आज-उद्या-परवा समुद्रकिनाऱ्यावर काळजी घ्या!

४ ते ७ डिसेंबर दरम्यान सलग तीन दिवस मोठी भरती


मुंबई : मुंबईमधील समुद्रकिनाऱ्यांवर फेरफटका कारण्यासाठी जाणारे पर्यटक, नागरिकांना मुंबई महानगरपालिकेने सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. समुद्राला ४ ते ७ डिसेंबर दरम्यान सलग तीन दिवस मोठी भरती येणार आहे. किनाऱ्यावर साडेचार मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे भरतीच्या काळात समुद्रकिनाऱ्यावर जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.


समुद्राला येणाऱ्या मोठ्या भरतीचा तपशिल मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने जाहीर केला आहे. यामध्ये भरतीचा दिनांक व वेळ यासह भरतीदरम्यान समुद्रात उसळणाऱ्या लाटांची उंची नमूद करण्यात आली आहे. समुद्रात ६ डिसेंबर रोजी मध्यरात्री १२.३९ च्या सुमारास ५.०३ उंचीच्या लाटा उसळणार आहेत. पुढील तीन दिवस मोठ्या भरतीच्या वेळी नागरिकांनी समुद्रकिनाऱ्यानजीक जाऊ नये, तसेच या अानुषंगाने मुंबई  महानगरपालिका आणि मुंबई पोलिसांकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने नागरिकांना केले आहे. महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी व शिवाजी पार्क येथे अनुयायी येण्याची शक्यता आहे. त्या दरम्यानच समुद्राला मोठी भरती येणार असून यावेळी नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे पालिका प्रशासनाने सूचित केले आहे.


मोठ्या भरतींचा तपशील खालीलप्रमाणे :


दिवस वेळ लाटांची उंची (मीटरमध्ये)
गुरुवार ४ डिसेंबर रात्री ११:५२ ४.९६
शुक्रवार ५ डिसेंबर सकाळी ११:३० ४.१४
शुक्रवार ५ डिसेंबर मध्यरात्री १२:३९ ५.०३
शनिवार ६ डिसेंबर दुपारी १२.२० ४.१७
शनिवार ६ डिसेंबर मध्यरात्री १.२७ ५.०१
रविवार ७ डिसेंबर दुपारी १.१० ४.१५

Comments
Add Comment

हनुमान रोड मेट्रो स्टेशनला डॉ. रमेश प्रभू यांचे नाव देणार

मुंबई : शैक्षणिक, क्रीडा, आरोग्य आणि राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे विलेपार्ल्याचे माजी आमदार व

गोरेगावमधील मलनिस्सारण वाहिनीच्या खोदकामामुळे नागरिक हैराण

भाजपच्या माजी नगरसेविकेने अधिकाऱ्यांना घेतले फैलावर मुंबई  : गोरेगाव पूर्व येथील आरे भास्कर मार्गावर मल जल

निकाल लागून ४५ दिवसांनंतरही भरती प्रक्रिया मंदावलेलीच!

वैद्यकीय आरोग्य अधिकारी भरती प्रक्रियेत गोंधळ निकालानंतर ‘अतिरिक्त गुण’ नियम बदलाचा निर्णय वैद्यकीय आरोग्य

‘राजगृह’सह चैत्यभूमीवर नागरी सेवा-सुविधा उपलब्ध

सुमारे ८ हजारांहून अधिक अधिकारी - कर्मचारी तैनात मुंबई  : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९व्या महापरिनिर्वाण

Railway News : मोठी बातमी! तत्काळ तिकीट बुकिंगसाठी आता 'ओटीपी' बंधनकारक; रेल्वेचा नवीन नियम काय?

मुंबई : रेल्वे प्रवाशांना तत्काळ तिकीट बुकिंगमध्ये सुरक्षितता आणि पारदर्शकता मिळावी, यासाठी भारतीय रेल्वेने एक

मुंबईतील सर्वाधिक खोल शहरी बोगद्याचे काम सुरू

‘ऑरेंज गेट टनेल’ जून २०२८ पर्यंत पूर्ण करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही; ७०० इमारतींच्या खालून