समेट की रणनिती? सिद्धरामय्या –डी के शिवकुमार बैठकीत नक्की काय घडलं?

बेंगळुरू : कर्नाटकात गेल्या काही आठवड्यांपासून सुरू असलेल्या राजकीय तणावानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी बैठकीत एकत्र येत ‘मतभेद मिटल्याचे’ चित्र निर्माण केले. काँग्रेसनेही दोन्ही नेत्यांमध्ये सर्व काही सुरळीत असल्याचा दावा केला. मात्र विरोधक आणि राजकीय विश्लेषकांचे मत वेगळे असून . त्यांच्यानुसार हा समेट तात्पुरता असून ही परिस्थिती आगामी ‘मोठ्या वादळाची पूर्वसूचना’ असू शकते.


सत्तासंघर्षाला जवळपास महिना उलटला असताना दोन्ही नेत्यांनी शनिवारी सिद्धरामय्या यांच्या निवासस्थानी भेट घेतली आणि नंतर संयुक्त पत्रकार परिषद घेत एकता दाखवण्याचा प्रयत्न केला. दोन्ही नेते पक्षश्रेष्ठीच्या निर्णयाला मान देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. २०२३ मध्ये सरकार स्थापन करताना ठरल्याप्रमाणे अडीच वर्षांनंतर (नोव्हेंबर २०२५ ) मुख्यमंत्रीपद शिवकुमार यांच्याकडे जायचे होते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती.


भाजपा नेते प्रकाश शेषराघवचार यांनी या ‘समेटा’ला तात्पुरता ठप्पा देत म्हटले की, बैठक प्रत्यक्षात मतभेद सोडवण्यासाठी नव्हती, तर केवळ कामकाज सुरळीत ठेवण्यासाठीची औपचारिकता होती. त्यांच्या म्हणण्यानुसार शिवकुमार यांचे समर्थक खुलेपणाने त्यांच्यासाठी आवाज उठवत होते, त्यामुळे आता उपमुख्यमंत्री मागे हटणे शक्य नाही. त्यांनी ही परिस्थिती स्वतःच निर्माण केल्याने त्यांच्यासमोर ‘करो या मरो’ असे प्रसंग उभे राहिले आहेत.भाजपाने आणखी आरोप केला की काँग्रेस दोन गटांमध्ये विभागली गेली असून राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडप्रमाणेच गटबाजीचेच नुकसान कर्नाटकमध्येही होणार आहे.


जेडीएसचे एमएलसी टी. ए. शरवण यांनीही दोन्ही नेत्यांच्या एकत्र येण्याला ढोंग म्हणत टीका केली. त्यांच्या मते, काँग्रेस सरकार विकासकामे करण्यात अपयशी ठरले असून मतभेद लपवण्यासाठी नाटक केले जात आहे. जनता हा दिखावा स्वीकारणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.


Comments
Add Comment

पालघरमध्ये बंद दगड खाणीत दुर्घटना; दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू

पालघर : पाण्याचा अंदाज न ओळखता आल्याने दोन मुलांचा जीव गेल्याची दुर्दैवी घटना पालघरमध्ये घडली आहे. मनोरजवळील

दोन वर्षांत दादर-पुणे हिरकणी बसच्या ७८ टक्के फेऱ्यांमध्ये घट…

मुंबई : राज्य परिवहन महामंडळाच्या दादर – पुणे मार्गावरील हिरकणी बसच्या फेऱ्यांमध्ये कमालीची घसरण झाली आहे. दोन

मुंबईत ७०० चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ?

उबाठाच्या प्रस्तावाला सत्ताधारी भाजप- शिवसेनेची मंजुरी मुंबई : मुंबईतील ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना

CH. SAMBHAJINAGAR : MGM Hospital परिसरात नायजेरियन तरुणांकडून महिलेची छेडछाड आणि मारहाण

छत्रपती संभाजीनगर: शहरातील MGM Hospital परिसरात एका महिलेची छेडछाड व मारहाण झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या

वेस्ट इंडिज-भारताच्या सामन्याचा पावसावर ठरणार निकाल

रन रेटवर ठरणार उपांत्य फेरीचा दावेदार नवी दिल्ली : टी-२० वर्ल्ड कपमधील सुपर ८ फेरीचे सामने अंतिम टप्प्यात असून

अर्शदीपने मोडला बोल्टचा विक्रम

बुमराहलाही टाकले मागे नवी दिल्ली : भारतीय संघाचा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने टी-२० विश्वचषकात आपल्या