Gyan Bharatam project : ज्ञानभारतम् प्रकल्पाची सुरुवात; देशव्यापी हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला प्रारंभ

मुंबई : भारताच्या समृद्ध ज्ञानपरंपरेचा अमूल्य ठेवा असलेल्या हस्तलिखितांचे जतन, संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी केंद्र सरकारने ‘ज्ञानभारतम्’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू केली आहे. या अंतर्गत देशव्यापी हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला १६ मार्च २०२६ पासून प्रारंभ करण्यात आला आहे.


भारताला प्राचीन काळापासून हस्तलिखितांचा मोठा वारसा लाभला असून पारंपरिक ज्ञान पिढ्यान्‌पिढ्या याच माध्यमातून पुढे आले आहे. मात्र ही हस्तलिखिते विविध ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात असल्याने त्यांचे एकत्रीकरण करण्याची गरज ओळखून ‘ज्ञानभारतम्’ प्रकल्पाची आखणी करण्यात आली आहे.


संस्कृती मंत्रालयाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेचा मुख्य उद्देश देशभरातील मौल्यवान हस्तलिखितांचे सर्वेक्षण, दस्तऐवजीकरण, डिजिटायझेशन आणि जतन करणे हा आहे. केंद्रीय अर्थसंकल्प २०२५ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत एक कोटीहून अधिक हस्तलिखितांचा शोध घेऊन त्यांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.


या प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय डिजिटल संग्रह उभारण्याचा मानस असून, त्यामध्ये भारताच्या ज्ञानपरंपरेशी संबंधित हस्तलिखिते राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध करून दिली जाणार आहेत. हस्तलिखितांची मालकी संबंधित संस्था किंवा व्यक्तीकडेच राहणार असली तरी इच्छुकांनी ती शासनाकडे सुपूर्द करण्याची मुभा देखील देण्यात आली आहे.


महाराष्ट्रात या मोहिमेसाठी कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ, नागपूर आणि भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था, पुणे ही क्लस्टर केंद्रे तर आनंद आश्रम संस्थान आणि भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे ही स्वतंत्र केंद्रे म्हणून कार्यरत राहणार आहेत. राज्य नोडल संस्था म्हणून पुराभिलेख संचालनालय, मुंबई यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


या सर्वेक्षणासाठी विशेष “Gyan Bharatam” मोबाईल अ‍ॅप विकसित करण्यात आले असून त्याद्वारे हस्तलिखितांचे मूल्यांकन, पडताळणी आणि दस्तऐवजीकरण केले जाणार आहे. जिल्हास्तरावर नोडल अधिकारी नियुक्त करून विविध संस्था, ग्रंथालये, धार्मिक ठिकाणे तसेच खाजगी संग्राहक यांना या मोहिमेत सहभागी करून घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.


या उपक्रमात संशोधक, विद्यार्थी, स्वयंसेवक, पारंपरिक विद्वान तसेच वारसा संवर्धन संस्थांचा सक्रिय सहभाग अपेक्षित असून, नागरिकांनी आपल्या जवळील हस्तलिखितांची माहिती अ‍ॅपवर अपलोड करून या राष्ट्रीय उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Anant Ambani : हिप्पोंना मारु नका, वनतारामध्ये पाठवा; अनंत अंबानी यांची कोलंबिया सरकारला विनंती

मुंबई : उद्योगपती अनंत अंबानी यांचे प्राणीप्रेम पुन्हा एकदा समोर आले आहे. दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया देशात

Mumbai News : मुंबईत पाण्याचा निचरा करण्यासाठी ५४७ पंपांची आणि फिरते डीवॉटरिंग पंप असणाऱ्या १० वाहनांची व्यवस्था

मुंबईत यंदा पाणी साचण्याची फक्त ८० ठिकाणे मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईत पावसाळ्यात पाणी साचणाऱ्या ठिकाणांची

BMC News : 'मध्य वैतरणा प्रकल्प राबवताना तुमचे पर्यावरण प्रेम कुठे होते?'

मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने गारगाई पाणी प्रकल्पाच्या कामाला गती देण्यासाठी स्थायी समिती व महापालिका

single-window clearance : लाईव्ह इव्हेंट्स परवानगीसाठी ‘एक खिडकी’ सुविधा

मुंबई : राज्यातील लाईव्ह मनोरंजन क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. लाईव्ह

Godavari to Narmada : असा होणार गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचा समारोप समारंभ

मुंबई : जलव्यवस्थापन अधिक गतिमान, लोकाभिमुख आणि जनसहभागातून प्रभावी करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या

Seeds Act : राज्याचा स्वतंत्र बियाणे कायदा करणार

मुंबई : शेतकऱ्यांना स्वतःचे बियाणे साठवणे, वापरणे, देवाणघेवाण करणे आणि (ब्रँडेड नाव न वापरता) विक्री करण्यास