हिंजवडी-वाघोली वाहतूक कोंडीला ब्रेक; PMRDAचा नवा मास्टरप्लॅन जाहीर

पुणे : पुणे महानगर प्रदेशातील वाढत्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण आणण्यासाठी PMRDA ने मोठी पावले उचलली आहेत. हिंजवडी, वाघोली, शिक्रापूर या वेगाने विकसित होणाऱ्या परिसरांमधील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी प्राधिकरणाने सविस्तर मास्टरप्लॅन जाहीर केला आहे. अक्कुर्डी येथील PMRDA मुख्यालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत महसूल, पोलीस, एमआयडीसी, हायवे प्राधिकरण, मेट्रो आणि स्थानिक प्रतिनिधी यांसह सर्व विभागीय अधिकारी उपस्थित होते.


प्राधिकरणाने तातडीने राबवण्यात येणाऱ्या उपाययोजनांमध्ये रस्त्यांवरील खड्ड्यांची दुरुस्ती हा प्रमुख मुद्दा आहे. स्थानिक नागरिक संस्थांना ५ डिसेंबरपर्यंत सर्व महत्त्वाच्या रस्त्यांवरील खड्डे भरून वाहतूक सुरळीत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे या भागातून रोज प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.


नव्या कृती आराखड्यात रस्त्यांचे रुंदीकरण, उड्डाणपूल, आणि एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रकल्पांचा समावेश आहे. वाघोली ते शिक्रापूर दरम्यानच्या ३० मीटर रुंदीच्या समांतर रस्त्याचे काम सध्या सुरू असून जमीन संपादन प्रक्रियेलाही गती देण्यात आली आहे. तसेच पूर्वीच्या प्रादेशिक आराखड्यातील पर्यायी मार्गांचा विकास करण्यावर भर देण्यात येणार आहे. हे मार्ग विशेषतः शिक्रापूरमधील वाहतूक कोंडी कमी करण्यात मदत करतील. वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीनेही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. नव्या सिग्नल व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे, आणि अवजड वाहनांवरील नियमांचे काटेकोर पालन यावर भर दिला जाणार आहे. ट्रक आणि डंपर चालकांसाठी ३० किलोमीटर प्रति तास वेगमर्यादा कायम राहील तसेच सेन्सर्स आणि कॅमेऱ्यांची बसवणी अनिवार्य असेल. कोणत्याही अपघाताच्या प्रसंगी चालक, वाहन मालक आणि कंत्राटदार यांची संयुक्त जबाबदारी निश्चित केली जाईल.


अधिकाऱ्यांच्या मते, या सर्व उपाययोजनांमुळे पुण्यातील गर्दीच्या मार्गांवरील वाहतूक लक्षणीयरीत्या सुरळीत होईल आणि प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित व सोयीस्कर बनेल. PMRDA चा हा नवीन मास्टरप्लॅन योग्य रितीने राबवला गेला तर पुढील काळात पुण्यातील वाहतूक व्यवस्था मोठ्या प्रमाणावर बदलू शकते.

Comments
Add Comment

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे