हिंजवडी-वाघोली वाहतूक कोंडीला ब्रेक; PMRDAचा नवा मास्टरप्लॅन जाहीर

पुणे : पुणे महानगर प्रदेशातील वाढत्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण आणण्यासाठी PMRDA ने मोठी पावले उचलली आहेत. हिंजवडी, वाघोली, शिक्रापूर या वेगाने विकसित होणाऱ्या परिसरांमधील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी प्राधिकरणाने सविस्तर मास्टरप्लॅन जाहीर केला आहे. अक्कुर्डी येथील PMRDA मुख्यालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत महसूल, पोलीस, एमआयडीसी, हायवे प्राधिकरण, मेट्रो आणि स्थानिक प्रतिनिधी यांसह सर्व विभागीय अधिकारी उपस्थित होते.


प्राधिकरणाने तातडीने राबवण्यात येणाऱ्या उपाययोजनांमध्ये रस्त्यांवरील खड्ड्यांची दुरुस्ती हा प्रमुख मुद्दा आहे. स्थानिक नागरिक संस्थांना ५ डिसेंबरपर्यंत सर्व महत्त्वाच्या रस्त्यांवरील खड्डे भरून वाहतूक सुरळीत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे या भागातून रोज प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.


नव्या कृती आराखड्यात रस्त्यांचे रुंदीकरण, उड्डाणपूल, आणि एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रकल्पांचा समावेश आहे. वाघोली ते शिक्रापूर दरम्यानच्या ३० मीटर रुंदीच्या समांतर रस्त्याचे काम सध्या सुरू असून जमीन संपादन प्रक्रियेलाही गती देण्यात आली आहे. तसेच पूर्वीच्या प्रादेशिक आराखड्यातील पर्यायी मार्गांचा विकास करण्यावर भर देण्यात येणार आहे. हे मार्ग विशेषतः शिक्रापूरमधील वाहतूक कोंडी कमी करण्यात मदत करतील. वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीनेही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. नव्या सिग्नल व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे, आणि अवजड वाहनांवरील नियमांचे काटेकोर पालन यावर भर दिला जाणार आहे. ट्रक आणि डंपर चालकांसाठी ३० किलोमीटर प्रति तास वेगमर्यादा कायम राहील तसेच सेन्सर्स आणि कॅमेऱ्यांची बसवणी अनिवार्य असेल. कोणत्याही अपघाताच्या प्रसंगी चालक, वाहन मालक आणि कंत्राटदार यांची संयुक्त जबाबदारी निश्चित केली जाईल.


अधिकाऱ्यांच्या मते, या सर्व उपाययोजनांमुळे पुण्यातील गर्दीच्या मार्गांवरील वाहतूक लक्षणीयरीत्या सुरळीत होईल आणि प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित व सोयीस्कर बनेल. PMRDA चा हा नवीन मास्टरप्लॅन योग्य रितीने राबवला गेला तर पुढील काळात पुण्यातील वाहतूक व्यवस्था मोठ्या प्रमाणावर बदलू शकते.

Comments
Add Comment

ठाणे पूर्व येथील श्री जय अंबे माता नवरात्रोत्सव मंडळाच्या देवीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न; उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली सहकुटुंब देवीची पूजा

ठाणे: चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे

‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार'मुळे भागली ११ हजार गावांची तहान

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना; ७७ लाख टँकर क्षमतेचा पाणीसाठा पुनर्संचयित, ७.७३ कोटी घनमीटर गाळ

अभ्यास न झाल्याने विद्यार्थाने चोरली प्रश्नपत्रिका, थेट...

मुंबई: राज्यात दहावी- बारावी बोर्ड परिक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार सुरु असल्याचे समोर येत आहे. एकीकडे

Gudi Padwa 2026 : नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी दिल्या गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छा

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी गुढीपाडवा व मराठी नवीन वर्षा निमित्त राज्यातील

भविष्य सांगता सांगता जमवली अवाढव्य संपत्ती, अशोक खरातचं साम्राज्य कुठे आणि किती?

अहिल्यानगर: महिलांचे शोषण करणाऱ्या आणि स्वतःला ज्योतिषी म्हणवून घेणाऱ्या अशोक खरात उर्फ कॅप्टन खरात याच्या

Gudi Padwa 2026 Muhurat: गुढीपाडव्याचा इतिहास काय आहे?, जाणून घ्या मुहूर्त, पूजा आणि विधी

मुंबई: हिंदू धर्मात गुढीपाडवा सणाला अतिशय महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस चैत्र शुद्ध