छत्तीसगडच्या बस्तर भागात जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक! १५ नक्षलवादी ठार तर ३ जवान शहीद

छत्तीसगड: छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त बस्तर विभागातील बीजापूर-दंतेवाडा सीमेवर भारतीय सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली. काल (३ डिसेंबर) सकाळपासून सुरू असलेल्या या चकमकीत आतापर्यंत १५ नक्षलवादी ठार झाले आहेत. महत्वाचे म्हणजे नक्षली कमांडर मंगूस यालाही ठार करण्यात आले आहे. मात्र दुर्दैवाने, सुरक्षा दलाचे ३ जवान शहीद झाले आहेत. तर २ जवान जखमी झाले आहेत. ही चकमक अद्याप सुरू असून, सुरक्षा दल मोठ्या शौर्याने नक्षलवाद्यांसोबत सामना करत आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, बीजापूर आणि दंतेवाडा सीमेवर नक्षलवाद्यांचे मोठे गट असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर बीजापूर पोलिसांचे जिल्हा राखीव रक्षक, विशेष कार्य दल आणि कोब्रा बटालियनच्या जवानांनी संयुक्त अभियान सुरू केले. केशकुतुलच्या जंगलात या सुरक्षा दलांची नक्षलवाद्यांशी गाठ पडली. त्यानंतर चकमक सुरू झाली. काल सकाळपासून या भागात थोड्याफार फरकाच्या वेळाने गोळीबार सुरू आहे.


या चकमकीमध्ये मारले गेलेल्या नक्षलवाद्यांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कारण जवानांनी नक्षलवाद्यांच्या मोठ्या गटाला घेरले आहे. जवान हा घेरा तोडून आत घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. संपूर्ण बस्तर विभागात नक्षलवाद्यांविरोधात सातत्याने मोहीम सुरू आहे, ज्याचा उद्देश मार्च २०२६ पर्यंत नक्षलवाद्यांचा सुपडा साफ करणे आहे. ही चकमक पूर्ण झाल्यावर या घटनेबाबत अंतिम माहिती जाहीर केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.


नक्षलवाद्यांच्या मृतदेहांसह, चकमकीच्या ठिकाणाहून ३०३ आणि ३५० मिमी एसएलआर रायफल जप्त करण्यात आल्या आहेत. या चकमकीत जिल्हा राखीव रक्षक दलाचे मुख्य कॉन्स्टेबल मोनू वड्डी आणि कॉन्स्टेबल दुकारू गोंडे शहीद झाले आहेत. तर कॉन्स्टेबल सोमदेव यादव जखमी झाले आहेत.

Comments
Add Comment

Supreme Court : शांततापूर्ण निदर्शने हा संविधानाने दिलेला अधिकार; सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी

नवी दिल्ली : नीट परीक्षा प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून देशभर तीव्र आंदोलन पुकारण्यात आले होते. 'कॉकरोच

Odessa Port Attack : ओडेसा बंदरातील हल्ल्यानंतर भारत सतर्क; परराष्ट्र मंत्रालयाने युक्रेनच्या राजदूताला बोलावले

नवी दिल्ली : काळ्या समुद्र (ब्लॅक सी) परिसरातील भारतीय खलाशांच्या सुरक्षेबाबत भारताने मोठे राजनैतिक पाऊल उचलले

Online Share Trading Fraud : ऑनलाईन शेअर ट्रेडिंग फसवणूक : प्रमुख बँकांना सुप्रीम कोर्टाची नोटीस

सर्वोच्च न्यायालयामुळे लाखो गुंतवणूकदारांच्या आशा पल्लवित नवी दिल्ली : ऑनलाईन शेअर ट्रेडिंग आणि डिजिटल

Rashtriya Krishi Vikas Yojana : राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या दुसऱ्या हप्त्यासाठी पात्र ठरणारे महाराष्ट्र पहिले राज्य

नवी दिल्ली : ठरवून दिलेल्या वेळेत राष्ट्रीय कृषी विकास योजना निधीचा एकूण 75 टक्क्यांपेक्षा जास्त प्रभावी वापर

IndiGo Flight : धुराच्या इशाऱ्यानंतर दुबईहून मुंबईकडे येणाऱ्या इंडिगो विमानाचे राजकोटमध्ये सुरक्षित लँडिंग

गांधीनगर : दुबईहून मुंबईकडे येत असलेल्या इंडिगोच्या विमानाचे आज अचानक आपत्कालीन लँडिंग करावे लागले. विमानाच्या

Indian Railways Facts : ट्रेनच्या शेवटच्या डब्यावर 'X' चे चिन्ह का असते ? हे चिन्ह नसेल, तर रेल्वे कंट्रोल रूममध्ये का उडते धांदल ? पाहा रेल्वे सुरक्षेचे मोठे रहस्य!

रेल्वे प्रवास करताना बहुतांश प्रवाशांचे मुख्य ध्येय एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सुखरूप पोहोचणे हेच असते. जर