प्लास्टिकवर प्रक्रिया करून तरुण बनला करोडपती

कचऱ्याचे रूपांतरण संपत्तीत


दिल्ली : दिल्लीतील एका तरुणाने प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी एक नवीन पद्धत शोधून काढली आहे. यातून त्याने मोठा व्यवसाय सुरू केला असून त्याची वार्षिक उलाढाल कोट्यवधी रूपये आहे.


प्लास्टिकचा वापर झपाट्याने वाढत आहे. पाण्याच्या बाटल्यांपासून ते कोल्ड्रिंक्सपर्यंत, सर्व काही आता प्लास्टिकपासून बनवले जाते. एकूणच, प्लास्टिक हळूहळू दैनंदिन जीवनात प्रवेश करत आहे. परिणामी, घरांमधून मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा तयार होत आहे. त्याचा पुनर्वापर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. दिल्लीतील मोहम्मद सुहेलने प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी एक नवीन पद्धत शोधून काढली. या शोधासाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत आणि त्यांच्या कामाचे उद्दिष्ट प्लास्टिक प्रदूषण कमी करणे आणि कचरा व्यवस्थापनासाठी एक शाश्वत उपाय प्रदान करणे हे आहे. यातून त्याने मोठा व्यवसाय सुरू केला आहे, ज्याची वार्षिक उलाढाल कोट्यवधी आहे. सुहेलने प्लास्टिकचा पुनर्वापर करण्यासाठी २०१९ मध्ये एथर पॅकेजिंग सोल्युशन्सची स्थापना केली. हा असा काळ होता जेव्हा कोरोनामुळे संपूर्ण जगाला घरातच राहावे लागले होते. भारतासह जगातील बहुतेक देश लॉकडाऊनमध्ये होते. याच काळात सुहेलला त्याच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा दिसला. तेव्हाच त्याला ते रिसायकल करण्याची कल्पना सुचली.


सुहेल याने सांगितले की त्याच्या कंपनीने आतापर्यंत ३०० टन प्लास्टिक रिसायकल केले आहे. सध्या कंपनीची उलाढाल १.५ कोटी रुपये आहे. त्यांचे पॅकेजिंग उत्पादने ६० हून अधिक शहरांमधील ७०० डीलर्सना दिली जातात. सुहेल यांनी स्पष्ट केले की, तो प्रथम कोणते प्लास्टिक रिसायकल केले जाऊ शकते हे ओळले.


त्यानंतर ते मोठ्या कारखान्यांमधील प्लास्टिक कचरा वेगळा केला आणि गोळा केला. त्यानंतर ते कारखान्यात आणतात, ते पूर्णपणे वितळवून त्याला नवीन आकार देण्याचा प्रयत्न करत. त्याचा रंग देखील पूर्णपणे काढून टाकतात. हे नवीन उत्पादन इतर देशांमध्ये आणि शहरांमध्ये विक्रीसाठी पाठवले जाते.

Comments
Add Comment

बदरी-केदारसह चारधाममध्ये मोबाईल बंदी ,प्रशासनाची रील आणि फोटोवर कडक नजर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तराखंड सरकारने चारधाम यात्रेची मर्यादा आणि शांतता अबाधित राखण्यासाठी यावर्षी

कर्तव्यपथावर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा जयघोष

प्रजासत्ताक दिनी अवतरणार आत्मनिर्भर 'गणेशोत्सवा'चा भव्य चित्ररथ नवी दिल्ली(वृत्तसंस्था ) : राजधानी नवी दिल्ली

भाजप हीच देशाची पहिली पसंती: पंतप्रधान मोदी

सुशासनासाठी जनतेचा विक्रमी जनादेश! देशाला आता केवळ विकास आणि 'गुड गव्हर्नन्स' हवा दिसपुर (वृत्तसंस्था): आज भाजप

Papa Rao Killed in Encounter : नक्षलवाद्यांचा अजून ईक्का ठार..पोलीसांची मोठी कारवाई.

छत्तीसगड: छत्तीसगडमधील नक्षलविरोधी मोहिमेत सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे व तेथील नागरिकांना ही दिलासा

भारतीय सेनेच्या ताफ्यात कामिकाझे ड्रोन

नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय सेना आपल्या लढाऊ क्षमतेत सातत्याने वाढ करत असून, त्याचाच भाग म्हणून सेनेने

प्रजासत्ताक दिनासाठी सुरक्षा यंत्रणा सज्ज

दहशतवादी हल्ल्याचे सावट नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर गुप्तचर यंत्रणांनी देशभरातील सुरक्षा