पंतप्रधान मोदी देशवासियांशी १२८ व्यांदा 'मन की बात' मधून संवाद साधणार

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवार ३० नोव्हेंबर २०२५ रोजी १२८ व्यांदा 'मन की बात' कार्यक्रमाद्वारे जनतेशी संवाद साधणार आहेत. हा 'मन की बात' कार्यक्रमाचा १२८ वा भाग आहे. हा कार्यक्रम ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शन नेटवर्क, ऑल इंडिया रेडिओ न्यूज वेबसाइट आणि न्यूजऑनएअर मोबाईल अॅपवर प्रसारित केला जाईल. ऑल इंडिया रेडिओ न्यूज, डीडी न्यूज, पंतप्रधान कार्यालय आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या यूट्यूब चॅनेलवर देखील त्याचे थेट प्रक्षेपण केले जाईल. हिंदी प्रसारणानंतर लगेचच ऑल इंडिया रेडिओ प्रादेशिक भाषांमध्ये देखील कार्यक्रम प्रसारित करेल.


पंतप्रधान मोदींनी १२७ व्या 'मन की बात' कार्यक्रमाद्वारे छठ सण, कोरापूट कॉफी, ऑपरेशन सिंदूर, जीएसटी बचत महोत्सव आणि भारतीय जातीच्या कुत्र्यांसह इतर अनेक विषयांवर जनतेशी संवाद साधला होता. यावेळी पंतप्रधान कोणत्या विषयावर बोलणार याबाबत प्रचंड उत्सुकता आहे.


'मन की बात' हा कार्यक्रम देशाच्या तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचतो. या कार्यक्रमाद्वारे विकासाकरिता आणि नवनव्या प्रयोगांकरिता देशवासियांना प्रेरित केले जाते. अनेक अभिनव कार्यक्रमांची सुरुवात मोदींनी 'मन की बात'द्वारे जनतेशी संवाद साधत केली आहे. या कार्यक्रमाची सुरुवात २०१४ मध्ये झाली. अनेक सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय तसेच क्रीडा आदी विषयांवर पंतप्रधान मोदी 'मन की बात' मधून बोलतात. यामुळेच या कार्यक्रमाला विशेष महत्त्व आहे.

Comments
Add Comment

Ramdas Athawale: केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्यसभा खासदार पदाची केली हॅट्ट्रिक

मुंबई: रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची तिस-यांदा

Delhi: हातात पुष्पगुच्छ घेऊन थेट शिरला विधानसभेत, अध्यक्षांच्या गाडीजवळ फुलांचा गुच्छ ठेवला अन्...

नवी दिल्ली: दिल्ली विधानसभेत सुरक्षेचा मोठा भंग झाल्याचे वृत्त आहे. एका वाहनाने बॅरियर तोडून गेट क्रमांक २ मधून

Umpire Killed Over Run-Out Argument : विशाखापट्टणम हादरलं! रनआऊट दिलं म्हणून थेट अंपायरचीच केली हत्या

विशाखापट्टणम येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने क्रीडा क्षेत्र हादरले आहे. स्थानिक स्तरावर सुरू असलेल्या

Crime News : पाटण्यात माणुसकीला काळीमा; सख्ख्या काकाकडूनच ३ वर्षांच्या चिमुकलीवर सामूहिक बलात्कार

पाटणा : बिहारची राजधानी पाटणामध्ये नात्याला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. परसा बाजार

Ladakh: लिलावात २५ हजार रुपयांना विकले गेले १० रुपये किमतीचे अंडे; इराणी पीडितांसाठीचा अनोखा उपक्रम चर्चेत

नवी दिल्ली: लडाखमधील लेह जिल्ह्यातील लोक इराणच्या लोकांना मदत करण्यासाठी पुढे आले आहेत. युद्धाच्या काळात

Delhi: पार्किंगवरून महिला उपनिरीक्षक आणि वृद्ध व्यक्तीमध्ये वाद, पोलिसांनी काय कारवाई केली?

दिल्ली: दिल्लीतील उत्तर रोहिणी परिसरात पोलीस आणि नागरिकांमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. मिळालेल्या