विराटचा दोन डावातील सलग ११ शतकांचा विक्रम

मुंबई  :  विराट कोहलीने त्याचे ५३वे एकदिवसीय शतक झळकावले आहे. रायपूरमध्ये सुरू असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने ही कामगिरी केली. हे विराटचे ८४वे आंतरराष्ट्रीय शतक आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने ९९ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. कोहलीने सलग तिसऱ्या सामन्यात ५० किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत आणि हे त्याचे सलग दुसरे शतक आहे.विराट कोहली हा जगातील पहिला क्रिकेटपटू आहे ज्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये दोन डावांमध्ये सलग ११ वेळा शतके झळकावली आहेत.


सलग एकदिवसीय सामन्यांमध्ये शतके ठोकण्याच्या यादीत विराटनंतर एबी डिव्हिलियर्सचा क्रमांक लागतो, ज्याने असे सहा वेळा केले आहे. कोहलीने सचिन तेंडुलकरचा एकाच स्थानावर खेळून सर्वाधिक एकदिवसीय शतकांचा
विश्वविक्रमही मोडला.


रांचीतील मालिकेच्या पहिल्या सामन्यातील १३५ धावांच्या अप्रतिम इनिंगनंतर हे सलग दुसरे शतक आहे. शतक पूर्ण होताच कोहलीने हेल्मेट काढून आकाशाकडे हात उंचावले. केएल राहुल धावत येऊन त्याला मिठी मारण्यासाठी तर उत्साही होता. ‘कोहली, कोहली’च्या घोषणांनी मैदान दणाणून गेले होते.


या शतकासह कोहलीने आता चार वेगवेगळ्या संघांविरुद्ध सात किंवा त्यापेक्षा जास्त शतके झळकावली आहेत. श्रीलंका (१०), वेस्ट इंडीज (९), ऑस्ट्रेलिया (८) आणि दक्षिण आफ्रिका (७). असा पराक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. एक दिवस आधीच कोहलीने विजय हजारे ट्रॉफी खेळण्यासाठी उपलब्ध असल्याचे जाहीर केले. त्याआधी ऋतुराज गायकवाडनेही शानदार १०५ धावा ठोकल्या होत्या.

Comments
Add Comment

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत

U19 Asia Cup Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रेसह प्रशिक्षकांवरही कारवाई होणार; पाकविरुद्ध फायनलमध्ये दारुण पराभव होताच BCCI अ‍ॅक्शन मोडवर!

मुंबई : पाकिस्तानविरुद्ध अंडर-१९ आशिया कपच्या अंतिम सामन्यात झालेल्या दारुण पराभवानंतर भारतीय क्रिकेट नियामक