ऐसी मती जयाची थोर!

मायभाषा: डॉ. वीणा सानेकर


१९९० नंतर जगात जागतिकीकरण खासगीकरण-उदारीकरण हे शब्द आपल्या सतत कानांवर आदळत आले. त्याचबरोबर जग हे ‘ग्लोबल व्हिलेज’ झाले पाहिजे, हा घोषही जागतिकीकरणाच्या सुसाट वादळासोबत आमच्या कानावर आदळत आला. सगळेच ‘ग्लोबल’ म्हणजे अक्षरशः सपाटच करायचे असा सूर सर्वत्र घुमू लागला.


जग एकसारखे करायच्या या सुरात सूर मिसळून सारेच गरागरा फिरू लागले. खरे तर खूप वेगळ्या अर्थाने ‘पृथ्वी हे कुटुंब’ वसुधैव कुटुंबकम् हा संदेश संबंध जगाला देत आले. यात जगातील प्रत्येकाशी पृथ्वीतलावरील ‘जीव’ या अर्थाने मनांचा भावस्पर्शी पूल जोडणे होते पण स्वत्वाचा त्याग करून तो जोडणे अभिप्रेत नव्हते.


आमच्या ज्ञानोबांनी तर ‘हे विश्वचि घर, ऐसी मती जयाची थोर’ असे म्हटलेच आहे. त्यांचे पसायदान आणि त्यातील आशय समजून घेणे म्हणजे तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचे मर्मच जाणणे.


व्यापक आणि उदार दृष्टिकोन किती तर केवळ माणूसच नाही तर प्राणी आणि किडे -मुंग्यांना देखील त्यांचा आनंद मिळवण्याचा, सुखाने जगण्याचा पूर्ण हक्क आहे. त्यांच्यासाठीही ज्ञानोबांनी पसायदान मागितले आहे. अशा ज्ञानेश्वरांचा वसा आपण मिरवतो आहोत, हे विसरून चालणार नाही.


मध्यंतरी एक बातमी वाचली. एका मराठी मुलाला रेल्वे गाडीतल्या एका भांडणात एका गटाने घेरले आणि त्याचा धसका घेऊन त्याने आत्महत्या केली.


बातमीत त्याने जे सांगायचे, ते तो मराठीत बोलला नाही, असा संदर्भ होता. यात काय खरे, काय खोटे हे ठाऊक नाही, मात्र धर्म, जात या कारणांसारखे ‘भाषा’ हे दंग्यांचे कारण होऊ नये असे मनापासून वाटते.


आपल्या भाषेचा अभिमान ही सहज स्वाभाविक गोष्ट आहे. तोच खरे तर इतर भाषेचा सन्मान करायला शिकवतो.आपले स्वत्व गमावू नये नि इतरांचे स्वत्व पायदळी तुडवू नये इतकी आपली मती थोर असू शकेल का?

Comments
Add Comment

वेदनेचा हुंकार

अंधारल्या दिशांना दु:खाची सल सलीला घायाळ जखमांचे भय भयाला भयावह अनामिक चिंता चिंतेच्या

आईच्या काळजीतून बनला ‘विल्व्ह’ ब्रँड

दी लेडी बॉस : अर्चना सोंडे कोईम्बतूरमधल्या एका आईला आपल्या लहान मुलीच्या त्वचेची काळजी वाटली. तिच्या त्वचेची

सौर ऊर्जा निर्मितीचा वेग आणि ग्रीडची कसोटी

भारत आज स्वच्छ आणि शाश्वत ऊर्जेकडे मोठ्या वेगाने वाटचाल करत आहे, केंद्र सरकारने जागतिक स्तरावर पर्यावरण

भारतीय पर्यटनाचे स्वरूप बदलणारे ‘सॅफ्रनस्टेज’

दी लेडी बॉस : अर्चना सोंडे भारतीय प्रवाशांची मानसिकता गेल्या काही वर्षांत झपाट्याने बदलत आहे. केवळ पर्यटन स्थळ

वसंत वैभव

माेरपीस : पूजा काळे ल्या ऋतूच्या बहरापूर्वी, पानगळीला ऊत येतो. कात टाकूनी नवं रुजवाया, खुणा दावित निसर्ग जातो.

महानुभावांच्या योगदानाची ‘साहित्य सरिता’

मराठी भाषा आणि भाषेतील साहित्य संवर्धनासाठी मागील अनेक वर्षांपासून महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ