डोंबिवलीत मनसेला खिंडार!

दोन माजी नगरसेवक व नगरसेविका भाजपमध्ये


डोंबिवली  : मनसेचे कल्याण जिल्हाध्यक्ष आणि डोंबिवली पश्चिमेतील देवीचापाडा येथील मनसेचे माजी नगरसेवक प्रकाश भोईर यांनी आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्यासह भोईर यांच्या पत्नी सरोज भोईर, मनसेचे उपशहर जिल्हाध्यक्ष श्रीकांत वारंगे, अशोक म्हात्रे, संदीप म्हात्रे, सचिन सणस, काशिनाथ भोईर, गुरुनाथ मांजरेकर यांच्यासह कल्याण-डोंबिवलीतील शेकडो मनसैनिकांचा समावेश आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत आज त्यांनी पक्षप्रवेश केला. चव्हाण यांनी पक्षात सर्वांचे स्वागत करुन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


''आजचा दिवस अत्यंत आनंदाचा आहे. कार्यकर्त्यांशी असणारी नाळ जपणारे, राजकारणापलीकडे जाऊन जनतेच्या अडचणींमध्ये खंबीरपणे साथ देणारे आमचे मित्र प्रकाश भोईर आणि सरोज भोईर यांच्या प्रवेशामुळे कल्याण-डोंबिवलीतील भाजपची ताकद वाढली आहे'', असा विश्वास प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी व्यक्त केला. याप्रसंगी कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब, भाजपा अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश महामंत्री शशिकांत कांबळे, डोंबिवली पश्चिम मंडल अध्यक्ष प्रियाताई जोशी, जुनी डोंबिवली मंडल अध्यक्ष पवन पाटील, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील माजी स्थायी समिती सभापती दिपेश म्हात्रे, युवा नेते अनमोल म्हात्रे व पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Comments
Add Comment

शिवजन्मभूमीचा विकास करणे आमचे भाग्य

जुन्नरला देशातील क्रमांक-१ पर्यटन तालुका करणार एमआयडीसी, आयटी पार्क चांगले रस्ते तयार करून जुन्नरचा कायापालट

नाशिकच्या ६२२ ग्रामपंचायतींमध्ये ‘प्रशासक राज’

नाशिक : यंदा मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील ६२२ ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्यात येणार आहे. सार्वत्रिक

राष्ट्रीय खोखोपटू सुनिल लाड यांची मुंबई महानगरपालिकेत प्रमुख अधिकारी (प्र) म्हणून नियुक्ती

मुंबई : राष्ट्रीय खोखोपटू तथा क्रीडा प्रसारक श्री. सुनिल लाड यांची मुंबई महानगरपालिकेच्या दुकाने व आस्थापना

kajol : मी मारण्यापूर्वी..., अभिनेत्री काजोलच खळबळजनक वक्तव्य

kajol : बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री काजोल ही प्रेक्षकांच्या मनावर आजही तेवढंच राज्य करते जेवढं ती आधी करत होती.

तुम्हाला माहित आहे का डार्क चॉकलेट खाण्याचे फायदे ?

लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच चॉकलेट खायला आवडतं. सध्या बाजारात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट

Raj Thackeray: रस्ता बांधला आणि टोल वसुल केला इतकीच सरकारची जबाबदारी आहे का ?

मुंबई: मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग जवळपास ३२ तास ठप्प होता. प्रवाशांचे कमालीचे हाल झाले. यानंतर नेहमीप्रमाणे