इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची विराटला ७ वर्षांनी संधी

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना ६ डिसेंबर रोजी विशाखापट्टणम येथे खेळला जाणार आहे. मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत असल्याने दोन्ही संघांसाठी हा सामना ‘करो या मरो’चा आहे. या सामन्यात सर्वांचे लक्ष विराट कोहलीवर असेल. सलग दोन सामन्यांमध्ये शतके झळकावून विराट कोहलीने हे सिद्ध केले आहे की फॉर्ममध्ये असताना जगातील कुठलाही गोलंदाज त्याच्यापुढे फिकाच पडतो. तशातच मालिकेतील शेवटच्या सामन्यात विराटला सात वर्षांपूर्वीचा पराक्रम पुन्हा करण्याची संधी आहे.


विराट कोहलीने मालिकेची सुरुवात १३५ धावांच्या शानदार खेळीने केली होती. त्यामुळे भारतीय संघाला विजय मिळाला. दुसऱ्या सामन्यातही त्याने १०२ धावांचे शतक झळकावले, पण संघाला पराभव पत्करावा लागला. सलग दोन शतकांसह तो आता अशा टप्प्यावर आहे, जिथे आणखी एक शतक त्याला क्रिकेट इतिहासात एक खास स्थान मिळवून देईल. त्याच्याकडे एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतकांची हॅटट्रिक करण्याची संधी आहे. विराटने त्याच्या संपूर्ण एकदिवसीय कारकिर्दीत फक्त एकदाच सलग तीन शतके झळकावली आहेत. त्याने २०१८ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध ही कामगिरी केली होती. आता पुन्हा अशीच कामगिरी केल्यास ही त्याची कारकिर्दीतील शतकांची दुसरी हॅटट्रिक ठरेल. आतापर्यंत फक्त पाकिस्तानच्या बाबर आझमनेच दोनदा ही कामगिरी केली आहे. जर विराटने ही कामगिरी केली, तर तो या खास क्लबचा दुसरा खेळाडू ठरेल.


विशाखापट्टणममधील खेळीकडे लक्ष : २०१८ मध्ये जेव्हा विराट कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्ध शतकांची हॅटट्रिक केली होती, तेव्हा त्यापैकी एक शतक विशाखापट्टणममध्ये आले होते. विशाखापट्टणममध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात त्याने नाबाद १५७ धावा केल्या होत्या. आता सात वर्षांनंतर विराटला दक्षिण आफ्रिकेविरूद्धचा तिसरा एकदिवसीय सामना याच विशाखापट्टणमच्या मैदानात खेळणार आहे.

Comments
Add Comment

IPL 2026 : सामना न खेळणाऱ्या खेळाडूंसाठी बीसीसीआयने जाहीर केली नवीन नियमावली; नियमांचे पालन न केल्यास होणार कारवाई

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच बीसीसीआयने आयपीएलसाठी अनेक कठोर नियम लागू केले आहेत. या नवीन

Bangladesh Cricket Board : अखेर बांगलादेश नरमला; बांग्लादेश क्रिकेट बोर्डाकडून भारताला आमंत्रण

बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) (Bangladesh Cricket Board) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसी) पत्र लिहून कळवले आहे की,

IPL 2026 Sunil Gavaskar : सुनील गावस्करांची अनफिट क्रिकेटपटूंवर टीका

मुंबई : भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी पुन्

IPL 2026 : गुवाहाटीवर पावसाचे सावट! MI vs RR थरार रंगणार की सामना होणार रद्द?

IPL 2026: मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स आज आमनेसामने; विजयासाठी दोन्ही संघ सज्ज

मुंबई : आयपीएल 2026 मधील आजचा सामना क्रिकेटप्रेमींसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स

Umpire Killed Over Run-Out Argument : विशाखापट्टणम हादरलं! रनआऊट दिलं म्हणून थेट अंपायरचीच केली हत्या

विशाखापट्टणम येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने क्रीडा क्षेत्र हादरले आहे. स्थानिक स्तरावर सुरू असलेल्या