समेट की रणनिती? सिद्धरामय्या –डी के शिवकुमार बैठकीत नक्की काय घडलं?

बेंगळुरू : कर्नाटकात गेल्या काही आठवड्यांपासून सुरू असलेल्या राजकीय तणावानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी बैठकीत एकत्र येत ‘मतभेद मिटल्याचे’ चित्र निर्माण केले. काँग्रेसनेही दोन्ही नेत्यांमध्ये सर्व काही सुरळीत असल्याचा दावा केला. मात्र विरोधक आणि राजकीय विश्लेषकांचे मत वेगळे असून . त्यांच्यानुसार हा समेट तात्पुरता असून ही परिस्थिती आगामी ‘मोठ्या वादळाची पूर्वसूचना’ असू शकते.


सत्तासंघर्षाला जवळपास महिना उलटला असताना दोन्ही नेत्यांनी शनिवारी सिद्धरामय्या यांच्या निवासस्थानी भेट घेतली आणि नंतर संयुक्त पत्रकार परिषद घेत एकता दाखवण्याचा प्रयत्न केला. दोन्ही नेते पक्षश्रेष्ठीच्या निर्णयाला मान देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. २०२३ मध्ये सरकार स्थापन करताना ठरल्याप्रमाणे अडीच वर्षांनंतर (नोव्हेंबर २०२५ ) मुख्यमंत्रीपद शिवकुमार यांच्याकडे जायचे होते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती.


भाजपा नेते प्रकाश शेषराघवचार यांनी या ‘समेटा’ला तात्पुरता ठप्पा देत म्हटले की, बैठक प्रत्यक्षात मतभेद सोडवण्यासाठी नव्हती, तर केवळ कामकाज सुरळीत ठेवण्यासाठीची औपचारिकता होती. त्यांच्या म्हणण्यानुसार शिवकुमार यांचे समर्थक खुलेपणाने त्यांच्यासाठी आवाज उठवत होते, त्यामुळे आता उपमुख्यमंत्री मागे हटणे शक्य नाही. त्यांनी ही परिस्थिती स्वतःच निर्माण केल्याने त्यांच्यासमोर ‘करो या मरो’ असे प्रसंग उभे राहिले आहेत.भाजपाने आणखी आरोप केला की काँग्रेस दोन गटांमध्ये विभागली गेली असून राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडप्रमाणेच गटबाजीचेच नुकसान कर्नाटकमध्येही होणार आहे.


जेडीएसचे एमएलसी टी. ए. शरवण यांनीही दोन्ही नेत्यांच्या एकत्र येण्याला ढोंग म्हणत टीका केली. त्यांच्या मते, काँग्रेस सरकार विकासकामे करण्यात अपयशी ठरले असून मतभेद लपवण्यासाठी नाटक केले जात आहे. जनता हा दिखावा स्वीकारणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.


Comments
Add Comment

बोरिवलीत तीन दिवसांचा मिलेट महोत्सव

मुंबई : राज्यात ज्वारी, बाजरी, नाचणी ही प्रमुख तृणधान्ये (मिलेट्स) आहेत. कमी पाण्यावर येणारी तसेच पर्यावरणपूरक

बाजार समित्यांचे आधुनिकीकरण व ‘मॅग्नेट’ प्रकल्पासाठी एडीबी सहकार्य करणार

मुंबई : महाराष्ट्रातील कृषी बाजार व्यवस्थेच्या आधुनिकीकरणाला गती देण्यासाठी आशियाई विकास बँकेचे (एडीबी)

एचडीएफसी बँकेत चाललंय काय ? अर्धवेळ अध्यक्षांच्या राजीनाम्यानंतर तीन उच्चाधिकाऱ्यांना राजीनामा देण्याचे आदेश

मुंबई : क्रेडिट सुईस दिवाळखोरीत निघाली. नंतर यूबीएस या बँकिंग कंपनीने क्रेडिट सुईस विलीन करून घेतली. ही प्रक्रिया

बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवार देणार

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक

भोंदू बाबा अशोक खरातशी संबंधित नेत्यांवर कारवाई करणार, प्रफुल्ल पटेलांनी दिली माहिती

मुंबई : भोंदू बाबा अशोक खरातप्रकरणी राज्यातील विविध नेत्यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या

'कोकण रेल्वेच्या गाड्यांना दिवा ऐवजी दादरचाच थांबा द्यावा'

खेड : रत्नागिरी - दादर या पॅसेंजर गाडीला मागील काही महिन्यांपासून दादर ऐवजी दिवा हाच शेवटचा थांबा देण्यात आला आहे.