हॉलतिकीट नाही म्हणून परीक्षा नाही, विद्यार्थी गेले थेट पोलीस ठाण्यात ; धक्कादायक परीक्षा व्यवस्थापन

छत्रपती संभाजीनगर : मास्टर ऑफ कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशनच्या (एमसीए) विद्यार्थ्यांना हॉलिकीट मिळाले नाही. यामुळे हे विद्यार्थी परीक्षेला बसू शकले नाही. अखेर संतापलेल्या विद्यार्थ्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा घेण्यात येत आहे. गुरुवारी एमसीए अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्राची परीक्षा होती. मात्र, श्री साई इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी दिले जाणारे हॉलतिकीट मिळालेच नाही.


नेमके काय घडले?


विद्यार्थी परीक्षा सुरू होण्यापूर्वीच हॉलतिकीटसाठी महाविद्यालयात पोहोचले. परंतु, महाविद्यालय प्रशासनाकडून टाळाटाळ करण्यात आली, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. योग्य स्पष्टीकरण न मिळाल्याने विद्यार्थी संतप्त झाले आणि एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली. पोलिस ठाण्यासमोर विद्यार्थ्यांनी ठिय्या धरल्यानंतर ही स्थिती आणखी गंभीर बनली.


हॉलतिकीट नसल्याने शंभरहून अधिक विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता आले नाही. यानंतर पोलिसांनी विद्यापीठाशी संपर्क साधला. विद्यार्थीही विद्यापीठात पोहोचले. तेव्हा उघड झाले की संबंधित महाविद्यालयाला विद्यापीठाचे संलग्नीकरणच नसल्याने विद्यार्थ्यांची फसवणूक झाली.

Comments
Add Comment

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला

मुंबई: राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या घामाने आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या सुमारे ८६ हजार