकतात.


रिफंडची विनंती स्वीकारल्यानंतर साधारणतः सात कामकाजाच्या दिवसांत रक्कम संबंधित बँक खात्यात जमा होते. तिकीट जर कोणत्याही ट्रॅव्हल एजन्सीतून बुक केले असेल, तर रिफंडसाठी प्रवाशांना त्या एजन्सीशी संपर्क साधावा लागेल.


सरकारकडून कडक सूचना मिळाल्यानंतर इंडिगोने रिफंड आणि प्रवासी सहाय्याची प्रक्रिया अधिक गतीने सुरू केली आहे. कंपनीने आतापर्यंत ६१० कोटी रुपये रिफंडच्या स्वरूपात परत केले असल्याचे सांगितले आहे. तसेच रद्द झालेल्या किंवा खूप उशिर झालेल्या फ्लाईट्सच्या री-शेड्युलिंगसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. प्रवाशांना मदत करण्यासाठी विशेष सपोर्ट सेल्स तयार करण्यात आले असून देशभरातील सुमारे ३००० गहाळ बॅगा संबंधित प्रवाशांना परत करण्यात आल्या आहेत; असेही इंडिगोने सांगितले आहे.

Comments
Add Comment

Railways Act : रेल्वे कायदा, १९८९ मध्ये सुधारणा, विनातिकीट प्रवास आणि आरक्षित डब्यात प्रवेशावर वाढला दंड

मुंबई : रेल्वे कायदा, १९८९ मधील काही प्रमुख तरतुदींमध्ये सुधारणा करण्यात आली असून, अनधिकृत प्रवास, आरक्षित

PoP ban : पीओपी बंदीवर अंतिम निर्णयाची प्रतीक्षा, राज्य सरकारच्या भूमिकेवर न्यायालयाचे ताशेरे

मुंबई : पर्यावरणस्नेही सण-उत्सवांना प्रोत्साहन देण्याच्या पार्श्वभूमीवर प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी)

Minister Gulabrao Patil : सिंधुदुर्गला मोठा दिलासा! वेंगुर्ला-चिपी पाणीपुरवठा योजनेला गती; एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे गुलाबराव पाटील यांचे निर्देश

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी प्रकल्पावर आधारित वेंगुर्ला ते चिपी विमानतळ पाणीपुरवठा योजनेच्या

Devendra Fadnavis : २०३० पर्यंत राज्यात ३०० किमी नवे मेट्रो मार्ग सुरू होणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; प्रत्येक प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन मुंबई : "राज्यातील मुंबई, पुणे

Central Railway New Rules : रेल्वेच्या नव्या नियमांनुसार विनातिकीट प्रवास, आरक्षित डब्यात घुसखोरी केल्यास आता भरावा लागणार हजारोंचा दंड; जाणून घ्या नवीन नियमांबद्दल

मुंबई : रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि प्रवाशांसाठी सुलभ करण्याच्या उद्देशाने रेल्वे कायदा, १९८९

Nitesh Rane : पाणी साठवण प्रकल्पाला खोपोली मत्स्यबीज केंद्राची जागा देणार, मत्स्य उत्पादनावर परिणाम होणार नाही; मंत्री नितेश राणे

सर्व संबंधित विभागांच्या समन्वयातून तोडगा