वेस्ट इंडिज-भारताच्या सामन्याचा पावसावर ठरणार निकाल

रन रेटवर ठरणार उपांत्य फेरीचा दावेदार


नवी दिल्ली : टी-२० वर्ल्ड कपमधील सुपर ८ फेरीचे सामने अंतिम टप्प्यात असून ग्रुप ए मधील फक्त दोन सामने बाकी आहेत. यामध्ये एक सामना दक्षिण आफ्रिका विरुद्ध झिम्बाब्वे, तर दुसरा भारत विरुद्ध वेस्ट इंडिज असा होणार आहे. पहिल्या सामन्याचा उपांत्य फेरीच्या समीकरणांवर फारसा परिणाम होणार नाही; मात्र भारत-वेस्ट इंडिज हा सामना एका अर्थाने ‘क्वार्टर फायनल’ ठरणार आहे.


भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सामन्यात जो संघ विजय मिळवेल, तो संघ थेट उपांत्य फेरीत प्रवेश करणार असल्याने या सामन्याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे. पण एका गोष्टीमुळे क्रिकेटप्रेमींची चिंता वाढवली आहे. ती गोष्ट म्हणजे पाऊस. जर हा सामना पावसामुळे सामना रद्द झाला, तर त्याचा थेट फटका भारतीय संघाला बसणार आहे.


भारत वेस्टइंडीज सामना १ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता कोलकाता येथील ईडन गार्डनवर खेळवला जाणार आहे. सुपर ८ फेरीत दोन्ही संघांनी आतापर्यंत प्रत्येकी एक सामना जिंकला आहे. त्यामुळे गुणतालिकेत दोघांचेही प्रत्येकी दोन गुण आहेत. हा सामना जिंकणारा संघ चार गुणांसह थेट सेमीफायनलमध्ये प्रवेश करणार आहे. पण जर पावसामुळे हा सामना रद्द झाला, तर दोन्ही संघाला प्रत्येकी १ गुण मिळेल. अशावेळी दोन्ही संघाचे तीन गुण होतील. त्यानंतर रनरेटनुसार एक संघ उपांत्य फेरीत पोहोचेल.



पावसाच्या सावटामुळे भारताच्या वाढणार अडचणी


रन रेटबाबत बोलायचे झाल्यास, वेस्ट इंडिज संघाचा नेट रनरेट भारतापेक्षा जास्त आहे. दोन सामन्यांनंतर भारताचा नेट रनरेट -०.१०० आहे, तर वेस्ट इंडिजचा +१.७९१ आहे. त्यामुळे सामना रद्द झाल्यास वेस्ट इंडिजला उपांत्य फेरीचे तिकीट मिळण्याची शक्यता अधिक आहे. बीबीसी वेदर आणि अॅक्यूवेदरच्या अंदाजानुसार सामन्याच्या वेळेत पावसाची शक्यता तशी कमी आहे. त्यामुळे सामना पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे. मात्र, अनपेक्षितरीत्या पाऊस झाला तर भारतीय संघाच्या अडचणी वाढणार आहेत.

Comments
Add Comment

IPL Punjab Kings : ऐन IPL मध्ये पंजाब किंग्सच्या 'या' खेळाडूच झालं निधन; म्हणून पंजाबच्या टीमने बांधली होती काळी फित

मुंबई : सध्या IPL २०२६ चा हंगाम जोरदार सुरु आहे. प्रत्येक टीम आपलं सर्वस्व पणाला लावून मैदानात जीव तोडून खेळताना

SRHvsPBKS : क्षेत्ररक्षणातला ढिसाळपणा भोवला, पंजाब किंग्सचा पराभव; सनरायझर्स हैदराबादचा विजय

कूपर कॉनलीची एकाकी शतकी झुंज पंजाबने हैदराबादला अव्वल स्थान केले बहाल हैदराबाद : २२०+ धावा उभारल्यानंतर विजय

PAK VS IND : कधी होणार भारत - पाकिस्तान क्रिकेट सामना ? आली मोठी अपडेट

BCCI UPDATE : भारत पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामने बघण्यासाठी मोठ्या संख्येने प्रेक्षक येतात. स्टेडियम हाऊसफुल

Vinesh Phogat : कुस्तीपटू विनेश फोगाटला आयटीएकडून नोटीस ; उत्तेजक चाचणीत अनउपस्थिती....

नवी दिल्ली : भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटला उत्तेजक चाचणी देण्यासाठी गैरहजर राहिल्याप्रकरणी इंटरनॅशन टेस्टिंग

IPL 2026 : प्लेऑफचे ठिकाण झाले पक्के ; बीसीसीआयने दिली मोठी अपडेट

बंगळुरुमध्ये एकही सामना नाही...तिकीटेमुळे वाद BCCI UPDATE : आयपीएल २०२६ आता अखेरच्या टप्पयात आहे. हंगामातील अखेरचा साखळी

SRH VS PBKS : टॉप स्पॉटसाठी हैदराबाद विरुद्ध पंजाब; हैद्राबादमध्ये रंगणार थरारक सामना !

IPL 2026 : आयपीएलमध्ये आज राजीव गांधी स्टेडियमवर टेबल टॉपर्संची लढत होणार आहे. हंगामातील ४९ वा सामना पंजाब विरुद्ध