धक्कादायक! सौंदर्याच्या ईर्ष्येतून तरुणीने केली चार लहानग्यांची हत्या, विकृत मानसिकतेमुळे पोटच्या मुलीचाही केला नाही विचार

पानीपत: हरियाणातून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.या प्रकरणात एका महिलेने केलेली कृती ऐकताच जगात किती प्रमाणात क्रुरता वाढली आहे याची जाणीव होते. आपल्या सौंदर्याबद्दलची टोकाची ईर्ष्या आणि असुरक्षितता यातून हरियाणातील एका महिलेने गेल्या दोन वर्षांत तब्बल चार निष्पाप मुलांची हत्या केली आहे. महिलेच्या या मानसिकतेने क्रूरतेच्या सर्व सीमा ओलांडल्याचे दिसून येते.



हरियाणातील पानीपत शहराचे एसपी भूपेंद्र सिंग यांनी या प्रकरणाची माहिती देताना सांगितले की, आरोपी महिलेची विचारसरणी 'Psycho killer' प्रकारची आहे. या महिलेला सुंदर दिसणाऱ्या लहान मुलींचा तिरस्कार होता आणि भविष्यात कोणतीही मुलगी आपल्यापेक्षा अधिक सुंदर दिसू नये, या भीतीने तिने ही टोकाची भूमिका घेत चार निष्पाप मुलांचा बळी घेतला आहे. या महिलेला पोलिसांनी अटक केली असून तिचा खोल तपास सुरू आहे.


अटक करण्यात आलेल्या पूनम नावाच्या या महिलेने सुरुवातीला आपल्या नातेवाईकांमधील आणि कुटुंबातील सुंदर दिसणाऱ्या मुलींना लक्ष्य केले. २०२३ मध्ये तिने आपल्या नणंदेच्या मुलीची आणि भाच्याची हत्या केली होती. वारंवार होणाऱ्या या घटनांमुळे कोणालाही संशय येऊ नये म्हणून, तिने नंतर स्वतःच्या एका लहान मुलालाही मारून टाकले. तिच्या मनात सौंदर्याच्या व्याख्येबाबत एवढी ईर्ष्या होती की, तिने पोटच्या मुलीचा जीव घ्यायला ही विचार केला नाही.




पाणीपतच्या सिवाह गावामध्ये ऑगस्ट २०२५ मध्ये पूनमने चौथ्या मुलाचा बळी घेतला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असताना, ६ वर्षांच्या मुलीचा पाण्याच्या टबमध्ये बुडून मृत्यू होणे ही गोष्ट पोलिसांना संशयास्पद वाटली. दुसरे म्हणजे, ज्या खोलीत मुलीचा मृत्यू झाला, त्या खोलीचा दरवाजा बाहेरून बंद होता. यावरून स्पष्ट झाले की, त्या मुलीची हत्या करण्यात आली आहे. दरम्यान पोलिसांच्या सखोल तपासात पूनमच्या हालचालींवरून तिच्यावरचा संशय दाट होत गेल्याने ती स्वत:च पोलिसांच्या जाळ्यात अडकली.


पूनमने चौकशी दरम्यान पोलिसांना सांगितले की, तिची विचारसरणी अत्यंत विकृत आहे. आपण पकडले जाऊ नये किंवा आपल्यावर कोणाला संशय येऊ नये, यासाठी तिने आपल्या दोन मुलांपैकी एकाची हत्या केल्याचे तिने चौकशीमध्ये उघड केले. अशाप्रकारे गेल्या दोन वर्षांत, सोनीपतच्या भावड गावची रहिवासी असलेल्या पूनमने एकूण ४ लहान मुलांची हत्या केल्याचे समोर आल्याने समाजात एकच खळबळ उडाली आहे.

Comments
Add Comment

Threat Mail : मोठी बातमी! राजधानी दिल्लीत खळबळ, संसद भवनासह ९ शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; एक मेल आला अन् थेट...

नवी दिल्ली :  देशाच्या संसदेसह राजधानीतील नऊ नामांकित शाळांना बॉम्बस्फोटाने उडवून देण्याचा धमकीचा ईमेल आल्याने

जम्मू आणि हिमाचलमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टीची शक्यता, हवामान खात्याने 'या' राज्यांना दिला इशारा

दिल्ली: हवामान खात्याने जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात हलका पाऊस आणि हिमवृष्टीचा इशारा दिला आहे. आयएमडीने

'देशातील नक्षलवादाचा ३१ मार्चपर्यंत समूळ नायनाट करणार'

रायपूर  : केंद्र सरकारच्या सुरक्षा-केंद्रित रणनीतीमुळे आणि पायाभूत सुविधांच्या विकासामुळे डाव्या

महाराष्ट्रात लवकरच मतदारयाद्यांची सखोल तपासणी

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने सध्या पाच राज्यांतील मतदारयाद्यांची सखोल तपासणीवर (एसआयआर) लक्ष केंद्रित

अमेरिकेसोबतच्या व्यापार करारामुळे भारतीय कृषी उत्पादनांना तोटा नाही : शिवराज सिंह

भोपाळ : अमेरिकेसोबतच्या व्यापार करारामुळे भारतीय कृषी उत्पादनांना नुकसान होणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय कृषी

मंकी फिव्हरवर स्वदेशी लस विकसित, महाराष्ट्रातील दुर्गम भागातील नागरिकांना दिलासा

नवी दिल्ली : महाराष्ट्र,कर्नाटक आणि गोवा यांसह संपूर्ण पश्चिम घाट पट्ट्यात दरवर्षी दहशतीचे वातावरण निर्माण