जगातील सर्वात मोठ्या १० शहरांची यादी समोर, संयुक्त राष्ट्राचा अहवाल

नवी दिल्ली  : संयुक्त राष्ट्रांच्या 'वर्ल्ड अर्बनायझेशन प्रॉस्पेक्ट्स २०२५' या ताज्या अहवालानुसार, जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जपानची राजधानी टोकियोला मागे टाकून इंडोनेशियाची राजधानी जकार्ता हे आता जगातील सर्वात मोठे शहर बनले आहे. संयुक्त राष्ट्राच्या अहवालातून हे धक्कादायक चित्र समोर आले आहे.


या अहवालानुसार, जकार्ताची लोकसंख्या तब्बल ४.१९ कोटी झाली आहे. दुसऱ्या स्थानावर बांगलादेशची राजधानी ढाका (३.६६ कोटी) आहे, तर टोकियो (३.३४ कोटी) तिसऱ्या स्थानावर घसरले आहे. विशेष म्हणजे, भारताची राजधानी नवी दिल्ली, जी यापूर्वी अनेकदा पहिल्या तीन शहरांमध्ये गणली जायची, ती आता चौथ्या स्थानावर आहे, दिल्लीतील लोकसंख्या ३.०२ कोटी नोंदवली गेली आहे.


हा बदल केवळ आकडेवारीचा नाही, तर जागतिक आर्थिक आणि लोकसंख्याशास्त्रीय बदलांचे संकेत देणारा आहे. अहवालातील प्रमुख निष्कर्ष असे आहेत: २०२५ पर्यंत जगातील एकूण लोकसंख्येच्या सुमारे ८० टक्के लोक शहरांमध्ये राहतील. १ कोटीहून अधिक लोकसंख्या असलेल्या 'मेगासिटीज'ची संख्या १९७५ मधील केवळ ८ वरून वाढून आता ३३ झाली आहे. यापैकी तब्बल १९ शहरे एकट्या आशिया खंडात आहेत. जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या टॉप-१० शहरांमध्ये आशिया खंडातील ९ शहरांचा समावेश आहे. या यादीत आशियाबाहेरचे एकमेव शहर इजिप्तची राजधानी कैरो (२.३० कोटी) आहे.

Comments
Add Comment

Parliament Winter Session : आजपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन! पान मसाला, सिगारेट, तंबाखू महागणार, अर्थमंत्री सीतारामन आज विधेयक सादर करणार

नवी दिल्ली : संसदेचे हिवाळी अधिवेशन (Winter Session) आजपासून सुरू होत आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी केंद्र सरकार

चार मिनिटांत ५२ वेळा सॉरी म्हणाला, तरी मुख्याध्यापकांचं दुर्लक्ष

आठवीतल्या मुलाकडून इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न मध्य प्रदेश  : रतलाम येथील

नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत भाजप १७५ जागा जिंकणार?

पक्षाच्या अंतर्गत सर्व्हेतील आकडेवारी समोर मुंबई  : राज्यभरातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींच्या

देशात ३० वर्षांत कामगार कमी अन् निवृत्तीधारक वाढणार

भारतावर येणार ‘पेन्शन संकट’! नवी दिल्ली  : भारत सध्या तरुण देश मानला जात असला तरी येत्या ३० वर्षांत वृद्धांची

नौदल वेगाने आत्मनिर्भर होत आहे

‘मन की बात’ मध्ये पंतप्रधानांनी साधला संवाद नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' च्या १२८ व्या

डिसेंबरच्या पहिल्याच दिवशी हॉटेल व्यावसायिकांना खुशखबर! एलपीजी सिलेंडरच्या दरात घट, जाणून घ्या सविस्तर

मुंबई: डिसेंबर महिना सुरू होताच एक आनंदाची बातमी आली आहे. तेल विपणन कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती कमी