हॉलतिकीट नाही म्हणून परीक्षा नाही, विद्यार्थी गेले थेट पोलीस ठाण्यात ; धक्कादायक परीक्षा व्यवस्थापन

छत्रपती संभाजीनगर : मास्टर ऑफ कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशनच्या (एमसीए) विद्यार्थ्यांना हॉलिकीट मिळाले नाही. यामुळे हे विद्यार्थी परीक्षेला बसू शकले नाही. अखेर संतापलेल्या विद्यार्थ्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा घेण्यात येत आहे. गुरुवारी एमसीए अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्राची परीक्षा होती. मात्र, श्री साई इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी दिले जाणारे हॉलतिकीट मिळालेच नाही.


नेमके काय घडले?


विद्यार्थी परीक्षा सुरू होण्यापूर्वीच हॉलतिकीटसाठी महाविद्यालयात पोहोचले. परंतु, महाविद्यालय प्रशासनाकडून टाळाटाळ करण्यात आली, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. योग्य स्पष्टीकरण न मिळाल्याने विद्यार्थी संतप्त झाले आणि एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली. पोलिस ठाण्यासमोर विद्यार्थ्यांनी ठिय्या धरल्यानंतर ही स्थिती आणखी गंभीर बनली.


हॉलतिकीट नसल्याने शंभरहून अधिक विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता आले नाही. यानंतर पोलिसांनी विद्यापीठाशी संपर्क साधला. विद्यार्थीही विद्यापीठात पोहोचले. तेव्हा उघड झाले की संबंधित महाविद्यालयाला विद्यापीठाचे संलग्नीकरणच नसल्याने विद्यार्थ्यांची फसवणूक झाली.

Comments
Add Comment

नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेला इन्क्यूबेशन सेंटर म्हणून मान्यता

मुंबई: विदर्भातील नवउद्योग (स्टार्टअप) परिसंस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत,

नमो शेतकरी महासन्मान निधीचा ८ वा हप्ता पुढील आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार; कृषीमंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई: राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला असून, नमो

‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक’ विधानपरिषदेत मंजूर

मुंबई: महाराष्ट्रात गेल्या काही काळापासून चर्चेत असलेले आणि अत्यंत कडक तरतुदी असलेले ‘महाराष्ट्र

सिंधुदुर्गच्या विकासाला बुस्टर; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत १०० टक्के 'व्हिजीएफ'ला मंजुरी

मुंबई: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला आणि अर्थव्यवस्थेला मोठी गती देणारा निर्णय मंगळवारी राज्य

नंदूरबार,छत्रपती संभाजीनगरमधील गैरव्यवहारासाठी 'एसआयटी स्थापन; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधान परिषदेत घोषणा

​मुंबई: नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर येथील भूसंपादन गैरव्यवहार आणि छत्रपती संभाजीनगरमधील ब्रिजवाडी येथील ५४

रब्बी हंगामातील 'ई-पीक पाहणी'ला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

- ४५ टक्के शेतकरी अजूनही प्रक्रियेबाहेर; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा मुंबई : राज्यातील रब्बी