महाराष्ट्रात गारठा वाढला, काही भागांत पावसाची शक्यता!

पुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या 'दितवाह' चक्रीवादळाचा परिणाम देशभर जाणवू लागला असून, अनेक राज्यांमध्ये वातावरण ढगाळ, तर उत्तरेकडील भागात थंडीचा जोर वाढला आहे. पर्वतीय प्रदेशात हिमवर्षाव पुन्हा सुरु झाल्याने थंड वारे देशभर पसरत आहेत. त्याचा फटका महाराष्ट्रालाही बसत असून, पहाटेच्या वेळेत गारठा तीव्र जाणवत आहे. दिवसभरात तापमान स्थिर राहिले तरी सायंकाळनंतर थंडीचा गारठा अधिक जाणवत असून, काही ठिकाणी किमान तापमान ७ अंशापर्यंत खाली आले आहे.

मध्य आणि मराठवाडा विभागात तापमान आणखी कमी होण्याचा अंदाज व्यक्त होत असून या भागांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, विदर्भात आकाश ढगाळ राहण्याची शक्यता असून हलक्या सरींचे अनुमान हवामान विभागाने व्यक्त केले आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर घाटप्रदेशात गारठा वाढत असून पुढील काही दिवस थंडी आणखी तीव्र होणार असल्याचे संकेत वातावरणातून मिळत आहेत.

राज्यात पुढील २४ तासांत मुंबई व उपनगरांमध्येही थंडी वाढण्याची शक्यता आहे. तर जळगाव, धुळे, नाशिक, अहमदनगर, पुणे, जालना आणि परभणी या जिल्ह्यांत हलक्या पावसासह थंडीची लाट जाणवू शकते. दरम्यान, बंगालच्या उपसागरात चक्रीवादळी वारे दुर्बल झाले असले तरी, ते आता तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात परिवर्तित झाले असून १ डिसेंबरला ते उत्तर तामिळनाडू–पुदुच्चेरी किनाऱ्यापासून २० किमी अंतरावर येण्याचा अंदाज आहे. त्यामुळे दक्षिण किनारपट्टी भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Comments
Add Comment

विहिरीतील मोटार काढताना काळाचा घाला; धाराशिवमध्ये बाप-लेकासह चौघांचा दुर्दैवी मृत्यू

धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील केशेगाव येथे घडलेल्या एका भीषण अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र

‘या’ उमेदवारांना मत देणार नाही; नाशिकमधील गावकऱ्यांचा ठाम निर्णय

नाशिक : नाशिक महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंबड गावातील ग्रामस्थांची

Tragedy at Nagpur Bachelor Party : मैत्री की क्रूरता? पार्टीत अडथळा नको म्हणून बेशुद्ध मित्राला चादरीत गुंडाळून फेकून दिलं; बॅचलर पार्टीचा 'सैतानी' चेहरा समोर

नागपूर : नागपूर जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या मित्राच्या

आंदेकर कुटुंबिय उतरलं आगामी निवडणुकीच्या रिंगणात! कडक पोलीस बंदोबस्तात केला उमेदवारी अर्ज दाखल

पुणे: यावर्षीच्या गणपतीमध्ये झालेल्या आयुष कोमकर खून प्रकरणात आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर न्यायालयीन

आधी मतांसाठी सोनं वाटलं, पराभवानंतर धमकी देत.... अन त्र्यंबकेश्वरमध्ये खळबळ

नाशिक : निवडणुकीपूर्वी ‘कुबेर’ बनून मतदारांवर सोन्याची बरसात करणारा उमेदवार, पराभवानंतर मात्र मतदारांच्या

कोरेगाव भीमा विजयी दिनानिमित्त पुण्यात वाहतुकीत बदल; कोणते पर्यायी मार्ग वापरावेत?

पुणे: कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी दरवर्षी १ जानेवारीला लाखो अनुयायी पुण्यात येत असतात.