वसई - विरारमध्ये ८० हजार दुबार मतदार?

मतदारयादीत सुधारणा करण्याची बविआची मागणी


वसई : वसई - विरार महानगरपालिकेने प्रसिद्ध केलेल्या मतदार याद्यांमध्ये ५२ हजार दुबार मतदार असल्याचे समोर आले. त्यामुळे पालिकेने अशा मतदारांकडून मतदान कुठे करणार? याबाबतचे हमीपत्र लिहून घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र दुबार मतदारांची ही संख्या मोठी असून ती ८० हजारांच्या घरात असल्याचा दावा बहुजन विकास आघाडीने केला आहे. यासह एका प्रभागातील मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागात टाकण्यात आली आहेत. त्यामुळे या सर्वांची नावे पूर्ववत करावी आणि दुबार मतदार वगळावे अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे.


वसई - विरार महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग रचना पार पडली. महापालिका क्षेत्रात २९ प्रभाग असून चार स्तरीय प्रभाग रचनेनुसार चार सदस्य निवडून द्यावयाचे आहेत. प्रभाग रचना पार पडल्यानंतर आरक्षण सोडत प्रक्रिया पालिकेने पूर्ण केली.त्यानंतर मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. यासाठी बुधवारपर्यंतची मुदत हरकती आणि सूचना नोंदविण्यासाठी देण्यात आली होती. १ जुलै २०२५ पर्यंतच्या गृहीत धरलेल्या विधानसभा मतदार यादीनुसार पालिका हद्दीत ११ लाख २७ हजार ६४० मतदारांची नोंद आहे. यामध्ये ५२ हजार ३७८ मतदारांची नावे ही दुबार असल्याची माहिती निवडणूक आयोगाकडून मिळाली होती. त्यानंतर पालिकेने दुबार असलेल्या मतदारांकडून मतदान कुठे करणार? याबाबतचे हमीपत्र लिहून घेणार असल्याचे सांगत प्रक्रिया सुरु केली आहे.


मात्र दुसरीकडे हरकती आणि सूचना नोंदविण्याच्या शेवटच्या दिवशी बहुजन विकास आघाडीने महापालिका हद्दीत ८० हजार दुबार मतदार असल्याचा दावा केला आहे. तसेच एका प्रभागातील मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागात टाकण्यात आल्याचे देखील त्यांना निदर्शनास आले आहे. यासह अनेक मतदारांची नावे सारखीच आहेत, फोटो एका मतदाराचा दुसऱ्या मतदाराला एक सारखाच देण्यात आला आहे तर काही ठिकाणी फोटोच नसल्याचे देखील आढळून आल्याचा दावा बविआने केला असून याबाबत त्यांनी महापालिकेला लेखी निवेदन दिले आहे. तसेच या दुबार मतदारांची नावे वगळण्याची मागणी केली आहे.


शोध मोहीम सुरू : वसई-विरार महापालिका हद्दीत मतदारांपैकी ५२ हजार दुबार मतदारांची नावे आयोगाने दिली होती. तसेच आता बविआने देखील ८० हजार मतदार दुबार असल्याचा दावा केला आहे. यासाठी आता नऊ प्रभागात नऊ पथके नेमण्यात आली आहेत. त्यांच्यामार्फत ५२ हजारांहून अधिक असलेल्या दुबार मतदारांची पडताळणी करण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्याकडून हमीपत्र लिहून घेतली जाणार आहेत. दुबार मतदारांबाबत आयोगाने जो कार्यक्रम ठरवून दिला आहे त्यानुसार आमचे कामकाज सुरु असल्याचे पालिका उपायुक्त स्वाती देशपांडे
यांनी सांगितले.


मतदार याद्यांवर ८ हजार हरकती - सूचना


वसई - विरार महानगरपालिकेने मतदार याद्या प्रसिद्ध केल्यानंतर ३ डिसेंबर पर्यंत हरकती आणि सूचना नोंदविण्याची मुदत दिली होती. मंगळवार सायंकाळी उशिरापर्यंत पालिकेकडे ८ हजार ४१६ हरकती आणि सूचना मतदार याद्यांवर नोंदविण्यात आल्या होत्या. बुधवारी सुद्धा हरकती स्वीकारण्यात आल्या आहेत.


Comments
Add Comment

नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेला इन्क्यूबेशन सेंटर म्हणून मान्यता

मुंबई: विदर्भातील नवउद्योग (स्टार्टअप) परिसंस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत,

नमो शेतकरी महासन्मान निधीचा ८ वा हप्ता पुढील आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार; कृषीमंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई: राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला असून, नमो

‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक’ विधानपरिषदेत मंजूर

मुंबई: महाराष्ट्रात गेल्या काही काळापासून चर्चेत असलेले आणि अत्यंत कडक तरतुदी असलेले ‘महाराष्ट्र

सिंधुदुर्गच्या विकासाला बुस्टर; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत १०० टक्के 'व्हिजीएफ'ला मंजुरी

मुंबई: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला आणि अर्थव्यवस्थेला मोठी गती देणारा निर्णय मंगळवारी राज्य

नंदूरबार,छत्रपती संभाजीनगरमधील गैरव्यवहारासाठी 'एसआयटी स्थापन; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधान परिषदेत घोषणा

​मुंबई: नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर येथील भूसंपादन गैरव्यवहार आणि छत्रपती संभाजीनगरमधील ब्रिजवाडी येथील ५४

मुंबईचा पश्चिम आणि पूर्व द्रुतगती महामार्ग पावसाळ्यापूर्वी समतल करा; उपमहापौरांची आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी

मुंबई: मुंबई महानगरातील रस्त्यांची स्थिती अधिक सुधारण्यासाठी पश्चिम व पूर्व द्रुतगती महामार्ग तसेच प्रमुख