Indian Railway Rules: रेल्वे तिकीट आठ दिवसांपूर्वी रद्द केल्यावर रिफंड...; रेल्वेच्या नियमांत महत्त्वाचा बदल

नवी दिल्ली: केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवारी रेल्वे तिकीट प्रणाली आणि प्रवाशांच्या सुविधासंबंधित मोठी घोषणा केली आहे. त्यांनी सांगितलं की, यापुढे ट्रेन सुटण्याच्या ८ तासांपूर्वीपर्यंत तिकीट रद्द केल्यानंतर कोणताही रिफंड मिळणार नाही. हा नवीन नियम १ ते १५ एप्रिल २०२६ दरम्यान लागू होईल.


याशिवाय दुसऱ्या रिफंड स्लॅबमध्येही बदल करण्यात आला आहे. आता २४ ते ८ तासांदरम्यान तिकीट रद्द केल्यास तिकीटाची रक्कम ५० टक्क्यांपर्यंत कापली जाईल. यापूर्वी हा कालावधी १२ ते ४ तासांपर्यंत होता. तर ट्रेन सुटण्याच्या ७२ ते २४ तासांपूर्वी तिकीट रद्द केल्यास तिकीटातील २५ टक्के रक्कम कापली जाईल. तर ७२ तासांपूर्वी तिकीट रद्द केल्यास संपूर्ण रक्कम परत दिली जाईल. यादरम्यान रेल्वे प्रवाशांकडून केवळ फ्लॅट चार्ज घेण्यात येईल.


रेल्वे मंत्र्‍यांनी सांगितलं की, नवीन रिफंड नियम ब्लॅक मार्केटिंग आणि एजंटद्वारा शेवटच्या टप्प्यात तिकीट बुकिंग रोखण्यासाठी लागू करण्यात आला आहे. जानेवारी २०२६ पासून सुरू झालेली वंदे भारत स्लीपर आणि अमृत भारत II ट्रेनसाठी हा नियम आधीपासून लागू आहे. त्यांनी काऊंटर तिकीट खरेदीदारांसाठी क्लास अपग्रेडची सुविधादेखील वाढवली आहे. आता ट्रेन रवाना होण्याच्या ३० मिनिटांपर्यंत प्रवासी आपल्या प्रवासाचा क्लास अपग्रेड करू शकतात.

Comments
Add Comment

Baruipur Murder Case : गुप्तांगांवर जखमा, डोक्यावर प्रहार अन् १२ वर्षीय मुलीवर पाशवी बलात्कार; पश्चिम बंगाल हादरले!

पश्चिम बंगालमधील दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील बारुईपूर येथे एका १२ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार

Cloudburst : ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यास काय करावे? जाणून घ्या आपत्कालीन व्यवस्थापन आणि सुरक्षेचे उपाय

Cloudburst : सध्या राज्यात पावसाचा वेग वाढला आहे. नाशिकमध्ये तर ढगसदृश्य पाऊस सांगितला आहे. अशावेळेस नागरिकांनी घाबरून

Indian Navy : भारतीय नौदलाची ताकद वाढणार; 'आयएनएस महेंद्रगिरी' आणि 'आयएनएस मालवण' लवकरच ताफ्यात येणार

नवी दिल्ली : भारतीय नौदलाची सागरी ताकद आणखी वाढणार असून लवकरच ‘आयएनएस महेंद्रगिरी’ आणि ‘आयएनएस मालवण’ या दोन

Indian Navy : भारतीय नौदलाच्या युद्धनौकांच्या सिंगापूर भेटीची यशस्वी सांगता

नवी दिल्ली : भारत आणि सिंगापूर यांच्यातील दृढ सामरिक आणि सागरी भागीदारी अधिक मजबूत करत भारतीय नौदलाच्या पूर्व

Mumbai Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती; विक्रोळी येथे बोअरिंगचे काम सुरू

मुंबई (Mumbai): मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे (बुलेट ट्रेन) प्रकल्पासाठी, पहिल्या टनेल बोरिंग मशीनने (TBM) आज विक्रोळी

VB-G-RAM-G च्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारकडून राज्यांना २५ हजार ८६३ कोटी रुपयांचा पहिला हप्ता वितरित

नवी दिल्ली : केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी रविवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे राज्यांच्या