रेल्वेचा नवीन नियम लागू; आता खिडकीवर तिकीट खरेदी करताना सुद्धा लागणार 'ओटीपी'

मुंबई: रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. भारतीय रेल्वेने तात्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये एक मोठा आणि पारदर्शक बदल केला आहे. आतापर्यंत तात्काळ तिकीटचा ओटीपी आधारित नियम केवळ ऑनलाइन तिकीटांसाठी लागू होता. मात्र आतापासून आरक्षण खिडकीवर सुद्धा तात्काळ तिकिटांसाठी ओटीपी नियम लागू होणार आहे. यामुळे तात्काळ तिकीट प्रणाली अधिक पारदर्शक आणि सुरक्षित होण्यास मदत होणार आहे.


रेल्वे प्रशासनाने केलेल्या या नियमामुळे, आता कोणताही प्रवासी खिडकीवरून तात्काळ तिकीट बुक करेल तेव्हा, तिकीट फॉर्ममध्ये दिलेल्या त्याच्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी पाठवला जाईल. यामुळे तिकीट निश्चित होण्यासाठी, प्रवाशाला खिडकीवर हा योग्य ओटीपी सांगाणे अनिवार्य राहणार आहे. रेल्वे प्रशासनाच्या या महत्त्वाच्या पावलामुळे गरजू प्रवाशांना तिकीट मिळणे अधिक सोपे होईल आणि गैरप्रकारांना आळा बसेल.




रेल्वे मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या नवीन व्यवस्थेची चाचणी १७ नोव्हेंबर २०२५ पासून सुरू करण्यात आली होती. सध्या ही प्रणाली ५२ ट्रेन्समध्ये लागू झाली असून आता ती पूर्णपणे लागू करण्याची तयारी रेल्वेने केली आहे. अशाप्रकारे तात्काळ तिकीट प्रणालीमध्ये रेल्वेने एका रात्रीत हा बदल केलेला नसून हे नियम अनेक टप्प्यांमध्ये लागू करण्यात आले आहेत.


जुलै २०२५ मध्ये ऑनलाइन तात्काळ तिकिटांसाठी आधार आधारित पडताळणी सुरू करण्यात आली होती. तर ऑक्टोबर २०२५ मध्ये ऑनलाइन सामान्य तिकिटांसाठी पहिल्या दिवशीच्या बुकिंगवर ओटीपी प्रणाली लागू करण्यात आली होती. यानंतर २८ ऑक्टोबर २०२५ पासून आयआरसीटीसीच्या माध्यमातून सकाळी ८ ते १० या वेळेत तिकीटांसाठी आधार प्रमाणीकरण अनिवार्य करण्यात आले. आयआरसीटीसीनुसार, तिकीटांची मागणी सर्वाधिक असते त्याच वेळेत म्हणजे सकाळी ८ ते १० या वेळेत हा नियम लागू राहील. याचा अर्थ सकाळीच्या वेळेत आधार पडताळणी झालेले वापरकर्ते तिकीट खरेदी करू शकतील.



Comments
Add Comment

भारताचे अंतराळवीर चंद्रावर जाणार

मुंबई : आर्यभट्ट या पहिल्या भारतीय उपग्रहाच्या प्रक्षेपणापासून ते चांद्रयान ३ मोहीमेपर्यंत भारताने उपग्रह,

दोन नव्या विमान कंपन्यांना केंद्र सरकारची मंजुरी

‘इंडिगो’च्या एकाधिकारशाहीला ब्रेक नवी दिल्ली : जेव्हा देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोची व्यवस्था

मुंबईत थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन साठी 'फायर अलर्ट' जारी; हॉटेल्स, पब्स आणि मॉल्सची झाडाझडती सुरु

मुंबई : थर्टी फर्स्ट जवळ येतोय, नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई हळू हळू सज्ज होत असतानाच, मुंबईकरांच्या

चाउमीन, पिझ्झा-बर्गर.. फास्ट फूडच्या अतिसेवनाने आतड्यांना छिद्र, ११ वीच्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू

अमरोहा : एखाद्या गोष्टीच अतिव्यसन हे नेहमीच जीवघेणं ठरत. अश्याच एका अति फास्ट फूड (जंक फूड) व्यसनाने उत्तर

Ayodhya Ram Mandir : अयोध्येत 'रत्नजडित' रामाचे आगमन; १० फूट उंच, ३० कोटींची सुवर्णमूर्ती आणि तंजावर कलेचा अजोड संगम!

अयोध्या : रामजन्मभूमी अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या भक्तीचा एक नवा अध्याय सुरू झाला आहे. कर्नाटकातील अज्ञात

परिक्षेत प्रश्न विचारला आणि दिल्लीच्या विद्यापीठातील प्राध्यापकाचे थेट निलंबन! काय आहे प्रकरण?

नवी दिल्ली: दिल्लीतील महाविद्यालयं आणि शाळांबाबत नेहमीच काहीतरी विषय चर्चेत असतो. अशाच प्रकारे दिल्लीतील