रेल्वेचा नवीन नियम लागू; आता खिडकीवर तिकीट खरेदी करताना सुद्धा लागणार 'ओटीपी'

मुंबई: रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. भारतीय रेल्वेने तात्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये एक मोठा आणि पारदर्शक बदल केला आहे. आतापर्यंत तात्काळ तिकीटचा ओटीपी आधारित नियम केवळ ऑनलाइन तिकीटांसाठी लागू होता. मात्र आतापासून आरक्षण खिडकीवर सुद्धा तात्काळ तिकिटांसाठी ओटीपी नियम लागू होणार आहे. यामुळे तात्काळ तिकीट प्रणाली अधिक पारदर्शक आणि सुरक्षित होण्यास मदत होणार आहे.


रेल्वे प्रशासनाने केलेल्या या नियमामुळे, आता कोणताही प्रवासी खिडकीवरून तात्काळ तिकीट बुक करेल तेव्हा, तिकीट फॉर्ममध्ये दिलेल्या त्याच्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी पाठवला जाईल. यामुळे तिकीट निश्चित होण्यासाठी, प्रवाशाला खिडकीवर हा योग्य ओटीपी सांगाणे अनिवार्य राहणार आहे. रेल्वे प्रशासनाच्या या महत्त्वाच्या पावलामुळे गरजू प्रवाशांना तिकीट मिळणे अधिक सोपे होईल आणि गैरप्रकारांना आळा बसेल.




रेल्वे मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या नवीन व्यवस्थेची चाचणी १७ नोव्हेंबर २०२५ पासून सुरू करण्यात आली होती. सध्या ही प्रणाली ५२ ट्रेन्समध्ये लागू झाली असून आता ती पूर्णपणे लागू करण्याची तयारी रेल्वेने केली आहे. अशाप्रकारे तात्काळ तिकीट प्रणालीमध्ये रेल्वेने एका रात्रीत हा बदल केलेला नसून हे नियम अनेक टप्प्यांमध्ये लागू करण्यात आले आहेत.


जुलै २०२५ मध्ये ऑनलाइन तात्काळ तिकिटांसाठी आधार आधारित पडताळणी सुरू करण्यात आली होती. तर ऑक्टोबर २०२५ मध्ये ऑनलाइन सामान्य तिकिटांसाठी पहिल्या दिवशीच्या बुकिंगवर ओटीपी प्रणाली लागू करण्यात आली होती. यानंतर २८ ऑक्टोबर २०२५ पासून आयआरसीटीसीच्या माध्यमातून सकाळी ८ ते १० या वेळेत तिकीटांसाठी आधार प्रमाणीकरण अनिवार्य करण्यात आले. आयआरसीटीसीनुसार, तिकीटांची मागणी सर्वाधिक असते त्याच वेळेत म्हणजे सकाळी ८ ते १० या वेळेत हा नियम लागू राहील. याचा अर्थ सकाळीच्या वेळेत आधार पडताळणी झालेले वापरकर्ते तिकीट खरेदी करू शकतील.



Comments
Add Comment

Andhra Pradesh Train Accident : आंध्र प्रदेशात रेल्वे अपघात! नेल्लोरमध्ये मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले; रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता

नेल्लोर : आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातून रेल्वे अपघाताची एक मोठी बातमी समोर येत आहे. येथे एका धावत्या

Street Dogs: भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांवर सर्वोच्च न्यायालयाचा कडक निर्णय, खाऊ घालणाऱ्यांनाही जबाबदार ठरवणार

नवी दिल्ली: देशभरात रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचे हल्ल्याचे प्रकरण वाढताना दिसत आहेत यावर सर्वोच्च

Bhopal News: कारमध्ये अडकलेला दीड वर्षांचा चिमुकला,अन् आई वडील शॅापिंगला गेले,पुढे असं घडलं...

भोपाळ :मध्य प्रदेशातील छिंदवाडा शहरात संध्याकाळच्या सुमारास पाया खालची जमीन हलवणारी घटना घडली. पालकांच्या

Crime News: रात्री हलवा खाल्ला अन् सकाळी उठलेच नाही..तिघांचा मृत्यु,घडली विचीत्र घटना..!

चंदीगड : हरियाणातील फरिदाबादच्या सरूरपूर भागात एक भयंकर व पाय खालची जमीन हलवणारी घटना घडली आहे. एका कुटुंबातील

Madhya Pradesh News : मुस्लिम मुलीच्या पायावर पाय पडला अन्....मध्य प्रदेशात मारहाण, लाठीमार आणि महामार्गावर चक्काजाम

खरगोन : मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात एका मुस्लिम मुलीच्या पायावर पाय पडण्यावरून झालेल्या वादाचे रूपांतर

Sabarimala Temple : सबरीमाला मंदिरात तूप विक्रीत लाखो रुपयांचा महाघोटाळा! केरळ उच्च न्यायालयाचे कठोर पाऊल; एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश

तिरुअनंतपुरम : केरळमधील जगप्रसिद्ध सबरीमाला मंदिरात सोन्याच्या दरोड्यानंतर आता 'तूप घोटाळा' समोर आल्याने खळबळ