सार्वभौमत्व, सुरक्षेबाबत तडजोड नाही : राजनाथ सिंह

संरक्षण मंत्र्यांचे नाव न घेता चीन व पाकला इशारा


नवी दिल्ली : भारत शांतता, संवाद आणि जागतिक स्थैर्यावर विश्वास ठेवतो; पण देशाच्या सार्वभौमत्वाच्या आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही तडजोड मान्य करणार नाही, असा ठाम संदेश संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिला. चाणक्य संरक्षण संवाद या कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांनी पाकिस्तान आणि चीनची थेट नावे न घेतल्यानेही त्यांच्याकडेच हा इशारा असल्याचे स्पष्ट दिसून आले.


संरक्षणमंत्री सिंह म्हणाले की, बदलत्या जागतिक वातावरणात भारत आता संतुलनाचा व जबाबदारीचा आवाज म्हणून उदयास येत आहे. इंडो-पॅसिफिक प्रदेशातील देश तसेच जागतिक दक्षिणमधील राष्ट्रे भारताला सर्वाधिक विश्वासार्ह भागीदार समजतात. आर्थिक प्रगती, विज्ञान-तंत्रज्ञानातील क्षमता आणि तत्त्वनिष्ठ परराष्ट्र धोरण यामुळे भारताचे स्थान जागतिक पातळीवर अधिक मजबूत झाले असल्याचेही त्यांनी नमूद केले.


दहशतवाद, सीमापार अतिरेकी कारवाया, समुद्री मार्गांवरील दबाव, माहिती युद्ध आणि भू-राजकीय तणाव यांसारखी अनेक आव्हाने भारतासमोर असल्याचे ते म्हणाले. या अनिश्चिततेला सामोरे जाण्यासाठी सतत सज्ज राहणे आवश्यक आहे आणि म्हणूनच लष्करी सुधारणा हा पर्याय नाही, तर अनिवार्य धोरणात्मक निर्णय आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.


भारतात सध्या संरक्षण क्षेत्रात मोठे आधुनिकीकरण सुरू आहे. नवी प्लॅटफॉर्म्स, अत्याधुनिक तंत्रज्ञान, स्थानिक उत्पादनाला प्रोत्साहन आणि खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता याकडे सरकारचा भर असल्याचे सिंह यांनी सांगितले. आत्मनिर्भर भारत मोहिमेमुळे संरक्षण औद्योगिक क्षेत्र मजबूत होत असून, परदेशी साधनसंपत्तीवरील अवलंबित्व कमी होत आहे, असेही त्यांनी
निदर्शनास आणले.


सशस्त्र दलांना देशाच्या सुरक्षिततेचे भक्कम आधारस्तंभ म्हणताना, सीमांचे रक्षण, आपत्ती व्यवस्थापन, सागरी सुरक्षेतील सहभाग आणि आंतरराष्ट्रीय शांतता मोहिमांमधील योगदान याबद्दल त्यांनी गौरव व्यक्त केला. भारतीय जवानांची तयारी आणि शौर्यामुळेच भारत आपल्या शेजारील व जागतिक आव्हानांना समर्थपणे सामोरे जाऊ शकतो, यावर त्यांनी भर दिला.


भविष्यातील युद्धांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता व अत्याधुनिक तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याने या क्षेत्रातही मोठी गुंतवणूक केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमात त्यांनी लष्करासाठी एआय-संबंधित नवे प्रकल्प आणि लष्करी हवामान अंदाज प्रणालीचे लोकार्पणही केले.


भारत कोणाच्याही विरोधात नाही; पण देशाच्या सार्वभौमत्वाचा अपमान किंवा सुरक्षेला धोका निर्माण झाल्यास कठोर भूमिका घेण्याची भारताची तयारी कायम आहे, हे सिंह यांनी स्पष्टपणे सांगितले. शांतता हा भारताचा मार्ग असला तरी राष्ट्रहित सर्वोच्च आहे, हे त्यांचे वक्तव्य पुन्हा अधोरेखित करते.

Comments
Add Comment

ISSF Junior World Championship. :आयएसएसएफ ज्युनियर विश्व अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा देदिप्यमान विजय

आयएसएसएफ (ISSF) ज्युनियर विश्व अजिंक्यपद स्पर्धा २०२६: भारताचा देदिप्यमान विजय; २४ पदकांसह अव्वल स्थान

Ketan Agarwal Murder : एवढा मोठा कांड केला तरी पश्चात्ताप नाही ; त्यात लॉकअपमध्ये सियाने अशी काही मागणी केली की पोलीसही झाले थक्क

Ketan Agarwal Murder : लोहगड किल्ल्यावर पती केतन अग्रवाल (Ketan Agarwal) याला शेकडो फूट खोल दरीत ढकलून ठार मारल्याच्या आरोपामुळे सध्या

Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’मधील शहीद सहा जवानांची नावे प्रथमच जाहीर; राष्ट्रीय युद्ध स्मारकावर होणार कायमस्वरूपी नोंद

Operation Sindoor :  जम्मू-काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam) येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने राबवलेल्या ‘ऑपरेशन

Raincore Trend : ओले रस्ते, स्टायलिश अंदाज : पावसाळी फॅशनमध्ये 'रेनकोर'चा डंका!

सध्या फॅशन विश्वात 'रेनकोर' (Raincore) या नवीन ट्रेंडची जोरदार चर्चा सुरू आहे. हा ट्रेंड केवळ पावसाळी हवामानापासून

Ayodhya Ram Mandir Donation Scam : अयोध्या राम मंदिर दान घोटाळा प्रकरणात नवे वळण; चंपत राय आणि अनिल मिश्रा यांचा राजीनामा

अयोध्या राम मंदिर दान घोटाळा (Ayodhya Ram Mandir Donation Scam) प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र

Amarnath Yatra 2026 Guide: हर हर महादेव! अमरनाथ यात्रेचे वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या संपूर्ण माहिती!

श्रीनगर : दरवर्षीप्रमाणे यंदाही लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अमरनाथ गुहेतील नैसर्गिक बर्फाच्या