हॉलतिकीट नाही म्हणून परीक्षा नाही, विद्यार्थी गेले थेट पोलीस ठाण्यात ; धक्कादायक परीक्षा व्यवस्थापन

छत्रपती संभाजीनगर : मास्टर ऑफ कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशनच्या (एमसीए) विद्यार्थ्यांना हॉलिकीट मिळाले नाही. यामुळे हे विद्यार्थी परीक्षेला बसू शकले नाही. अखेर संतापलेल्या विद्यार्थ्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा घेण्यात येत आहे. गुरुवारी एमसीए अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्राची परीक्षा होती. मात्र, श्री साई इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी दिले जाणारे हॉलतिकीट मिळालेच नाही.


नेमके काय घडले?


विद्यार्थी परीक्षा सुरू होण्यापूर्वीच हॉलतिकीटसाठी महाविद्यालयात पोहोचले. परंतु, महाविद्यालय प्रशासनाकडून टाळाटाळ करण्यात आली, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. योग्य स्पष्टीकरण न मिळाल्याने विद्यार्थी संतप्त झाले आणि एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली. पोलिस ठाण्यासमोर विद्यार्थ्यांनी ठिय्या धरल्यानंतर ही स्थिती आणखी गंभीर बनली.


हॉलतिकीट नसल्याने शंभरहून अधिक विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता आले नाही. यानंतर पोलिसांनी विद्यापीठाशी संपर्क साधला. विद्यार्थीही विद्यापीठात पोहोचले. तेव्हा उघड झाले की संबंधित महाविद्यालयाला विद्यापीठाचे संलग्नीकरणच नसल्याने विद्यार्थ्यांची फसवणूक झाली.

Comments
Add Comment

TET exam : टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक

टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक बुरखा, दुपट्टा किंवा ओढणीला बंदी नाही- राज्य परीक्षा

Vilas Ghule : विलास घुले हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडेंचा सवाल; निष्पक्ष तपासाची मागणी

बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील केज तालुक्यातील विलास घुले (Vilas Ghule) हत्या प्रकरणावरून (Murder) माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे

Monsoon Update : जून महिन्यात पाऊस पडणार नाही ; या तारखेपासून कोसळणार मुसळधार पाऊस

महाराष्ट्र : महाराष्ट्रामध्ये काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. २३ आणि २५ जूनला मुंबईसह इतर शहरात मुसळधार

Ketan Agarwal Murder Case: "म्हणून मी त्याला लोहगडावरून खाली ढकललं..." सियाने पोलिसांसमोर सर्वचं सांगितलं

केतनच्या हत्येमागचं सर्वात भयंकर कारण आलं समोर Ketan Agarwal Murder Case : पुणे : पुण्यातील उद्योगपती केतन अग्रवाल (Ketan Agarwal Murder)

आषाढी वारीसाठी रेल्वेची खास भेट; पंढरपूरसाठी धावणार विशेष गाड्या, जाणून घ्या वेळापत्रक

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेने विशेष गाड्यांची घोषणा केली

Maharashtra Infrastructure : मुंबई आणि नागपूरसाठी मोठा निर्णय; दोन महत्त्वाच्या वाहतूक प्रकल्पांना राज्य सरकारची मंजुरी

राज्यातील वाहतूक व्यवस्था अधिक वेगवान आणि सुलभ करण्यासाठी राज्य सरकारने दोन महत्त्वाच्या पायाभूत सुविधा