पंतप्रधान मोदी देशवासियांशी १२८ व्यांदा 'मन की बात' मधून संवाद साधणार

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवार ३० नोव्हेंबर २०२५ रोजी १२८ व्यांदा 'मन की बात' कार्यक्रमाद्वारे जनतेशी संवाद साधणार आहेत. हा 'मन की बात' कार्यक्रमाचा १२८ वा भाग आहे. हा कार्यक्रम ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शन नेटवर्क, ऑल इंडिया रेडिओ न्यूज वेबसाइट आणि न्यूजऑनएअर मोबाईल अॅपवर प्रसारित केला जाईल. ऑल इंडिया रेडिओ न्यूज, डीडी न्यूज, पंतप्रधान कार्यालय आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या यूट्यूब चॅनेलवर देखील त्याचे थेट प्रक्षेपण केले जाईल. हिंदी प्रसारणानंतर लगेचच ऑल इंडिया रेडिओ प्रादेशिक भाषांमध्ये देखील कार्यक्रम प्रसारित करेल.


पंतप्रधान मोदींनी १२७ व्या 'मन की बात' कार्यक्रमाद्वारे छठ सण, कोरापूट कॉफी, ऑपरेशन सिंदूर, जीएसटी बचत महोत्सव आणि भारतीय जातीच्या कुत्र्यांसह इतर अनेक विषयांवर जनतेशी संवाद साधला होता. यावेळी पंतप्रधान कोणत्या विषयावर बोलणार याबाबत प्रचंड उत्सुकता आहे.


'मन की बात' हा कार्यक्रम देशाच्या तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचतो. या कार्यक्रमाद्वारे विकासाकरिता आणि नवनव्या प्रयोगांकरिता देशवासियांना प्रेरित केले जाते. अनेक अभिनव कार्यक्रमांची सुरुवात मोदींनी 'मन की बात'द्वारे जनतेशी संवाद साधत केली आहे. या कार्यक्रमाची सुरुवात २०१४ मध्ये झाली. अनेक सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय तसेच क्रीडा आदी विषयांवर पंतप्रधान मोदी 'मन की बात' मधून बोलतात. यामुळेच या कार्यक्रमाला विशेष महत्त्व आहे.

Comments
Add Comment

Narendra Modi : पंतप्रधान मोदींचा केरळ - तामिळनाडू दौरा; हजारो कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे करणार उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या म्हणजेच बुधवार ११ मार्च २०२६ रोजी केरळ आणि तामिळनाडूचा दौरा करणार असून या

ESMA Act : इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; देशभरात 'एस्मा' कायदा लागू

इराण आणि अमेरिकेच्या युद्धाचा आज (मंगळवार १० मार्च) अकरावा दिवस आहे. या युद्धामुळे जगातील इंधन टंचाईवर मोठा

गॅस पुरवठ्याबाबत केंद्राचा ऐतिहासिक निर्णय

नवी दिल्ली: पश्चिम आशियामध्ये इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील तणाव आता टोकाला पोहोचला असून, त्याचे पडसाद

LPG Booking Rule : LPG सिलेंडरच्या बुकिंग कालावधीत वाढ; किती दिवसांनी दुसरा बुक करता येणार?

मुंबई : पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या इराण-इस्त्रायलच्या संघर्षाचा फटका आता भारताला बसत असल्याचं दिसून येतं

भारताचा शेषनाग १५० ड्रोन, नवं घातक शस्त्र

नवी दिल्ली : पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धामुळे ड्रोनचे महत्त्व आणखी वाढले आहे. याआधी रशिया - युक्रेन लढाईत

Crude Oil Purchases : भारताच्या कच्च्या तेलाच्या खरेदीत वाढ; आफ्रिकेसह अमेरिका, रशिया आणि लॅटिन अमेरिकेतून कच्च्या तेलाची खरेदी वाढली

पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आणि होर्मुज जलसंधीतून जाणाऱ्या जहाजांच्या हालचालींवर