Gyan Bharatam project : ज्ञानभारतम् प्रकल्पाची सुरुवात; देशव्यापी हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला प्रारंभ

मुंबई : भारताच्या समृद्ध ज्ञानपरंपरेचा अमूल्य ठेवा असलेल्या हस्तलिखितांचे जतन, संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी केंद्र सरकारने ‘ज्ञानभारतम्’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू केली आहे. या अंतर्गत देशव्यापी हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला १६ मार्च २०२६ पासून प्रारंभ करण्यात आला आहे.


भारताला प्राचीन काळापासून हस्तलिखितांचा मोठा वारसा लाभला असून पारंपरिक ज्ञान पिढ्यान्‌पिढ्या याच माध्यमातून पुढे आले आहे. मात्र ही हस्तलिखिते विविध ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात असल्याने त्यांचे एकत्रीकरण करण्याची गरज ओळखून ‘ज्ञानभारतम्’ प्रकल्पाची आखणी करण्यात आली आहे.


संस्कृती मंत्रालयाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेचा मुख्य उद्देश देशभरातील मौल्यवान हस्तलिखितांचे सर्वेक्षण, दस्तऐवजीकरण, डिजिटायझेशन आणि जतन करणे हा आहे. केंद्रीय अर्थसंकल्प २०२५ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत एक कोटीहून अधिक हस्तलिखितांचा शोध घेऊन त्यांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.


या प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय डिजिटल संग्रह उभारण्याचा मानस असून, त्यामध्ये भारताच्या ज्ञानपरंपरेशी संबंधित हस्तलिखिते राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध करून दिली जाणार आहेत. हस्तलिखितांची मालकी संबंधित संस्था किंवा व्यक्तीकडेच राहणार असली तरी इच्छुकांनी ती शासनाकडे सुपूर्द करण्याची मुभा देखील देण्यात आली आहे.


महाराष्ट्रात या मोहिमेसाठी कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ, नागपूर आणि भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था, पुणे ही क्लस्टर केंद्रे तर आनंद आश्रम संस्थान आणि भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे ही स्वतंत्र केंद्रे म्हणून कार्यरत राहणार आहेत. राज्य नोडल संस्था म्हणून पुराभिलेख संचालनालय, मुंबई यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


या सर्वेक्षणासाठी विशेष “Gyan Bharatam” मोबाईल अ‍ॅप विकसित करण्यात आले असून त्याद्वारे हस्तलिखितांचे मूल्यांकन, पडताळणी आणि दस्तऐवजीकरण केले जाणार आहे. जिल्हास्तरावर नोडल अधिकारी नियुक्त करून विविध संस्था, ग्रंथालये, धार्मिक ठिकाणे तसेच खाजगी संग्राहक यांना या मोहिमेत सहभागी करून घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.


या उपक्रमात संशोधक, विद्यार्थी, स्वयंसेवक, पारंपरिक विद्वान तसेच वारसा संवर्धन संस्थांचा सक्रिय सहभाग अपेक्षित असून, नागरिकांनी आपल्या जवळील हस्तलिखितांची माहिती अ‍ॅपवर अपलोड करून या राष्ट्रीय उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Bandra Encroachment Removal Campaign : वांद्रे स्थानकाबाहेर अतिक्रमण हटाव मोहीम; अनधिकृत मशिदीवर महापालिकेची कारवाई

मुंबई : मुंबईतील वांद्रे स्थानकाबाहेरील परिसरात आज सकाळी मोठी अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. या

IPL 2026 : आरसीबीसाठी दिलासादायक बातमी! विराट कोहलीचा ओपनिंग पार्टनर प्लेऑफपूर्वी संघात परतणार...

RCB : आयपीएल २०२६ मध्ये अनेक खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर झाले आहेत. त्यामुळे संघांना त्याचा मोठा फटका बसला

भूमी अभिलेख विभागाचा; राज्यात ५० नवी कार्यालये सुरु होणार; १० हजार पदांच्या आकृतीबंधालाही मूर्तरूप

मुंबई : प्रशासकीय कामकाज लोकाभिमुख आणि वेगवान करण्यासाठी, भूमी अभिलेख विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तेजस नेटवर्क्स आणि महाआयटीमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

महाराष्ट्रातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना दूरसंचार तंत्रज्ञानाचे जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळणार मुंबई :

Virat Kohli : ९ वर्षांत कुणी विचारलंच नाही – तू कसा आहेस ? कसोटी कर्णधारपद सोडण्यावरून विराट कोहलीचा भावनिक खुलासा ..

बेंगळुरू : विराटने कसोटी कर्णधारपद सोडून आज ४ वर्षे उलटून गेली आहेत तरीही त्याच्या त्या निर्णयावर अजूनही बऱ्याच

Minister Nitesh Rane : राज्यातील जलवाहतूक सेवा होणार डिजिटल

 मंत्री नितेश राणे यांचे निर्देश; ऑनलाईन तिकीट व्यवस्थेची अंमलबजावणी करणार मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील